शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:28 IST

खटाव : ऐन सुगीच्या तोंडावर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याला आता आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. हातातोंडाशी आलेली ...

खटाव : ऐन सुगीच्या तोंडावर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याला आता आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. हातातोंडाशी आलेली पिके अनेक ठिकाणी भुईसपाट झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे. एकीकडे आगाप कांद्याची काढण्याची घाई, तर दुसरीकडे गहू, हरभरा, ज्वारी, आदी पिके काढण्याची वेळ आली असतानाच पावसाची हजेरी लावल्याने हातात आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या आगाप कांद्याच्या काढणीची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे उन्हाळी हंगामाचा कांदा पीक सर्वत्र जोमात असतानाच पाऊस व त्याचबरोबर पडलेल्या गारामुळे अत्यंत नाजूक असलेल्या या पिकावर असता मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येते आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवत आहे. कांद्याबरोबरच मागास असलेल्या गहू, हरभरा पिकांवर या बदललेल्या वातावरणाचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. आगाप कांद्याला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी त्याच्या काढणीच्या व काटणी करून मार्केटमध्ये पाठविण्याच्या गडबडीत आहेत. या बदललेल्या वातावरणाची त्याला देखील धास्ती बसली आहे. आता कुठे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळत असल्यामुळे त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह शेतात पळापळ करताना दिसत आहे. कांदा लागवडीनंतर मागीलवर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम उत्पादनावर झाला असल्यामुळे पहिल्यांदाच शेतकऱ्याला त्याच्या मालाला दर चढा मिळत आहे, तर दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यात सामान्य नागरिकांना कांदा चढ्या दराने खरेदी करावा लागत आहे. घाऊक बाजारात प्रति किलो कांदा ४० ते ५० रुपये दराने विकला जात आहे. नवीन उत्पादन बाजारात येईपर्यंत अस्मानी संकटाने जर असेच आक्रमण ठेवले तर मात्र कांदा उत्पादनात घट होणार आहे.

कोट..

स्वयंपाक घरात अत्यावश्यक असलेला कांद्याच्या वाढत्या दरामुळे गृहिणी व सर्वसामान्य लोकांचे बजेट मात्र चांगलेच कोलमडले आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी व निसर्गाच्या या बदलत्या रुपामुळे उत्पादनात घट येत आहे. आवक कमी झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने जोपर्यंत कांदा मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहतील.

- तानाजी यादव, कांदा व्यापारी

२१खटाव

कॅप्शन : कांद्याला असलेला वाढता दर, तसेच अवकाळीच्या भीतीने आगाप काढून ठेवलेल्या कडा भरणीच्या लगबगीत शेतकरी.