शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

corona virus-रोजंदारी कामगारांची व्यथा,अनेकांनी वळविला मुळ गावाकडे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:35 IST

सकाळी काम केल्यावर रात्री अन्न शिजते त्या रोजंदार कामगारांची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. ‘आम्ही कोरोनाने नाही उपासमारीने मरू’ असे हतबल उद्गार त्यांच्या तोंडून येत आहेत.

ठळक मुद्दे हाताला काम नसल्यामुळे दोन वेळचं अन्न मिळणंही झालंय मुश्किलअनेकांनी वळविला मुळगावाकडे मोर्चा

प्रगती जाधव-पाटीलसातारा : कोरोनाबाबत साताऱ्यात अद्याप जरी सकारात्मक चित्र असलं तरी पुढील आठ दिवस अजूनही कसोटीचे आहेत. या परिस्थितीत नोकरवर्गाला ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय उपलब्ध आहे. पण ज्यांच्याकडे सकाळी काम केल्यावर रात्री अन्न शिजते त्या रोजंदार कामगारांची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. ‘आम्ही कोरोनाने नाही उपासमारीने मरू’ असे हतबल उद्गार त्यांच्या तोंडून येत आहेत.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणी जमावबंदी आदेश लागु केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच धार्मिक उत्सवही बंद केल्याने अनेकांच्या हाताचे काम गेले आहे. परिणामी कोणी काम देता काम असं म्हणत त्यांना दारोदारी फिरायची वेळ आली आहे.

सातारा येथे राजवाडा परिसरात वेठबिगारी कामे करणारे कामगार रोज सकाळी आठच्या सुमारास हजेरी लावतात. कंत्राटदार येथून रोजाची बोलणी करून त्यांना कामाच्या ठिकाणी घेवून जातात. रोजच्या रोज काम करून हातात मिळणाऱ्या पैशांतून त्यांचा उदरनिर्वाह होतो. पण कोरोनाच्या संकटामुळे या सर्वांच्या रोजगाराचे वांदे झाले आहेत.

ग्रामीण भागातून रोजासाठी येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे, मात्र, त्यांनी शेतात काम करून अर्थाजनाचा मार्ग शोधला आहे. पण शहरी भागात राहणाऱ्या कामगारांना शेतीच्या कामाचा पर्याय नसल्याने ते समोर येईल ते काम करण्यासाठी रोजंदारीच्या शोधात फिरत आहेत.

काही वेठबिगाऱ्यांनी हॉटेलात तर कोणी स्वच्छतेचे काम स्विकारून आपला एकएक दिवसाचा रोजगार मिळविला. भविष्यात मात्र, हे स्थिती अधिक गंभीर होईल, हे निश्चित!

जीवनावश्यक वस्तुंसाठी आप्तकालीन कक्षाची गरजजिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारकरांना गर्दी करण्याचे टाळा असे आवाहन केले आहे. परिणामी अनेक सातारकरांनी घरात राहणंच पसंत केलं आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय आणि व्यापार परिणाम झाला आहे.

नोकरदार सुट्टी काढून तर व्यावसायिकांचा व्यवसाय सुरू ठेवून उदरनिर्वाह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे वांदे झाले आहेत. शासन स्तरावर अशा लोकांची माहिती संकलित करून त्यांनाही जिवनावश्यक वस्तु उपलब्ध करून देण्यासाठी आप्तकालीन कक्षाची उभारणी करणं आवश्यक बनलं आहे.राजवाडा चौपाटीचाही अनेकांना फटकाराजवाडा चौपाटी हे खाद्याचं ठिकाण अनेकांच्या आवडीचं आहे. कित्येकांची क्षुधाशांती करणारे हे ठिकाण तब्बल अडीचशेहून अधिक कुटूंबांना आधार देतं. यातील बहुतांश लोक रोजच्या रोज मिळणाऱ्या उत्पन्नावरच घर चालवतात. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर ३१ मार्चपर्यंत चौपाटी बंद ठेवण्यात आली आहे. याचाही मोठा फटका येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. यातील बाहेरगावचे व्यापारी इथं राहून खर्च करण्यापेक्षा आपापल्या गावी परतले आहेत.

चौपाटी बंद झाल्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे सर्वाधिक हाल झाले. काही कारणांनी पूर्वी चौपाटी बंद असली तरीही घरगुती कार्यक्रमांच्या आॅर्डर मिळवून विक्रेते त्यांच्या झालेला खडा भरून काढायचे. आता मात्र सर्वावरच बंधने आल्याने इथं राहून खर्च वाढविण्यापेक्षा मिळेल त्या वाहनाने कामगार गावी गेले आहेत.- देवेंद्र शर्मा,चौपाटी व्यावसायिक, सातारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर