शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

देश कोणाची खासगी मालमत्ता नाही!

By admin | Updated: November 26, 2015 03:03 IST

आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आमीर खानने केलेले असहिष्णुतेचे वक्तव्य हा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे.

कऱ्हाड : आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आमीर खानने केलेले असहिष्णुतेचे वक्तव्य हा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. काही जण त्याला चुकीच्या पद्धतीने विरोध करून त्याने मांडलेल्या विचाराला बळकटी देत आहेत. चुकीच्या पद्धतीने विरोध हीच खरी असहिष्णुता आहे. त्याला देश सोडायला काही जण सांगतात; परंतु हा देश म्हणजे कोणाची खासगी मालमत्ता नाही, अशा भाषेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबंधितांना फटकारले.येथील वेणुताई चव्हाण स्मारकात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशाने आमीरला खूप मोठी प्रसिद्धी व पैसा दिला, असे टीकाकार म्हणत असले तरी, त्याने ते आपल्या कलेतून मिळविलेले आहे. त्याला कुणी देणगी दिलेली नाही, असे सांगून पवार म्हणाले, असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची सरकारने तयारी केली आहे. त्यामुळे संसदेत याबाबत सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा वाटते. सध्याचे केंद्र शासन लोकांचे प्रश्न सोडविताना दिसत नाही. जे काही ऐकायला मिळते ते देशाबाहेर, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.कृषिमंत्री एकनाथ खडसे म्हणतात त्याप्रमाणे भरघोस मदत मिळाली तर त्यांचे कौतुकच करावे लागेल. आज साखरेचे भाव पाहता एफआरपी देण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपयांचा फरक पडतो, त्यामुळे शासनाच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांना एफआरपी देणे कारखानदारांना अवघड पडेल, असेहीे पवारांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सचिवांना दोष कशाला ? अनेक वर्षे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहोत. मात्र अधिकारी ऐकत नाही, असा अनुभव आजवर कधीही आला नाही. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांचे अधिकारी ऐकत नाहीत, हे वक्तव्य विचार करायला लावणारे असून, अनेक बाबींना जर मंत्री जबाबदार असतील तर सचिवांना दोष देण्यात काय अर्थ, असेही त्यांनी सांगितले. ‘मध्यावधी निवडणुकी’चे आश्चर्य वाटायला नको ! : मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. जनता सध्या परिवर्तनाच्या भूमिकेत असून निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस-राष्ट्रवादीच योग्य पर्याय देऊ शकतो. मात्र, काँग्रेसबरोबर याबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, त्यांच्याकडून असा प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला योग्य प्रतिसाद देऊ, असेही पवार म्हणाले.