शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

मान्याचीवाडीत रानडुकरांकडून पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:14 IST

ढेबेवाडी : मान्याचीवाडी परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यातून कशीबशी वाचलेली पिके आता ...

ढेबेवाडी : मान्याचीवाडी परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यातून कशीबशी वाचलेली पिके आता रानडुकरांनी फस्त केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वनविभागाने या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ढेबेवाडी विभागात असलेल्या वाल्मीकच्या जंगलासह बहुतेक गावानजीकचे डोंगर आता बोडके झाले आहेत. घनदाट जंगलावर लाकूड चोरांनी हात मारल्याने घनदाट जंगलातील वनसंपदा नाहीशी झाली आहे. यामुळे जंगलात वास्तव्य करणारे हिंस्र प्राण्यांनी लोकवस्तीकडे धाव घेतली आहे. आतापर्यंत जंगलालगतच्या शेतावर हल्ला करणारे गवे, रानडुकरांसारखे प्राणी आता मानवी वस्तीलगतच्या शिवारातही राजरोस शिरकाव करत आहेत.

मान्याचीवाडी, काजारवाडी, शिद्रुकवाडी गावे आणि वस्त्या डोंगरालगत आहेत. येथे खरीप पिकाबरोबरच ऊसशेतीचेही मोठे क्षेत्र आहे. यावर्षी खरीप पेरणीनंतर पिकांना अपेक्षित वातावरण असल्याने भात, भुईमूग, सोयाबीन, हायब्रीड या पिकांनी जोर धरला होता. मात्र अचानक आलेले मुसळधार पाऊस आणि नदीला आलेला पूर यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्यातून बचावलेली पिके कशीबशी वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. त्यातच आता रानडुकरांकडून पिकांची मोठी नासधूस करण्याची मालिकाच सुरू झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वनविभागाने याची दखल घेऊन पिकांचे नुकसान करणाऱ्या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोट :

रानडुकरांच्या कळपांनी शेतीपिकांचे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घासही हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात हाताशी लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची मोठी झळ पोहोचली आहे. वनविभागाने यावर पर्याय काढावा.

- विठ्ठल माने,

शेतकरी मान्याचीवाडी.

फोटो ०१ मान्याचीवाडी

मान्याचीवाडी परिसरात रानडुकरांनी ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. (छाया : रवींद्र माने)