शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

मिरगावला दाम्पत्याचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

कोयनानगर : कोयना भागातील मिरगाव येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले दोन मृतदेह रविवारी आढळून आले. एनडीआरएफ व स्थानिक ग्रामस्थांकडून या ...

कोयनानगर : कोयना भागातील मिरगाव येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले दोन मृतदेह रविवारी आढळून आले. एनडीआरएफ व स्थानिक ग्रामस्थांकडून या ठिकाणी दिवसभर बचावकार्य राबविण्यात आले. दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यानी मिरगाव-हुंबरळी येथील घटनास्थळाची पाहणी करून स्थलांतरित कुटुंबीयांची भेट घेतली.

मिरगाव येथे रविवारी सायंकाळपर्यंत वसंत धोंडिबा बाकाडे व कमल वसंत बाकाडे दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला. तर देवजी बापू बाकाडे व शेवंता देवजी बाकाडे यांचा शोध सुरू आहे. कोयना भागात झालेल्या भूस्खलनामुळे १६ जणांना जीवन गमावावा लागला आहे. यामध्ये मिरगाव ११, ढोकावळे ४ तर हुंबरळी १ व्यक्तीचा समावेश आहे. यापैकी १४ मृतदेह आढळून आले असून, त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी मिरगाव, गोकूळनाला, बाजे, हुंबरळी, नवजा येथील सुमारे ५०० ग्रामस्थांना कोयनानगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तर ढोकावळे येथील १२५ जणांना चाफेर येथे स्थलांतरित केले आहे.