शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

रिमझिम पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डीसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून, शेतात पाणी साठून राहिल्याने लागण ...

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डीसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून, शेतात पाणी साठून राहिल्याने लागण केलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी सरीत साठल्यामुळे कांद्याच्या मुळ्या कुजत असून, कांदा पीक पिवळे पडून कांदा जळू लागला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा पिकात पाळ्या घातल्या असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

परिसरात आठ ते दहा दिवसांपासून रिमझिम पाऊस होत असून, उघडीप होत नसल्याने लागणीचा कांदा जळून जात आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कांदा लागण व बियाणांचा खर्च एकरी जवळपास तीस ते चाळीस हजार येत असून, सर्व खर्च कांदा जळून गेल्याने वाया गेला आहे.

या परिसरात कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. याच पिकातून शेतीचा भांडवली खर्च निघत असल्याने परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले आहे; पण रिमझिम पावसाने कांदा पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जास्त पाण्यामुळे कांदा पिकाच्या माना लांबल्या असून, औषधाच्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गेल्या वर्षीही मोठा पाऊस झाल्याने शेतातच कांदा पिकाच्या मुळ्या कुजून गेल्या. त्यामुळे मागील वर्षीही नुकसान झाले होते. यावर्षीही दमदार पाऊस नसला तरी रिमझिम पाऊस होत असून, उघडीप नसल्याने कांदा जळू लागला आहे. त्यामुळे यावर्षी कांदा उत्पादनात कमालीची घट होणार आहे. काही शेतकऱ्यांनी धूळ वाफ्यावर कांदा पीक घेतले होते. धूळ वाफ्यावरील कांद्याची मूळकुज होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची धूळ वाफ्यावर दुबार पेरणी केली असली तरी रिमझिम पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

चौकट..

शासनाने पंचनामे करावेत...

सध्या लॉकडाऊनमुळे कांदा पिकाला दर नसल्याने बळीराजा अगोदरच अडचणीत आहे. गेल्या हंगामातील उन्हाळी कांदा दर नसल्याने ऐरणीत बंद आहे. दर वाढण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत, तर या हंगामातील कांदा रिमझिम पावसाने शेतातच खराब झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. प्रशासनाने कांदा पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

कोट..

रिमझिम पावसामुळे मूळकूज होऊन कांदा जळत आहे. सहा एकर कांदा पिकात पाळी घातली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी.

-बाबासाहेब जळक, शेतकरी, पळशी

१८पळशी

पळशी (ता. माण) येथे रिमझिम पावसामुळे शेतात पाणी साठल्यामुळे लागण केलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.