शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सत्तेच्या बळावर १४०० जणांवर गुन्हे : पाटील-वारणा योजनेच्या विरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:13 IST

दानोळी येथून वारणेचे पाणी देणार नाही म्हटल्यावर सत्तेच्या बळावर १४00 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याच्या पाठीमागे इचलकरंजी व सरकारचे गौडबंगाल आहे. वारणाकाठच्या जनतेवर दबाव आणण्याचे कारस्थान यापुढे केले तर शिरोळ

ठळक मुद्देचिपरीत वारणा योजनेच्या विरोधात साखळी उपोषण

उदगाव : दानोळी येथून वारणेचे पाणी देणार नाही म्हटल्यावर सत्तेच्या बळावर १४00 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याच्या पाठीमागे इचलकरंजी व सरकारचे गौडबंगाल आहे. वारणाकाठच्या जनतेवर दबाव आणण्याचे कारस्थान यापुढे केले तर शिरोळ तालुका गप्प बसणार नाही आणि नको ते आरोप करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी धरणग्रस्तांच्या वसाहतींना आतापर्यंत का पाणी दिले नाही, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान आमदार उल्हास पाटील यांनी दिले.

वारणा बचाव कृती समितीच्यावतीने सुरू असलेले साखळी उपोषण चिपरी (ता. शिरोळ) येथे शुक्रवारी करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते. यावेळी स्वागत सरपंच धनपाल कनवाडे यांनी केले. प्रास्ताविक ‘आंदोलन अंकुश’चे अमोल राजगिरे यांनी केले. यावेळी वारणा बचाव समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, वारणाकाठच्या जनतेला गोड बोेलून वारणेचे पाणी इचलकरंजीला नेण्याचा डाव फसला आहे.

त्यामुळे नको ते उद्योग करीत वारणाकाठच्या जनतेला बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, कोणत्याही बदनामीला न घाबरता वारणेचे पाणी देणार नाही, असे सांगितले.जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर म्हणाले, पंचगंगा नदी उशाला असून, ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न न करता शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा डाव इचलकरंजीचा आहे. यामुळे शेतकºयांनी व वारणाकाठच्या नागरिकांनी जागृत राहावे, असे सांगितले.यावेळी उपसरपंच प्रवीण देसाई, बबन यादव, सुरेश भाटिया, भगवान कांबळे, रमेश रजपूत, रावसाहेब शेळके, हिंदुराव जगदाळे, श्रीवर्धन भोसले, सतीश मलमे, गुंडू दळवी, मानाजीराव भोसले, रघुनाथ होगले, प्रसाद धर्माधिकारी, बजरंग खामकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सत्तेच्या जिवावर कारनामेचिपरी येथे साखळी उपोषणात बोलताना शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, चार लाख लोकसंख्या असलेले इचलकरंजीचे लोकप्रतिनिधी सत्तेच्या जिवावर नको ते कारनामे करीत आहेत. तर वारणाकाठची लोकसंख्याही बारा लाखांहून अधिक आहे. याच्याविरोधात जर कारनामे करण्याचा घाट घातला असला तर अशांना वारणाकाठची जनता लवकरच जागा दाखवेल. त्यामुळे यापुढे विचार करून बोलावे, असा टोला त्यांनी नाव न घेता आमदार हाळवणकर यांना दिला.चिपरी (ता. शिरोळ) येथे अमृत योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या साखळी उपोषणात बोलताना आमदार उल्हास पाटील. व्यासपीठावर महादेव धनवडे, सुरेश कांबळे, बजरंग खामकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूक