शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ढेबेवाडी मार्गावर धोकादायक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कुसूर : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यापासून ते ढेबेवाडीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या वळणांपैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कुसूर : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यापासून ते ढेबेवाडीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या वळणांपैकी शिंदेवाडी येथील वळण जास्त धोकादायक असल्याने याठिकाणी रात्री अपघात होत आहेत. या वळणावर भरधाव वेगातील वाहनांच्या चालकांचा ताबा सुटून वाहने नजिकच्या ओढ्यात जात आहेत. याठिकाणी दिशादर्शक व सूचना फलक नाहीत. हे फलक लावण्यात आले नसल्याने रात्री दुचाकी वाहनांमध्ये अपघात होत आहे.

सैदापूर ते ओगलेवाडी रस्त्याची मोठी दुरवस्था

कऱ्हाड : कऱ्हाड ते विटा मार्गावरील सैदापूरमधील कृष्णा कॅनॉल ते ओगलेवाडी या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अपघातांचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर या मार्गालगत मोकाट श्वानांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. तीन ते चार ठिकाणी स्थानिकांकडून कचराही टाकला जातो. त्यामुळेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, तेथून पुढे रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

गटारामधील कचरा पसरतोय उपमार्गावर

कऱ्हाड : पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या नाल्यामध्ये कचरा साचून राहिल्यामुळे त्यातील पाणी व कचरा महामार्गालगतच्या उपमार्गावर येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या उपमार्गावरून दुचाकीस्वारांना जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. कऱ्हाडपासून सातारा - सांगली जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची ठिकठिकाणी अशी दुरवस्था झाली असून, त्याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. मलकापूर, नांदलापूर, पाचवड फाटा, आटके, नारायणवाडी, वाठार, मालखेड याठिकाणी गटारात कचरा साचत आहे.

ढेबेवाडी मार्गावर प्रवासी थांबा शेड उभारणे गरजेचे

कऱ्हाड : तालुक्यात कऱ्हाड - ढेबेवाडी मार्ग ते कऱ्हाड - पाटण मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या कामात संबंधित विभागाने एस. टी. थांबा प्रवासी शेड हटविल्या आहेत. पावसाळ्यात विद्यार्थी व नागरिकांना उघड्यावर उभे राहून एस. टी.ची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ज्याठिकाणी प्रवासी शेड हटविण्यात आल्या आहेत, त्याठिकाणी तत्काळ शेड उभारण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

उंडाळे विभागातील तुळसण मार्गावर खड्डे

उंडाळे : उंडाळे विभागातील उंडाळे ते तुळसण फाटा या मार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पाईपलाईनसाठी रस्त्यामध्ये चर काढण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही बांधकाम विभागाकडून रस्त्याची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. उंडाळे ते तुळसण फाटा हा रस्ता शेतकऱ्यांनी आपली जमीन देऊन केला आहे. सध्या उंडाळे ते तुळसण फाटा दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या कडेने झाडेझुडपे वाढली आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

कऱ्हाडला बापूजी साळुंखे महाविद्यालयामध्ये हरित शपथ

कऱ्हाड : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात ‘माझी वसुंधरा’ कार्यक्रम घेण्यात आला. त्याअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांना हरित शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे होते. प्राचार्य घाटगे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर पर्यावरणाचे संवर्धन होणे ही काळाची गरज असल्याचे सांगून या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल, याविषयी विचार मांडले.