शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास संवर्धनाच्या चळवळीतील ‘जिज्ञासा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST

इतिहास संवर्धनाच्या चळवळीतील ‘जिज्ञासा’ सचिन काकडे सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कालौघात लुप्त होत चाललेला हा वारसा ...

इतिहास संवर्धनाच्या चळवळीतील ‘जिज्ञासा’

सचिन काकडे

सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कालौघात लुप्त होत चाललेला हा वारसा दृष्टिक्षेपात आणण्याचं महत्त्वाचं काम केलं ते जिज्ञासा मंच या संस्थेनं. इतिहास संकलनापासून सुरू झालेला हा प्रवास संवर्धनाचा टप्पा ओलांडून आता जनजागृतीपर्यंत येऊन थांबलाय. मराठ्यांची चौथी राजधानी म्हणून इतिहासात मानाचं स्थान मिळविलेल्या सातारा शहरात सुरू झालेली ‘जिज्ञासा’ची चळवळ आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे.

सातारा शहराला इतिहासाची किनार आहे. या शहराच्या आसपास अनेक ऐतिहासिक वास्तू विखरून पडल्या आहेत. त्यांचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने साताऱ्यातील इतिहासप्रेमी तरुणांनी एकत्र येत १९९५ रोजी ‘जिज्ञासा मंच’ हा ग्रुप सुरू केला. प्रारंभी जवळपास तीस तरुण या ग्रुपशी जोडले गेले. या तरुणांनी सुरुवातीला गड-किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेतली आणि तिचा प्रारंभ केला तो ती किल्ले अजिंक्यताऱ्यावरून. ‘मेलेले मुडदे का उकरताय.. दगड-धोंडे उकरून काय मिळणार’ अशा शब्दांत अनेकांनी ‘जिज्ञासा’च्या सदस्यांवर प्रहार केले. मात्र तरुणांचे काम काही थांबले नाही. अजिंक्यताऱ्यावर राबविलेली संवर्धनाची मोहीम महाराष्ट्रातील पहिली मोहीम होती. ही मोहीम सलग पाच वर्षे चालली. ग्रुपचे सदस्य दर शनिवारी सकाळी सात ते पाच या वेळेत किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत होते. या मोहिमेपासूनच ‘जिज्ञासा’ची चळवळ अधिक समृद्ध व व्यापक होत गेली.

अजिंक्यतारा मराठा साम्राज्याची राजधानी होती. या राजधानीच्या प्रवेशद्वारावरील लाकडी दरवाजा आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. हा वारसा जतन करण्यात ‘जिज्ञासा’ने मोलाची भूमिका बजावली. या लाकडी दरवाजावर आपल्याला आजही शिलालेख आढळून येतो.

आज आपण कोणत्याही वस्तूचा फोटो सहजरीत्या काढू शकतो. तो संकलित करून ठेवू शकतो; परंतु वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. ‘जिज्ञास’ने सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जवळपास सात हजार फोटो कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढले. या सात हजार वास्तूंपैकी जवळपास तीन हजार वस्तू आज नामशेष झाल्या असून, त्या केवळ फोटोंच्या रूपात आपल्याला पहायला मिळतात. ‘जिज्ञासा’ने सुरू केलेल्या अजिंक्यतारा जतनीकरण मोहिमेला पुढे चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये जनजागृती झाली. तरुणाई गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढे सरसावली आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात गड-किल्ले संवर्धनाची चळवळ सुरू झाली आहे.

(चौकट)

संकलन, संवर्धन अन् जनजागृती...

जिज्ञासाने गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत ६० ते ७० शिलालेख शोधून काढले, ताम्रपट, विरगळांचा शोध लावला, अनेक ऐतिहासिक वास्तू दृष्टिक्षेपात आणल्या त्याचे संवर्धन केले. व्याख्यानमाला, संग्रहालय दिन, हेरिटेज वॉक असे कार्यक्रम ‘जिज्ञासा’कडून सातत्याने राबविले जात आहेत. काहीतरी नवीन शोध घेण्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या ‘जिज्ञासा’चे काम आता इतिहास संकलन, संवर्धनापासून जनजागृतीपर्यंत पोहोचले आहे.

फोटो देत आहे.