शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या बळावर १४०० जणांवर गुन्हे : पाटील-वारणा योजनेच्या विरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:13 IST

दानोळी येथून वारणेचे पाणी देणार नाही म्हटल्यावर सत्तेच्या बळावर १४00 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याच्या पाठीमागे इचलकरंजी व सरकारचे गौडबंगाल आहे. वारणाकाठच्या जनतेवर दबाव आणण्याचे कारस्थान यापुढे केले तर शिरोळ

ठळक मुद्देचिपरीत वारणा योजनेच्या विरोधात साखळी उपोषण

उदगाव : दानोळी येथून वारणेचे पाणी देणार नाही म्हटल्यावर सत्तेच्या बळावर १४00 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याच्या पाठीमागे इचलकरंजी व सरकारचे गौडबंगाल आहे. वारणाकाठच्या जनतेवर दबाव आणण्याचे कारस्थान यापुढे केले तर शिरोळ तालुका गप्प बसणार नाही आणि नको ते आरोप करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी धरणग्रस्तांच्या वसाहतींना आतापर्यंत का पाणी दिले नाही, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान आमदार उल्हास पाटील यांनी दिले.

वारणा बचाव कृती समितीच्यावतीने सुरू असलेले साखळी उपोषण चिपरी (ता. शिरोळ) येथे शुक्रवारी करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते. यावेळी स्वागत सरपंच धनपाल कनवाडे यांनी केले. प्रास्ताविक ‘आंदोलन अंकुश’चे अमोल राजगिरे यांनी केले. यावेळी वारणा बचाव समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, वारणाकाठच्या जनतेला गोड बोेलून वारणेचे पाणी इचलकरंजीला नेण्याचा डाव फसला आहे.

त्यामुळे नको ते उद्योग करीत वारणाकाठच्या जनतेला बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, कोणत्याही बदनामीला न घाबरता वारणेचे पाणी देणार नाही, असे सांगितले.जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर म्हणाले, पंचगंगा नदी उशाला असून, ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न न करता शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा डाव इचलकरंजीचा आहे. यामुळे शेतकºयांनी व वारणाकाठच्या नागरिकांनी जागृत राहावे, असे सांगितले.यावेळी उपसरपंच प्रवीण देसाई, बबन यादव, सुरेश भाटिया, भगवान कांबळे, रमेश रजपूत, रावसाहेब शेळके, हिंदुराव जगदाळे, श्रीवर्धन भोसले, सतीश मलमे, गुंडू दळवी, मानाजीराव भोसले, रघुनाथ होगले, प्रसाद धर्माधिकारी, बजरंग खामकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सत्तेच्या जिवावर कारनामेचिपरी येथे साखळी उपोषणात बोलताना शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, चार लाख लोकसंख्या असलेले इचलकरंजीचे लोकप्रतिनिधी सत्तेच्या जिवावर नको ते कारनामे करीत आहेत. तर वारणाकाठची लोकसंख्याही बारा लाखांहून अधिक आहे. याच्याविरोधात जर कारनामे करण्याचा घाट घातला असला तर अशांना वारणाकाठची जनता लवकरच जागा दाखवेल. त्यामुळे यापुढे विचार करून बोलावे, असा टोला त्यांनी नाव न घेता आमदार हाळवणकर यांना दिला.चिपरी (ता. शिरोळ) येथे अमृत योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या साखळी उपोषणात बोलताना आमदार उल्हास पाटील. व्यासपीठावर महादेव धनवडे, सुरेश कांबळे, बजरंग खामकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूक