शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

corona virus-रोजंदारी कामगारांची व्यथा,अनेकांनी वळविला मुळ गावाकडे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:35 IST

सकाळी काम केल्यावर रात्री अन्न शिजते त्या रोजंदार कामगारांची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. ‘आम्ही कोरोनाने नाही उपासमारीने मरू’ असे हतबल उद्गार त्यांच्या तोंडून येत आहेत.

ठळक मुद्दे हाताला काम नसल्यामुळे दोन वेळचं अन्न मिळणंही झालंय मुश्किलअनेकांनी वळविला मुळगावाकडे मोर्चा

प्रगती जाधव-पाटीलसातारा : कोरोनाबाबत साताऱ्यात अद्याप जरी सकारात्मक चित्र असलं तरी पुढील आठ दिवस अजूनही कसोटीचे आहेत. या परिस्थितीत नोकरवर्गाला ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय उपलब्ध आहे. पण ज्यांच्याकडे सकाळी काम केल्यावर रात्री अन्न शिजते त्या रोजंदार कामगारांची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. ‘आम्ही कोरोनाने नाही उपासमारीने मरू’ असे हतबल उद्गार त्यांच्या तोंडून येत आहेत.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणी जमावबंदी आदेश लागु केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच धार्मिक उत्सवही बंद केल्याने अनेकांच्या हाताचे काम गेले आहे. परिणामी कोणी काम देता काम असं म्हणत त्यांना दारोदारी फिरायची वेळ आली आहे.

सातारा येथे राजवाडा परिसरात वेठबिगारी कामे करणारे कामगार रोज सकाळी आठच्या सुमारास हजेरी लावतात. कंत्राटदार येथून रोजाची बोलणी करून त्यांना कामाच्या ठिकाणी घेवून जातात. रोजच्या रोज काम करून हातात मिळणाऱ्या पैशांतून त्यांचा उदरनिर्वाह होतो. पण कोरोनाच्या संकटामुळे या सर्वांच्या रोजगाराचे वांदे झाले आहेत.

ग्रामीण भागातून रोजासाठी येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे, मात्र, त्यांनी शेतात काम करून अर्थाजनाचा मार्ग शोधला आहे. पण शहरी भागात राहणाऱ्या कामगारांना शेतीच्या कामाचा पर्याय नसल्याने ते समोर येईल ते काम करण्यासाठी रोजंदारीच्या शोधात फिरत आहेत.

काही वेठबिगाऱ्यांनी हॉटेलात तर कोणी स्वच्छतेचे काम स्विकारून आपला एकएक दिवसाचा रोजगार मिळविला. भविष्यात मात्र, हे स्थिती अधिक गंभीर होईल, हे निश्चित!

जीवनावश्यक वस्तुंसाठी आप्तकालीन कक्षाची गरजजिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारकरांना गर्दी करण्याचे टाळा असे आवाहन केले आहे. परिणामी अनेक सातारकरांनी घरात राहणंच पसंत केलं आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय आणि व्यापार परिणाम झाला आहे.

नोकरदार सुट्टी काढून तर व्यावसायिकांचा व्यवसाय सुरू ठेवून उदरनिर्वाह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे वांदे झाले आहेत. शासन स्तरावर अशा लोकांची माहिती संकलित करून त्यांनाही जिवनावश्यक वस्तु उपलब्ध करून देण्यासाठी आप्तकालीन कक्षाची उभारणी करणं आवश्यक बनलं आहे.राजवाडा चौपाटीचाही अनेकांना फटकाराजवाडा चौपाटी हे खाद्याचं ठिकाण अनेकांच्या आवडीचं आहे. कित्येकांची क्षुधाशांती करणारे हे ठिकाण तब्बल अडीचशेहून अधिक कुटूंबांना आधार देतं. यातील बहुतांश लोक रोजच्या रोज मिळणाऱ्या उत्पन्नावरच घर चालवतात. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर ३१ मार्चपर्यंत चौपाटी बंद ठेवण्यात आली आहे. याचाही मोठा फटका येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. यातील बाहेरगावचे व्यापारी इथं राहून खर्च करण्यापेक्षा आपापल्या गावी परतले आहेत.

चौपाटी बंद झाल्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे सर्वाधिक हाल झाले. काही कारणांनी पूर्वी चौपाटी बंद असली तरीही घरगुती कार्यक्रमांच्या आॅर्डर मिळवून विक्रेते त्यांच्या झालेला खडा भरून काढायचे. आता मात्र सर्वावरच बंधने आल्याने इथं राहून खर्च वाढविण्यापेक्षा मिळेल त्या वाहनाने कामगार गावी गेले आहेत.- देवेंद्र शर्मा,चौपाटी व्यावसायिक, सातारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर