शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

वाईतील दुकानांवर डल्ला मारणाऱ्यांची धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST

वाई : शहरातील गणपतीआळी परिसरात दोन दिवसांपूर्वी पाच दुकाने फोडून ५२ हजार ३०० रुपये लंपास केल्याप्रकरणी वाई पोलीस ...

वाई : शहरातील गणपतीआळी परिसरात दोन दिवसांपूर्वी पाच दुकाने फोडून ५२ हजार ३०० रुपये लंपास केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. नागरिकांमधील भीती कमी व्हावी, यासाठी या तिन्ही आरोपींची शहरातील प्रमुख रस्त्यावरुन गुरुवारी वरात काढण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, दुकाने फोडल्याप्रकरणी पोलिसांनी सनी सुरेश जाधव (वय २६), अक्षय गोरख माळी (२०), सागर सुरेश जाधव (२४, सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, वाई) यांना अटक केली आहे. आरोपींची ओळख पटण्यासाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्या आरोपींची वाई शहरातून पायी धिंड काढली. भुरट्या चोऱ्या करून निर्माण केलेली दहशत मोडीन काढण्यासाठी बेड्या ठोकून शहरातील रस्त्यावरून या चोरट्यांची धिंड काढली.

सोमवार, दि. २२ च्या मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने शहरातील मध्यवस्तीत असलेले शशिकांत चंद्रकांत येवले (रा. भोगाव, ता. वाई) यांच्या मालकीच्या आम्रपाली बीअरबार व रेस्टॉरंट यांचे बंद शटर कटावणीच्या सहाय्याने उचकटून १४ हजार २०० रुपयांची रोख रक्कम तसेच शेजारील सुशांत संतोष गोळे यांचे साईकृपा कृषी केंद्राचे बंद शटर उचकटून १८ हजार, बिलाल इकबाल बागवान यांच्या किराणा दुकानातून ११ हजार रुपये, रवीचंद्र प्रदीप भाटे यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील तीनशे रुपये रोख व तीन आईस्क्रीमचे बॉक्स असा अठराशे रुपयांचा मुद्देमाल व नितीन रवींद्र शिंगटे यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातून ७ हजार रुपये रोख रक्कम याच चोरट्यांनी लंपास केली होती. तशी तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास गतिमान करण्यासाठी व आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी पथक तयार केले. या पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करीत सनी जाधव, अक्षय माळी, सागर जाधव तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पाचही दुकाने फोडली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने १७ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली. शहराच्या मध्यवस्तीमध्ये झालेल्या या चोऱ्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची वाई शहरातून धिंड काढण्यात येऊन व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचे काम करण्यात आले.