शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

कोरोना जनजागृतीत कोणतीही कसूर नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासन व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासन व आरोग्य विभाग सक्षमपणे काम करीत आहे. असे असले तरी नागरिकांमध्ये अजूनही कोरोनाचे गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम व्यापक स्वरूपात राबवावी. त्यात कोणतीही कसूर ठेवू नये, अशा सूचना नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केल्या.

शहरातील कोरोना परिस्थिती, आरोग्य व कोरोना विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या उपायोजना, लसीकरण, आदींचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात शुक्रवारी सकाळी बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्य सभापती अनिता घोरपडे, आरोग्य विभागप्रमुख सुहास पवार, कोरोना विभागप्रमुख प्रणव पवार, कस्तुरबा रुग्णालयाचे डॉ. दीपक थोरात, डॉ. रोहिणी सुर्वे, नगराध्यक्ष यांचे स्वीय सहायक अतुल दिसले, आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रेते, दुकानदार, व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. या चाचणीत काही व्यापाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून चाचणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जात आहे. नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे, अशी माहिती आरोग्य व कोरोना विभागाकडून देण्यात आले, तर पालिकेच्या कस्तुरबा व गोडोली येथील रुग्णालयात लसीकरण नियोजनबद्ध सुरू असून, नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.

शहरात कोरोनाची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती करावी. शहरातील प्रत्येक प्रभागात ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून नागरिकांना फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अशा सूचना द्याव्यात. गरज भासल्यास पोलीस प्रशासनाचीदेखील मदत घ्यावी. दि. ५ एप्रिलपासून शहरात जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी अधिकाऱ्यांना केल्या.