शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

पालिकेला खेचणार कोर्टात

By admin | Updated: December 9, 2014 00:34 IST

सुशांत मोरे : अवैध बांधकामांबाबत दिली ३१ डिसेंबर पर्यंत मुदत

सातारा : शहरातील अवैध बांधकामाबाबत पालिकेने आश्वासन देऊनही कारवाई न केल्याने येथील दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी न्यायालयीन लढा देण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून पालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत अतिक्रमणे हटविली नाहीत तर पालिकेला न्यायालयात खेचणार असल्याचे सुशांत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. मोरे यांनी माहिती अधिकाराखाली शहरातील अवैध बांधकामांची माहिती मागविली होती. ४९९ इतकी अनधिकृत बांधकामे या माहितीत पुढे आली होती. ही बांधकामे पालिकेने त्वरित हटवावीत, या मागणीसाठी मोरे यांनी पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. पालिकेने कारवाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर मोरे यांनी उपोषण मागे घेतले. २००८ पासून ही बांधकामे पालिका प्रशासनाने पाडली नाहीत. तसेच आश्वासनानंतरही बड्या धेंडांच्या अतिक्रमणांना पालिकेने हात घातलाच नाही. शास्तीच्या नोटीसा बजावूनही संबंधितांनी दंडाची रक्कम पालिकेच्या खजिन्यात भरली नाही. मोरे यांच्या उपोषणानंतर पालिकेने १५ दिवस काही सर्वसामान्य नागरिकांची अतिक्रमणे काढत असल्याचे चित्र भासवले. मात्र, धनदांडगे, व्यापारी, नगरसेवक व काही नागरिक यांची अनधिकृत बांधकामे पाडलीच नाहीत. उलट या बांधकामांकडे दुर्लक्षच केले. नगररचनाकार व भागनिरीक्षक यांनी आर्थिक साटेलोटे करुन संबंधित अवैध बांधकामांकडे पाठ फिरविली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वत: लक्ष घालूनही पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. भवानी पेठ, सदाशिव पेठ, खणआळी, सदरबझार, शनिवार पेठ, पोवईनाका इ. परिसरातील अतिक्रमणे तातडीने पाडावीत. नागरिकांना चांगले रस्ते, फूटपाथ, वाहतुकीची समस्या इ. मूलभूत गरजा पालिकेने द्याव्यात, तसेच दरम्यान, दहावी-बारावी शिक्षण घेतलेले लोक भागनिरीक्षक म्हणून काम करत असल्याने या अडचणी निर्माण झाल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)