शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

शाहूपुरीत नागरिकांच्या गाड्यांसह बेडूक उड्या सुरूच, डबक्यांच्या हंगामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 17:21 IST

पावसाळा सुरू झाला की वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून शाहूपुरी ग्रामस्थ रस्त्यावरून प्रवास करत असतात. रस्त्याच्या मधून चालणारे पादचारी आणि रस्त्याशेजारून जाणाऱ्या वाहनचालकांच्या गाड्या बेडूक उड्या मारत असल्याचे विचित्र चित्र शाहूपुरीत पाहायला मिळत आहे. कारण शाहूपुरीत आता खड्ड्यांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देडबक्यांच्या हंगामाला सुरुवात : यंदाही रस्त्याची चाळणतातडीने उपाययोजना करणे आवश्यक

सातारा : पावसाळा सुरू झाला की वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून शाहूपुरी ग्रामस्थ रस्त्यावरून प्रवास करत असतात. रस्त्याच्या मधून चालणारे पादचारी आणि रस्त्याशेजारून जाणाऱ्या वाहनचालकांच्या गाड्या बेडूक उड्या मारत असल्याचे विचित्र चित्र शाहूपुरीत पाहायला मिळत आहे. कारण शाहूपुरीत आता खड्ड्यांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे.वाहतुकीचे नियम सर्वांनाच सारखे असे म्हणतात. वाहनचालकाने गाडी रस्त्याच्या कोणत्या दिशेने चालवावी आणि पादचाऱ्यांनी कुठून चालावे? याचे संकेत ठरलेले आहेत. याची पायमल्ली करणाऱ्यांना शासन दरबारी दंडही भरावा लागतो; पण पावसाळा सुरू झाला की शाहूपुरी ग्रामस्थांवर नेमकं या पावसातच वाहतुकीचे सर्व नियम बाजूला ठेवून खड्डे चुकवत रस्त्यावरून जाण्याची वेळ आली आहे.शहराचे उपनगर म्हणून शाहूपुरीचा विशेष परिचय आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शाहूपुरीमध्ये राहणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाचा विस्तार शाहूपुरीच्या दिशेने होत असल्याने शहराचे महत्त्वपूर्ण अंग म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. मात्र, त्या मानाने नागरी सुविधांचा अभाव रस्त्यांकडे पाहिले असता जाणवतो.

शाहूपुरीच्या स्थापनेपासून तेथील रस्त्यांवर विविध माध्यमांतून विनोद झाले आहेत. वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील स्थानिकांची रस्त्यांबाबत घोर निराशाच झाली आहे. पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून ही गत गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ अनुभवत आहेत.शाहूपुरीत राहणाऱ्या अनेकांना नोकरी, बाजारपेठ, शाळा, व्यवसाय, कॉलेज या कारणांसाठी दिवसातून किमान एक-दोनदा शहरात यावे लागते. तसेच शाहूपुरीला जोडून अनेक ग्रामीण भागाला हाच रस्ता जोडला गेला आहे, त्यामुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते.या वर्दळीवर नियंत्रण आणून वाहतुकीचे काही नियम लागू होण्याची चिन्हे नाहीतच; पण पावसाळ्यातील या रस्त्यावरील प्रवास धोकादायक ठरू पाहत आहे.

रस्त्यावर साठलेल्या खड्ड्यांतील पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. तर वाहनांमुळे खड्ड्यांतील पाणी अंगावर उडू नये, यासाठी पादचाऱ्यांची कसरत सुरू असते. शाहूपुरीवासीयांना या बेडूक उड्यांपासून वाचविण्यासाठी नव्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा या रस्त्यावरून प्रवास करणाºयांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर