शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

मान्याचीवाडीत रानडुकरांकडून पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:14 IST

ढेबेवाडी : मान्याचीवाडी परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यातून कशीबशी वाचलेली पिके आता ...

ढेबेवाडी : मान्याचीवाडी परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यातून कशीबशी वाचलेली पिके आता रानडुकरांनी फस्त केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वनविभागाने या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ढेबेवाडी विभागात असलेल्या वाल्मीकच्या जंगलासह बहुतेक गावानजीकचे डोंगर आता बोडके झाले आहेत. घनदाट जंगलावर लाकूड चोरांनी हात मारल्याने घनदाट जंगलातील वनसंपदा नाहीशी झाली आहे. यामुळे जंगलात वास्तव्य करणारे हिंस्र प्राण्यांनी लोकवस्तीकडे धाव घेतली आहे. आतापर्यंत जंगलालगतच्या शेतावर हल्ला करणारे गवे, रानडुकरांसारखे प्राणी आता मानवी वस्तीलगतच्या शिवारातही राजरोस शिरकाव करत आहेत.

मान्याचीवाडी, काजारवाडी, शिद्रुकवाडी गावे आणि वस्त्या डोंगरालगत आहेत. येथे खरीप पिकाबरोबरच ऊसशेतीचेही मोठे क्षेत्र आहे. यावर्षी खरीप पेरणीनंतर पिकांना अपेक्षित वातावरण असल्याने भात, भुईमूग, सोयाबीन, हायब्रीड या पिकांनी जोर धरला होता. मात्र अचानक आलेले मुसळधार पाऊस आणि नदीला आलेला पूर यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्यातून बचावलेली पिके कशीबशी वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. त्यातच आता रानडुकरांकडून पिकांची मोठी नासधूस करण्याची मालिकाच सुरू झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वनविभागाने याची दखल घेऊन पिकांचे नुकसान करणाऱ्या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोट :

रानडुकरांच्या कळपांनी शेतीपिकांचे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घासही हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात हाताशी लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची मोठी झळ पोहोचली आहे. वनविभागाने यावर पर्याय काढावा.

- विठ्ठल माने,

शेतकरी मान्याचीवाडी.

फोटो ०१ मान्याचीवाडी

मान्याचीवाडी परिसरात रानडुकरांनी ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. (छाया : रवींद्र माने)