शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

CoronaVirus : महामारीच्या प्रादुर्भावात विम्याचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:52 IST

कोरोना महामारीशी राज्यातील २७ हजार ५०० सरपंच ताकदीने सामना करत आहेत. राज्य शासनाने सरपंचांना ५० लाखांचे विमा कवच लागू केल्याने सरपंचांना मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यातील १४०० सरपंचांना या विम्याचे संरक्षण मिळाले आहे.

ठळक मुद्देमहामारीच्या प्रादुर्भावात विम्याचा आधार!सरपंचांना दिलासा : सातारा जिल्ह्यातील १४०० सरपंचांना लाभ

सातारा : कोरोना महामारीशी राज्यातील २७ हजार ५०० सरपंच ताकदीने सामना करत आहेत. राज्य शासनाने सरपंचांना ५० लाखांचे विमा कवच लागू केल्याने सरपंचांना मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यातील १४०० सरपंचांना या विम्याचे संरक्षण मिळाले आहे.कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्तीमध्ये गावपातळीवर ग्रामसमित्या स्थापन केल्या आहेत. शासनाने दिलेल्या सूचना लोकांपर्यंत पोहोचवणे. परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांना नियमांची अंमलबजावणी करत विलगीकरण कक्षात दाखल करण्याचे काम ग्रामसमित्या करत आहेत. त्यामुळे ग्रामसमितीचे अध्यक्ष असणारे सरपंच यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे लोक त्यांच्या थेट संपर्कात येत असतात. यामुळे त्यांना धोका निर्माण होऊ शकतो.या मागणीची दखल सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा घडवून आणत याबद्दल मागणी केली. या विमा कवचाचा फायदा राज्यातील २७५०० सरपंचांना मिळणार आहे. प्रत्येक गावातील सरपंचांचा ५० लाखांचा विमा या माध्यमातून निघणार आहे.दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर्स, संगणक आॅपरेटर, नर्सेस यांना देखील शासनाने प्रत्येकी २५ लाखांचे विमा कवच दिले असल्याने त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना महामारीशी लढत असताना सरपंचांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.

गावाबाहेरून आलेल्या लोकांशी त्यांचा निकटचा संपर्क येत होता. जिल्ह्यात जे कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ९० टक्के लोक हे मुंबई, ठाणे, पुणे येथून प्रवास करून आलेले लोक आहेत. त्यामुळे सरपंचांना कोरोनाची व्याधी होण्याची शक्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर विमा कवच मिळाल्याने सरपंचांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ग्रामीण भागामध्ये सरपंच हे सध्याच्या कोरोनाच्या लढाईत अत्यंत उत्कृष्ट काम करीत आहेत. ते आपल्या जीवाची पर्वा न करता कृती समिती अध्यक्ष म्हणून गावातील नागरिकांची काळजी आणि सुरक्षितता जपत आहे. सरपंच परिषदेच्या मागणीला शासनाने प्रतिसाद दिला आहे.-जितेंद्र भोसले, खजिनदार, सरपंच परिषद महाराष्ट्र मुंबई

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर