शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

एक रुपयात पीक विमा; रेकाॅर्ड ब्रेक नोंदणी, ९१ हजार शेतकऱ्यांचा सहभाग

By नितीन काळेल | Updated: July 28, 2023 19:42 IST

३१ जुलै अखेरची मुदत; संख्या आणखी वाढणार

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : अतिवृष्टी, दुष्काळ तसेच अन्य नैसर्गिक कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळवून देणारी पीक विमा योजना आता फक्त रुपया भरुन सुरू आहे. त्यामुळे सहभागी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आतापर्यंत ९१ हजार जणांनी सहभाग घेतलाय. तर ३१ जुलै शेवटीची मुदत असल्याने शेतकऱ्यांचा आकडा लाखाच्यावर जाणार हे स्पष्ट झाले आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग आदी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने २०२३ च्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना पुढे सुरु ठेवण्यास मान्यता दिलेली आहे. सातारा जिल्ह्यातही ही योजना लागू आहे. त्यानुसार भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद आणि खरीप कांदा या ९ पिकांसाठी ही योजना लागू आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदत आहे. या योजनेचे प्रमुख वैशिष्ठ म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया विमा हप्ता रक्कम भरावयाची आहे. तर उर्वरित विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे. खरीप हंगाम पीक योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील ९१ हजार ५०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. योजना सुरु झाल्यापासूनचा हा उच्चांक झाला आहे. तर कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभागी होता येत आहे.

शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरुन खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी होता येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत या योजनेत सहभाग घ्यावा. तसेच तसेच अधिक माहितीसाठी गाव पातळीवरील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाSatara areaसातारा परिसर