शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

इतिहास संवर्धनाच्या चळवळीतील ‘जिज्ञासा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST

इतिहास संवर्धनाच्या चळवळीतील ‘जिज्ञासा’ सचिन काकडे सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कालौघात लुप्त होत चाललेला हा वारसा ...

इतिहास संवर्धनाच्या चळवळीतील ‘जिज्ञासा’

सचिन काकडे

सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कालौघात लुप्त होत चाललेला हा वारसा दृष्टिक्षेपात आणण्याचं महत्त्वाचं काम केलं ते जिज्ञासा मंच या संस्थेनं. इतिहास संकलनापासून सुरू झालेला हा प्रवास संवर्धनाचा टप्पा ओलांडून आता जनजागृतीपर्यंत येऊन थांबलाय. मराठ्यांची चौथी राजधानी म्हणून इतिहासात मानाचं स्थान मिळविलेल्या सातारा शहरात सुरू झालेली ‘जिज्ञासा’ची चळवळ आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे.

सातारा शहराला इतिहासाची किनार आहे. या शहराच्या आसपास अनेक ऐतिहासिक वास्तू विखरून पडल्या आहेत. त्यांचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने साताऱ्यातील इतिहासप्रेमी तरुणांनी एकत्र येत १९९५ रोजी ‘जिज्ञासा मंच’ हा ग्रुप सुरू केला. प्रारंभी जवळपास तीस तरुण या ग्रुपशी जोडले गेले. या तरुणांनी सुरुवातीला गड-किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेतली आणि तिचा प्रारंभ केला तो ती किल्ले अजिंक्यताऱ्यावरून. ‘मेलेले मुडदे का उकरताय.. दगड-धोंडे उकरून काय मिळणार’ अशा शब्दांत अनेकांनी ‘जिज्ञासा’च्या सदस्यांवर प्रहार केले. मात्र तरुणांचे काम काही थांबले नाही. अजिंक्यताऱ्यावर राबविलेली संवर्धनाची मोहीम महाराष्ट्रातील पहिली मोहीम होती. ही मोहीम सलग पाच वर्षे चालली. ग्रुपचे सदस्य दर शनिवारी सकाळी सात ते पाच या वेळेत किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत होते. या मोहिमेपासूनच ‘जिज्ञासा’ची चळवळ अधिक समृद्ध व व्यापक होत गेली.

अजिंक्यतारा मराठा साम्राज्याची राजधानी होती. या राजधानीच्या प्रवेशद्वारावरील लाकडी दरवाजा आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. हा वारसा जतन करण्यात ‘जिज्ञासा’ने मोलाची भूमिका बजावली. या लाकडी दरवाजावर आपल्याला आजही शिलालेख आढळून येतो.

आज आपण कोणत्याही वस्तूचा फोटो सहजरीत्या काढू शकतो. तो संकलित करून ठेवू शकतो; परंतु वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. ‘जिज्ञास’ने सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जवळपास सात हजार फोटो कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढले. या सात हजार वास्तूंपैकी जवळपास तीन हजार वस्तू आज नामशेष झाल्या असून, त्या केवळ फोटोंच्या रूपात आपल्याला पहायला मिळतात. ‘जिज्ञासा’ने सुरू केलेल्या अजिंक्यतारा जतनीकरण मोहिमेला पुढे चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये जनजागृती झाली. तरुणाई गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढे सरसावली आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात गड-किल्ले संवर्धनाची चळवळ सुरू झाली आहे.

(चौकट)

संकलन, संवर्धन अन् जनजागृती...

जिज्ञासाने गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत ६० ते ७० शिलालेख शोधून काढले, ताम्रपट, विरगळांचा शोध लावला, अनेक ऐतिहासिक वास्तू दृष्टिक्षेपात आणल्या त्याचे संवर्धन केले. व्याख्यानमाला, संग्रहालय दिन, हेरिटेज वॉक असे कार्यक्रम ‘जिज्ञासा’कडून सातत्याने राबविले जात आहेत. काहीतरी नवीन शोध घेण्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या ‘जिज्ञासा’चे काम आता इतिहास संकलन, संवर्धनापासून जनजागृतीपर्यंत पोहोचले आहे.

फोटो देत आहे.