शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

CoronaVirus Lockdown : वीटभट्टी कामगारांना घरी जाण्याची परवानी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:33 IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. यासाठी वीट व्यवसायही बंद ठेवला आहे. त्यामुळे कामगार बसूनच आहेत. संपूर्ण राज्यामध्ये विखुरलेल्या वीटभट्टी कामगारांनाही ऊसतोड कामगारांप्रमाणे घरी जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शाम राजे यांनी केली आहे.

ठळक मुद्देवीटभट्टी कामगारांना घरी जाण्याची परवानी द्या : शाम राजे कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यापासून कामगार बसून

मायणी : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. यासाठी वीट व्यवसायही बंद ठेवला आहे. त्यामुळे कामगार बसूनच आहेत. संपूर्ण राज्यामध्ये विखुरलेल्या वीटभट्टी कामगारांनाही ऊसतोड कामगारांप्रमाणे घरी जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शाम राजे यांनी केली आहे.शाम राजे म्हणाले, ह्यराज्यामध्ये कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय वीटभट्टी आहे. भट्टी व्यवसायासाठी आवश्यक असणारे कामगार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातून येत असतात. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये पाण्याची कमतरता व मातीच्या अभावामुळे दरवर्षीचा व्यवसाय एप्रिल महिन्यामध्ये अनेक वीट व्यावसायिक वीट थापणी बंद ठेवत असतात.शासनामार्फत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण वीट व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून हे वीटभट्टी कामगार बसून आहेत. त्यांच्या हाताला कोणत्याही प्रकारचे काम नाही तसेच यावर्षीचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या पाच ते सहा महिने चालणारा हा उद्योग असल्याने हे कामगार दरवर्षी एप्रिल महिन्यांमध्येच आपल्या घरी परतत असतात.यंदा मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शासनामार्फत संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये जिल्हाबंदीचे आदेश काढल्यामुळे हे वीटभट्टी कामगार आपापल्या ठिकाणी कामाविना थांबून आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार राज्य शासनाने ऊसतोड कामगारांना घरी जाण्याची परवानगी दिली.

शासनाने ऊसतोड कामगारांप्रमाणे या वीटभट्टी कामगारांना घरी जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालयांमध्ये ई-मेलद्वारे करण्यात आली आहे.शासनाने कुंभार समाजाच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून गेल्या महिन्यापासून बसून असलेल्या व यावर्षी हंगाम संपूनही वीटकाम थांबलेल्या या वीटभट्टी कामगारांना आपल्या जिल्ह्यामध्ये व राज्यांमध्ये परत जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शाम राजे यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर