शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

corona virus : कोरोनाग्रस्त साताऱ्याला राज्य शासनाने वाचवावे : लोकप्रतिनिधींचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 12:51 IST

कोरोना महामारीचे संकट काळ बनूल आले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या साडेसतरा हजारांच्यावर गेली असून रोज १५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आॅक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाही तर बेडही उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती असून राज्य शासनाने जिल्ह्याला कोरोना महामारीपासून वाचवावे, यासाठी जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात आग्रह धरणार आहेत.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा आग्रह : कोरोनाग्रस्त साताऱ्याला राज्य शासनाने वाचवावेपावसाळी अधिवेशनात महामारीवरच होणार चर्चा

सागर गुजरसातारा : कोरोना महामारीचे संकट काळ बनूल आले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या साडेसतरा हजारांच्यावर गेली असून रोज १५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आॅक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाही तर बेडही उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती असून राज्य शासनाने जिल्ह्याला कोरोना महामारीपासून वाचवावे, यासाठी जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात आग्रह धरणार आहेत.जिल्ह्यामध्ये अनलॉकच्या आधी दिवसाकाठी सरासरी १00 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. राज्यात अनलॉक झाल्यानंतर मात्र या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे ४६२ लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर एका दिवसात ९00 च्यावर कोरोनाबाधित रुग्ण आता आढळू लागले आहेत. ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जी रुग्णालये शासनाने ताब्यात घेतली आहेत, त्या रुग्णालयांमध्ये बेडची संख्या कमी पडत आहे तर आॅक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेडमिसीवीर इंजेक्शन अपुरे पडत असल्याने अत्यवस्थ रुग्ण दगावत आहेत. आरोग्य यंत्रणाही आता थकल्याचे चित्र आहे.सोमवार व मंगळवारी (दि. ७, दि. ८) पावसाळी अधिवेशनाचे कामकाज मुंबईत होणार आहे. या अधिवेशनातील प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर प्रश्नांवर चर्चा होणार नाही. मात्र जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने आमदार उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याच्या तयारीत आहेत. साताऱ्यात कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे, त्यासाठी निधी उपलब्ध करत असताना तांत्रिक बाबींमध्ये न अडकता शासनाने निधी उपलब्ध करण्याची मागणी आ. जयकुमार गोरे हे अधिवेशनावेळी करणार आहेत.कास परिसरातील खासगी जागेत झालेली बांधकामे नियमित करावीत तसेच उरमोडीच्या सातारा तालुक्यातील कालव्यांसाठी ५0 कोटींची मागणी केली असून त्यासाठी पाठपुरावा करत असल्याची माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. तसेच जिहे-कठापूर योजनेचे पाणी उत्तर कोरेगाव, पूर्व कोरेगाव तसेच खटाव तालुक्यातील नेर धरणाच्या वरच्या भागात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले. 

साताऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम लवकरात लवकर सुरु करणे अत्यावश्यक आहे. हे महाविद्यालय व हॉस्पिटल तयार असते तर आत्तासारखी धावाधाव करावी लागली नसती. कोविड महामारीतून बोध घेऊन मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी आग्रह धरणार आहे.- आमदार जयकुमार गोरे

आरोग्य विभागामध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. अनेक वर्षे भरतीच झाली नसल्याने महामारीचा कहर रोखणे कठीण होऊन बसले आहे. डॉक्टरांसह तज्ञ वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आग्रह धरणार आहे.- आमदार महेश शिंदे

कोरोनाच्या महामारीमुळे पावसाळी अधिवेशन हे अवघ्या दोन दिवसांचे असणार आहे. प्रश्नोत्तराचा तासही होणार नाही. मात्र तरी देखील या अधिवेशनात जिल्ह्यातील समस्यांविषयी प्रश्न उपस्थित करणार आहे. सातारा तालुक्यातील उरमोडी धरणाच्या कालव्यांच्या कामांसाठी आग्रह धरणार आहे.- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर