शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पालिकेला खेचणार कोर्टात

By admin | Updated: December 9, 2014 00:34 IST

सुशांत मोरे : अवैध बांधकामांबाबत दिली ३१ डिसेंबर पर्यंत मुदत

सातारा : शहरातील अवैध बांधकामाबाबत पालिकेने आश्वासन देऊनही कारवाई न केल्याने येथील दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी न्यायालयीन लढा देण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून पालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत अतिक्रमणे हटविली नाहीत तर पालिकेला न्यायालयात खेचणार असल्याचे सुशांत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. मोरे यांनी माहिती अधिकाराखाली शहरातील अवैध बांधकामांची माहिती मागविली होती. ४९९ इतकी अनधिकृत बांधकामे या माहितीत पुढे आली होती. ही बांधकामे पालिकेने त्वरित हटवावीत, या मागणीसाठी मोरे यांनी पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. पालिकेने कारवाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर मोरे यांनी उपोषण मागे घेतले. २००८ पासून ही बांधकामे पालिका प्रशासनाने पाडली नाहीत. तसेच आश्वासनानंतरही बड्या धेंडांच्या अतिक्रमणांना पालिकेने हात घातलाच नाही. शास्तीच्या नोटीसा बजावूनही संबंधितांनी दंडाची रक्कम पालिकेच्या खजिन्यात भरली नाही. मोरे यांच्या उपोषणानंतर पालिकेने १५ दिवस काही सर्वसामान्य नागरिकांची अतिक्रमणे काढत असल्याचे चित्र भासवले. मात्र, धनदांडगे, व्यापारी, नगरसेवक व काही नागरिक यांची अनधिकृत बांधकामे पाडलीच नाहीत. उलट या बांधकामांकडे दुर्लक्षच केले. नगररचनाकार व भागनिरीक्षक यांनी आर्थिक साटेलोटे करुन संबंधित अवैध बांधकामांकडे पाठ फिरविली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वत: लक्ष घालूनही पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. भवानी पेठ, सदाशिव पेठ, खणआळी, सदरबझार, शनिवार पेठ, पोवईनाका इ. परिसरातील अतिक्रमणे तातडीने पाडावीत. नागरिकांना चांगले रस्ते, फूटपाथ, वाहतुकीची समस्या इ. मूलभूत गरजा पालिकेने द्याव्यात, तसेच दरम्यान, दहावी-बारावी शिक्षण घेतलेले लोक भागनिरीक्षक म्हणून काम करत असल्याने या अडचणी निर्माण झाल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)