शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

मिरगावला दाम्पत्याचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

कोयनानगर : कोयना भागातील मिरगाव येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले दोन मृतदेह रविवारी आढळून आले. एनडीआरएफ व स्थानिक ग्रामस्थांकडून या ...

कोयनानगर : कोयना भागातील मिरगाव येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले दोन मृतदेह रविवारी आढळून आले. एनडीआरएफ व स्थानिक ग्रामस्थांकडून या ठिकाणी दिवसभर बचावकार्य राबविण्यात आले. दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यानी मिरगाव-हुंबरळी येथील घटनास्थळाची पाहणी करून स्थलांतरित कुटुंबीयांची भेट घेतली.

मिरगाव येथे रविवारी सायंकाळपर्यंत वसंत धोंडिबा बाकाडे व कमल वसंत बाकाडे दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला. तर देवजी बापू बाकाडे व शेवंता देवजी बाकाडे यांचा शोध सुरू आहे. कोयना भागात झालेल्या भूस्खलनामुळे १६ जणांना जीवन गमावावा लागला आहे. यामध्ये मिरगाव ११, ढोकावळे ४ तर हुंबरळी १ व्यक्तीचा समावेश आहे. यापैकी १४ मृतदेह आढळून आले असून, त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी मिरगाव, गोकूळनाला, बाजे, हुंबरळी, नवजा येथील सुमारे ५०० ग्रामस्थांना कोयनानगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तर ढोकावळे येथील १२५ जणांना चाफेर येथे स्थलांतरित केले आहे.