शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

धरण उशाला; कोरड घशाला! वांग-मराठवाडी प्रकल्प : अनेक गावे पाण्यापासून वंचित

By admin | Updated: May 10, 2014 23:42 IST

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात ४६ गावे आहेत. त्यापैकी काही गावे अशी आहे की, शासनाने त्यांना शासकीय खर्चाने पाणी दिले नाही

 सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात ४६ गावे आहेत. त्यापैकी काही गावे अशी आहे की, शासनाने त्यांना शासकीय खर्चाने पाणी दिले नाही तर ती गावे पाण्यापासून कायमस्वरूपी वंचित राहणार आहेत. जानुगडेवाडी, शितपवाडी, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, धामणी, वाझोली व कुंभारगाव आदी गावांचा त्यामध्ये समावेश आहे. शासनाने या गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनी स्लॅबमध्ये गेल्याने काढून घेतल्या आहेत. अशा गावांतील शेतकर्‍यांना शासकीय उपसासिंचनद्वारे पाणी देण्याची गरज आहे. ज्या गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी स्लॅबमध्ये गेलेल्या आहेत त्यांना प्रथम पाणी मिळाले पाहिजे. यासाठी वांगच्या धरणग्रस्तांनी पहिल्यापासून लढा चालू ठेवला आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, अशा शेतकर्‍यांनीही आपल्या हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे. या धरणामधील वस्तुस्थिती पाहिली तर घोटील गाव ९०% स्थलांतरित झाले. त्यांचे तळमावले (ताईगडेवाडी, ता. पाटण) येथे पुनर्वसन झाले आहे. परंतु, मराठवाडी व जाधववाडी गावची अशंता जमिनी धरणाच्या पाया भरणीत गेल्या आहेत. त्यांचे घर किंवा गावठाण प्रत्यक्षात बाधित न झाल्याने या गावातील धरणग्रस्त पुनर्वसन गावठाणमध्ये स्थलांतरित झालेले नाहीत. मराठवाडी व जाधववाडी या दोन्ही गावांतील धरणग्रस्त स्थलांतरित झाले नसले तरी त्यांना मिळालेल्या जमिनी ते तेथून येऊन-जाऊन करत आहेत. त्याप्रमाणे मेंढ येथील सहा कुटुंबे प्रथम घळभरणीत प्रत्यक्षात बाधित झाल्याने ते घारेवाडी येथील गावठाणात स्थलांतरित झाले आहेत. मात्र, ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी पुनर्वसनामध्ये गेलेल्या आहेत, अशा गावांतील शेतकर्‍यांना कशा प्रकारे पाणी देता येईल, याबाबत कृष्णा खोर्‍याच्या बैठकीत धरणग्रस्तांनी आढावा घेऊन त्याचा प्रस्तावही शासनाकडे सादर केले आहेत. त्याचा पाठपुरावा घेण्याची गरज आहे. तेव्हा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी यासाठी पुढाकार घेऊन अधिक उठाव करण्याची गरज आहे. (वार्ताहर)