शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बिनविरोधचा डंका; पण दुरंगीचाही दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

पाटण : तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यातच अनेक गावांनी ग्रामपंचायत बिनविरोध करून एक वेगळा आदर्श घालून दिला ...

पाटण : तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यातच अनेक गावांनी ग्रामपंचायत बिनविरोध करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. मात्र, काही गावांमध्ये अटीतटीचा संघर्ष होणार, हे निश्चित आहे.

दरम्यान, मोठ्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असफल झाले आहेत. कारण एका वॉर्डातील मिटले तर दुसऱ्या वॉर्डमध्ये पेटतय, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये निवडणूक होणारच हे स्पष्ट झाले आहे.

उमेदवारी अर्जांच्या माघारीनंतर स्पष्ट झालेल्या स्थितीनुसार पाटण तालुक्यात मंत्री शंभूराज देसाई विरुद्ध माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या दोन गटात मुख्य लढत होणार, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामध्ये कोयना विभागातील नानेल, नेचल, मेंढेघर, हुबरळी, कामरगाव या गावांमध्ये अटीतटीच्या लढती होतील, अशी चिन्हे आहेत. मोरणा विभागातील अनेक गावांनी बिनविरोध ग्रामपंचायत करून एक आदर्श समोर ठेवला आहे. मात्र, कोकिसरे, वाडीकोतावडे, धावडे, काहीर, पेठशिवापूर, गोकुळ तर्फ पाटण या गावांनी बिनविरोधचे नावही घेतले नाही.

तारळे विभागातही देसाई आणि पाटणकर गटात अटीतटीच्या लढती होतील, असे दिसत आहे. यामध्ये सर्वात मोठे गाव तारळे असून येथे सतरा जागांसाठी ५३ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. तसेच या विभागातील मुरुड, मालोशी, बांबवडे, आंबळे, दुसाळे या गावांमध्ये जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत. ढेबेवाडी विभागातील मानेवाडी, खळे, कुंभारगाव, चिखलेवाडी, करपेवाडी, काळगाव, मोरेवाडी, कुठरे आदी गावांमध्ये जोरदार लढती होणार आहेत. मात्र, याच विभागातील पाळशी, तामिणे, सळवे, सातर या गावांनी बिनविरोधचा आदर्श निर्माण केला आहे. कुंभारगाव येथे ११ जागांसाठी लक्षवेधी लढती होणार आहेत. हे गाव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आहे.

चाफोली विभागातील बोंद्री, कातवडी, चिटेघर येथेही संघर्ष होणार आहे. चाफळ विभागात केळोली येथे अटीतटीची लढत आहे. इतर ग्रामपंचायतींमध्ये मात्र अंशत: निवडणुका होणार असे दिसते. मणदुरे विभागातील मणदुरे, मेंढोशी, साखरी, दिवशी खुर्द या गावांमध्ये मोठ्या निवडणुका अपेक्षित आहेत.

मल्हारपेठ विभागातील बोडकेवाडी, ठोमसे, नाडोली येथे मोठ्या लढती होणार असे दिसते. मरळी विभागातील शिंदेवाडी, सुळेवाडी, चोपदारवाडी, सोनावडे, त्रिपुडी, चोपडी, पापर्डे, सांगवड आदी ठिकाणी धुमशान होणार आहे.

- चौकट

... या ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध

उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार शिल्लक राहिल्यामुळे अर्ज माघारी घेण्यापूर्वीच काही गावांनी बिनविरोधचा आदर्श निर्माण केला. त्यामध्ये गोषटवाडी, आंबेघर तर्फ मरळी, पाचगणी, आटोली, नेरले, डांगीस्टेवाडी, सुरुल, खोणोली, वाघजाईवाडी, अंब्रुळे, कोदळ, दिवशी बुद्रुक, जरेवाडी, चाफोली, तामिणे, पाळशी, सळवे, कोळेकरवाडी, सातर, पाचपुतेवाडी, चव्हाणवाडी, मस्करवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात जमा आहेत.