शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

थंडी अन् करपाचा हळद पिकाला फटका : शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:11 IST

वाई तालुक्यातील बावधनसह परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, कमी पर्जन्यमान, थंडी, ढगाळ वातावरण अन् करपा रोगाच्या प्रादुर्भावाचा या पिकाला फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली

ठळक मुद्देबावधन परिसरात काढणीची लगबग; पण उत्पादन घटण्याची चिन्हे-पिवळं सोनं - १

तानाजी कचरे।बावधन : वाई तालुक्यातील बावधनसह परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, कमी पर्जन्यमान, थंडी, ढगाळ वातावरण अन् करपा रोगाच्या प्रादुर्भावाचा या पिकाला फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सध्या हळद काढणीची कामे जोमाने सुरू असली तरी पिकाला अपेक्षित दर मिळेल की नाही? या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.

बावधन परिसरात यंदा ३९० एकर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड केली आहे. यापैकी १८० एकर विहीर पाण्यावर, १५५ एकर पाटपाणी तर ५५ एकर क्षेत्रातील हळद लागवड ठिबकवर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात हळदीची लागवड झाली. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने पिकाची पूर्ण वाढ झाली नाही. त्यातच नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी पडल्याने पिकांवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. या पिकाला पोषक असलेल्या वातावरणाची निर्मिती न झाल्याने यंदा हळद उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

हळदीला चांगला दर मिळेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी हळदीचा साठा करून ठेवला आहे. परंतु यंदा अपेक्षित दर मिळण्याची खात्री नसल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हळदीला यंदा प्रति क्विंटल १५ ते १७ हजार रुपये दर मिळाला तर उत्पादित खर्च जाऊन काही रक्कम शेतकºयाच्या खिशात पडू शकते. मात्र, दर कमी मिळाल्यास याचा मोठा फटका शेतकºयांना बसू शकतो.एकरी लाख रुपये खर्चएक एकर क्षेत्रात हळद लागवड करण्यासाठी शेतकºयांना सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. नांगरट, कुळवणी, सरी यासाठी नऊ हजार रुपये, सेंद्रिय व रासायनिक खतांसाठी ३१ हजार रुपये, भिजवणी भर लावणे व भांगलणी मजुरी यासाठी २२ हजार रुपये तर पाला कापणी, हळद काढणे, ती शिजवणे व पॉलिश करणे यासाठी २३ हजार रुपये, हळद बियाणे १० हजार रुपये असा सुमारे एक लाख रुपये खर्च हळद लागवडीसाठी करावा लागतो. 

गेल्या काही वर्षांपासून उसाचे प्रश्न आंदोलनाद्वारे सोडविले जात आहेत. परंतु हळद पिकाला आधारभूत किंमत मिळत नाही. गेल्या वर्षी अपेक्षित दर न मिळाल्याने चार टनांहून अधिक हळद साठवून ठेवली आहे. त्यातच यंदा हळदीला पोषक वातावरण नसल्याने उत्पादनात घटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.- देवराम ठोंबरे, शेतकरी