शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; नेमका पाणीसाठा किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: May 30, 2024 19:16 IST

दुष्काळामुळे सिंचनासाठी मागणी वाढली

सातारा : जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता असून, सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत असल्याने धरणे रिकामी होऊ लागली आहेत. त्यामुळे अनेक धरणांनी तळ गाठला आहे. उरमोडी धरणात अवघा साडेसात, तर कण्हेरमध्ये १७ टक्के साठा राहिला आहे. कोयना धरणात १९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. सध्या सर्वांचेच डोळे मान्सूनकडे आहेत.जिल्ह्यातील शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पर्जन्यमान होते. यावरच जिल्ह्यातील कृषिक्षेत्राची मदार असते. मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरा पाऊस झाला. सुमारे ३० टक्के पावसाची तूट होती. त्यामुळे सर्वच तालुक्यांत कमी - अधिक फरकाने परिणाम झाला. त्यातच जिल्ह्यात प्रमुख ६ धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश धरणे ही भरली नाहीत.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातही ९५ टीएमसीपर्यंतच साठा पोहोचलेला. तशीच स्थिती कण्हेर आणि उरमोडी या धरणाची होती. जिल्ह्यातील या धरणांचेच पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी जाते. त्यामुळे ही धरणे कृषिक्षेत्राला आधार देणारी ठरतात. पण, गेल्यावर्षी धरणेच न भरल्याने सिंचनासाठी सतत मागणी वाढत गेली. परिणामी गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून मागणीप्रमाणे सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे.जिल्ह्यातील कोयना धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. यासाठी पाण्याची तरतूद आहे. तसेच धरणातील पाण्यावर टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या प्रमुख तीन पाणी योजना आहेत. या धरणातील पाणी अधिक करून सांगली जिल्ह्यासाठी जाते. तसेच सोलापूर जिल्ह्यातील योजनेसाठीही कोयनेचे पाणी सोडण्यात येते. सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी आजही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या २१०० क्यूसेकने सांगलीसाठी पाणी सोडले जात आहे. याच धरणात आता १८.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. १९.१९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.उरमोडी धरणावर सातारा आणि माण, खटाव हे दुष्काळी तालुके अवलंबून आहेत. गेल्यावर्षी उरमोडी धरण भरले नव्हते. पण, सिंचनासाठी पाण्याची मागणी होत होती. त्यामुळे पाणी सोडण्यात आले. आज धरणात अवघा ७.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणात पाऊण टीएमसी पाणी आहे. तशीच स्थिती कण्हेर धरणाची आहे. या धरणात १.७४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टक्केवारीत हे प्रमाण १७.२२ आहे, तर कण्हेरमधूनही सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वाई तालुक्यात धोम धरण असून, यामध्ये ४.७४ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. तारळी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांची स्थिती (टीएमसीमध्ये)धरण  - सध्याचा साठा  -  टक्केवारी  - एकूण पाणीसाठाकोयना -   १९.१९  -  १८.२२ -  १०५.२५धोम  -  ४.७४  -  ३५.१३  -  १३.५०बलकवडी -  ०.१३ -  ३.१४  -  ४.०८कण्हेर - १.७४ -  १७.२२ -  १०.१०उरमोडी -  ०.७५ -  ७.५७ -  ९.९६तारळी  -  १.४८ - २५.३२ -  ५.८५

मागील वर्षी कण्हेर, तारळी अन् उरमोडीत अधिक साठा शिल्लक

जिल्ह्यातील सर्वच धरणांतील पाणी सिंचनासाठी सोडण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यानंतर या धरणातील पाणी तरतुदीनुसार सोडले जाते. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने पाण्याची मागणी वाढली. त्यामुळे धरणे रिकामी होऊ लागली आहेत. गतवर्षी काही धरणांत जादा पाणीसाठा होता. गेल्यावर्षी ३० मेपर्यंत कण्हेरमध्ये २.४१ टीएमसी पाणी होते,, तर उरमोडीत ४.१५ आणि तारळी ३.१९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. कारण, २०२२ मध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे धरणातील पाण्याला मागणी कमी होती. त्याचबरोबर कोयना धरणात गेल्यावर्षी १९.७२ टीएमसी साठा होता.  सध्या धरणात १९.१९ टीएमसी पाणी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी