शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

कोविडपश्चात ‘अभ्यास विस्मृती’चे विद्यार्थ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविड काळात कुटुंबात उद‌्भवलेले ताण, समवयस्कांपासून दूर राहिल्याने तुटलेला संवाद, ऑनलाईन अभ्यासाने हाती आलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविड काळात कुटुंबात उद‌्भवलेले ताण, समवयस्कांपासून दूर राहिल्याने तुटलेला संवाद, ऑनलाईन अभ्यासाने हाती आलेल्या मोबाईलमधून गेमिंगचा पडलेला विळखा, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ‘ अभ्यास विस्मृती’चा त्रास जाणवू लागला आहे. या मानसिक अस्वस्थतेमुळे मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणंही कठीण होऊन बसलं आहे.

कोविड काळ संपून आयुष्य न्यू नॉर्मल होत असतानाच, आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. या वर्गांमध्ये मुलांनी शरीराने हजेरी लावली असली, तरीही देहाने अद्यापही इतर विश्वातच रममाण आहेत. वर्गात अभ्यास समजून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एकाग्रतेचा अभाव कोविडपश्चात अधिक दिसल्याचं शिक्षक सांगत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात सोशल कनेक्ट संपुष्टात आल्याने मुलं एकलकोंडी झाल्याच्या तक्रारी पालकांकडून मनोविकारतज्ज्ञांकडे आल्या आहेत. मानसशास्त्रीय भाषेत त्याला ‘एन्झायटी’ असंही संबोधले जाते. लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबांनी टोकाचे कलह अनुभवले. मोठ्यांच्यातील या वादाने चिमुकल्यांना हादरवून सोडले. जगात सर्वत्र न्यू नॉर्मल होत असलं, तरीही छोट्यांच्या विश्वात झालेली उलथापालथ अद्यापही शमली नाही. यातून बाहेर कसं पडावं, कोणाशी याविषयी बोलावं, या सर्वचबाबत त्यांचा झालेला कोंडमारा अव्यक्त राहिला. दिवसभर कामाच्या धबडग्यात मोठे नॉर्मल झाले असले, तरीही चिमुकल्यांच्या विश्वात अद्यापही आत्मिक द्वंद्व सुरूच आहे. याचा परिणाम यंदाच्या शैक्षणिक करिअरवर होणार आहे. पालकांनीही याचा विचार करून यंदा फार मोठ्या गुणांची अपेक्षा मुलांकडून करू नये, असं तज्ज्ञ सांगतात.

चौकट :

एन्झायटी डिप्रेशन वाढलं!

एन्झायटीकडे दुर्लक्ष केलं, तर ही स्थिती एन्झायटी अ‍ॅटककडे नेऊ शकते. यामध्ये मुलांमध्ये कायम भयाची भावना मनात राहते. काहीतरी वाईट किंवा चुकीचंच होणार, अशी त्यांची धारणा होते. वारंवार याच विचारात असणाऱ्या मुलांना आपल्या भावनांवरही नियंत्रण मिळवणं अनेकदा अवघड होऊन बसते. एन्झायटी अ‍ॅटकमध्ये व्यक्तीला सतत चिंता, भीती आणि अस्वस्थता जाणवते. हृदयाचे ठोके वाढतात आणि श्वास भरून येतो.

संवादाची पध्दती बदलणं आवश्यक!

कोविड काळात मानसिक कसोट्यांवर मोठ्यांचा जिथं टिकाव लागला नाही, तिथं छोट्यांची तर गोेष्टच वेगळी आहे. कौटुंबिक अस्थिरता, वैयक्तिक एकटेपण, शैक्षणिक गॅप आणि ऑनलाईन अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांच्या विश्वात उलथापालथ केली.

कोट :

कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या भावनांचा निचरा झाला नाही. परिणामी एन्झायटी डिप्रेशनच्या त्रासाला मुलांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी मुलांशी वेगळ्या पध्दतीने संवाद साधणं आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आवश्यक आहे.

डॉ. राजश्री देशपांडे, मनोविकारतज्ज्ञ