शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

वाईतील दुकानांवर डल्ला मारणाऱ्यांची धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST

वाई : शहरातील गणपतीआळी परिसरात दोन दिवसांपूर्वी पाच दुकाने फोडून ५२ हजार ३०० रुपये लंपास केल्याप्रकरणी वाई पोलीस ...

वाई : शहरातील गणपतीआळी परिसरात दोन दिवसांपूर्वी पाच दुकाने फोडून ५२ हजार ३०० रुपये लंपास केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. नागरिकांमधील भीती कमी व्हावी, यासाठी या तिन्ही आरोपींची शहरातील प्रमुख रस्त्यावरुन गुरुवारी वरात काढण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, दुकाने फोडल्याप्रकरणी पोलिसांनी सनी सुरेश जाधव (वय २६), अक्षय गोरख माळी (२०), सागर सुरेश जाधव (२४, सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, वाई) यांना अटक केली आहे. आरोपींची ओळख पटण्यासाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्या आरोपींची वाई शहरातून पायी धिंड काढली. भुरट्या चोऱ्या करून निर्माण केलेली दहशत मोडीन काढण्यासाठी बेड्या ठोकून शहरातील रस्त्यावरून या चोरट्यांची धिंड काढली.

सोमवार, दि. २२ च्या मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने शहरातील मध्यवस्तीत असलेले शशिकांत चंद्रकांत येवले (रा. भोगाव, ता. वाई) यांच्या मालकीच्या आम्रपाली बीअरबार व रेस्टॉरंट यांचे बंद शटर कटावणीच्या सहाय्याने उचकटून १४ हजार २०० रुपयांची रोख रक्कम तसेच शेजारील सुशांत संतोष गोळे यांचे साईकृपा कृषी केंद्राचे बंद शटर उचकटून १८ हजार, बिलाल इकबाल बागवान यांच्या किराणा दुकानातून ११ हजार रुपये, रवीचंद्र प्रदीप भाटे यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील तीनशे रुपये रोख व तीन आईस्क्रीमचे बॉक्स असा अठराशे रुपयांचा मुद्देमाल व नितीन रवींद्र शिंगटे यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातून ७ हजार रुपये रोख रक्कम याच चोरट्यांनी लंपास केली होती. तशी तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास गतिमान करण्यासाठी व आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी पथक तयार केले. या पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करीत सनी जाधव, अक्षय माळी, सागर जाधव तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पाचही दुकाने फोडली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने १७ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली. शहराच्या मध्यवस्तीमध्ये झालेल्या या चोऱ्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची वाई शहरातून धिंड काढण्यात येऊन व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचे काम करण्यात आले.