शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वाईतील दुकानांवर डल्ला मारणाऱ्यांची धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST

वाई : शहरातील गणपतीआळी परिसरात दोन दिवसांपूर्वी पाच दुकाने फोडून ५२ हजार ३०० रुपये लंपास केल्याप्रकरणी वाई पोलीस ...

वाई : शहरातील गणपतीआळी परिसरात दोन दिवसांपूर्वी पाच दुकाने फोडून ५२ हजार ३०० रुपये लंपास केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. नागरिकांमधील भीती कमी व्हावी, यासाठी या तिन्ही आरोपींची शहरातील प्रमुख रस्त्यावरुन गुरुवारी वरात काढण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, दुकाने फोडल्याप्रकरणी पोलिसांनी सनी सुरेश जाधव (वय २६), अक्षय गोरख माळी (२०), सागर सुरेश जाधव (२४, सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, वाई) यांना अटक केली आहे. आरोपींची ओळख पटण्यासाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्या आरोपींची वाई शहरातून पायी धिंड काढली. भुरट्या चोऱ्या करून निर्माण केलेली दहशत मोडीन काढण्यासाठी बेड्या ठोकून शहरातील रस्त्यावरून या चोरट्यांची धिंड काढली.

सोमवार, दि. २२ च्या मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने शहरातील मध्यवस्तीत असलेले शशिकांत चंद्रकांत येवले (रा. भोगाव, ता. वाई) यांच्या मालकीच्या आम्रपाली बीअरबार व रेस्टॉरंट यांचे बंद शटर कटावणीच्या सहाय्याने उचकटून १४ हजार २०० रुपयांची रोख रक्कम तसेच शेजारील सुशांत संतोष गोळे यांचे साईकृपा कृषी केंद्राचे बंद शटर उचकटून १८ हजार, बिलाल इकबाल बागवान यांच्या किराणा दुकानातून ११ हजार रुपये, रवीचंद्र प्रदीप भाटे यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील तीनशे रुपये रोख व तीन आईस्क्रीमचे बॉक्स असा अठराशे रुपयांचा मुद्देमाल व नितीन रवींद्र शिंगटे यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातून ७ हजार रुपये रोख रक्कम याच चोरट्यांनी लंपास केली होती. तशी तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास गतिमान करण्यासाठी व आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी पथक तयार केले. या पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करीत सनी जाधव, अक्षय माळी, सागर जाधव तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पाचही दुकाने फोडली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने १७ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली. शहराच्या मध्यवस्तीमध्ये झालेल्या या चोऱ्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची वाई शहरातून धिंड काढण्यात येऊन व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचे काम करण्यात आले.