शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डीसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून, शेतात पाणी साठून राहिल्याने लागण ...

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डीसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून, शेतात पाणी साठून राहिल्याने लागण केलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी सरीत साठल्यामुळे कांद्याच्या मुळ्या कुजत असून, कांदा पीक पिवळे पडून कांदा जळू लागला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा पिकात पाळ्या घातल्या असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

परिसरात आठ ते दहा दिवसांपासून रिमझिम पाऊस होत असून, उघडीप होत नसल्याने लागणीचा कांदा जळून जात आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कांदा लागण व बियाणांचा खर्च एकरी जवळपास तीस ते चाळीस हजार येत असून, सर्व खर्च कांदा जळून गेल्याने वाया गेला आहे.

या परिसरात कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. याच पिकातून शेतीचा भांडवली खर्च निघत असल्याने परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले आहे; पण रिमझिम पावसाने कांदा पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जास्त पाण्यामुळे कांदा पिकाच्या माना लांबल्या असून, औषधाच्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गेल्या वर्षीही मोठा पाऊस झाल्याने शेतातच कांदा पिकाच्या मुळ्या कुजून गेल्या. त्यामुळे मागील वर्षीही नुकसान झाले होते. यावर्षीही दमदार पाऊस नसला तरी रिमझिम पाऊस होत असून, उघडीप नसल्याने कांदा जळू लागला आहे. त्यामुळे यावर्षी कांदा उत्पादनात कमालीची घट होणार आहे. काही शेतकऱ्यांनी धूळ वाफ्यावर कांदा पीक घेतले होते. धूळ वाफ्यावरील कांद्याची मूळकुज होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची धूळ वाफ्यावर दुबार पेरणी केली असली तरी रिमझिम पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

चौकट..

शासनाने पंचनामे करावेत...

सध्या लॉकडाऊनमुळे कांदा पिकाला दर नसल्याने बळीराजा अगोदरच अडचणीत आहे. गेल्या हंगामातील उन्हाळी कांदा दर नसल्याने ऐरणीत बंद आहे. दर वाढण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत, तर या हंगामातील कांदा रिमझिम पावसाने शेतातच खराब झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. प्रशासनाने कांदा पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

कोट..

रिमझिम पावसामुळे मूळकूज होऊन कांदा जळत आहे. सहा एकर कांदा पिकात पाळी घातली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी.

-बाबासाहेब जळक, शेतकरी, पळशी

१८पळशी

पळशी (ता. माण) येथे रिमझिम पावसामुळे शेतात पाणी साठल्यामुळे लागण केलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.