शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पुराचा धोका... चुके काळजाचा ठोका!

By admin | Updated: June 25, 2015 01:01 IST

गोडोलीकर अस्वस्थ : गेल्या वर्षीच्या आपत्तीची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीने नागरिकांचा रात्री-अपरात्री परिसरात फेरफटका

दत्ता यादव / सातारा कर्ज काढून थाटलेले व्यवसाय गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये क्षणात होत्याचे नव्हते झाले. यंदाही हीच परिस्थिती ओढावतेय की काय, या धास्तीने गोडोली तळ्याशेजारी असणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांच्या काळाजाचा ठोका चुकत आहे. संततधार पाऊस सुरू झाली की व्यावसायिक खडबडून जागे होत आहेत. दुकानात पाणी तर शिरले नसेल ना, हे पाहण्यासाठी काहीजण रात्री-अपरात्री झोपेतून उठून दुकानाकडे फेरफटका मारत आहेत. प्रशासनाने पाठ फिरविल्यामुळे येथील लोकांनी वर्गणी काढून एक ओढा स्वच्छ केला; परंतु दुसरा ओढा कधी काळ बनून रौद्ररूप धारण करेल, याची शाश्वती नसल्यामुळे येथील व्यावसायिक अक्षरश: हतबल झाले आहेत. काही वर्षांपूर्वी गोडोली तळ्याचे सुशोभीकरण करताना तळ्याभोवती संरक्षण भिंत उभारण्यात आली. या ठिकाणी असलेल्या भैरवनाथाचा आणि काळंबीच्या नैसर्गिक ओढ्यावर छोट्या नळ्या टाकून त्यातून पाणी दुसरीकडे वळविण्यात आले. जेणेकरून तळ्यात पाणी जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली; परंतु नैसर्गिक ओढ्याच्या प्रवाहाचे पात्र बदलल्यामुळे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये ओढे-नाले तुडुंब वाहू लागले. पाईपमध्ये गाळ आणि प्लास्टिक अडकल्यामुळे येथील व्यावसायिकांच्या दुकानामध्ये पाणी शिरले. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. काही बेरोजगार युवकांनी कर्ज काढून छोटे-मोठे व्यवसाय थाटले होते. अशा युवकांना पुन्हा बेरोजगार होण्याची वेळ आली. मात्र, संकटावर मात करत येथील सर्वच गाळेधारकांनी पुन्हा उभारी घेऊन आपले व्यवसाय नव्याने थाटले. गोडोली परिसर हा त्रिशंकू विभागात येत असल्यामुळे या ठिकाणी नेमका विकास कोणी करायचा, असा प्रश्न नेहमीच प्रशासनाला पडत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गोडोली तळ्याच्या शेजारून जे दोन ओढे वाहत आहेत. त्या ओढ्यांची स्वच्छता करण्यासाठी येथील ४४ गाळाधारकांनी पुढाकार घेतला. मे महिन्यामध्ये प्रत्येकाकडून दोन हजार रुपये वर्गणी काढून उजव्या बाजूचा काळंबीचा ओढा पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. तब्बल ७० ट्रॉली गाळ या ओढ्यातून काढण्यात आला. मात्र, पैसे अपुरे पडल्यामुळे दुसरा भैरवनाथाचा ओढा स्वच्छ करायचा राहून गेला. त्यामुळे आता गेल्या वर्षासारखी स्थिती ओढावतेय की काय, या काळजीने सर्व व्यावसायिकांची अक्षरश: घालमेल सुरू झाली आहे. गोडोली तळ्यामध्ये पूर्वीसारखेच पाणी सोडले तर गेल्या वर्षासारखी परिस्थिती व्हायची नाही, असे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आदेश प्रत्यक्षात उतरेल का? किल्ले अजिंक्यताऱ्याच्या उतारावरून येणारे पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून गोडोली तळ्यात पूर्वीप्रमाणे सोडावे, असा आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गोडोली येथील स्थानिकांची मते जाणून घेतली असता, हा आदेश प्रत्यक्षात उतरेल का, अशी अनेकांना शंका आहे. रस्ता खोदून ओढ्यामध्ये पाईप टाकण्यात आल्या आहेत. हे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. आता तहान लागली म्हणून विहीर खोदण्यासारखा प्रकार आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने गेल्या वर्षासारखी परिस्थिती ओढावू शकते. त्यामुळे सध्या हे काम कधी पूर्ण होणार की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नुसता कागदावरच राहणार, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.