शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

corona virus Goa Border : गोव्यात कामाला जाणाऱ्यांना दिलासा, ई पासची अट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 12:21 IST

CoronaVIrus Goa Sindhudurg Border : गोव्यात कामासाठी जाणार्‍या युवक-युवतींना ई-पासची गरज नाही.पुढील दोन ते तीन दिवसासाठी त्यांना सुट देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या कामावरील ओळखपत्र कींवा ग्रामपंचायत मधील ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना सुट देण्यात येणार आहे.  याबाबत लवकरच तहसिलदार राजाराम म्हात्रे बैठक घेऊन तशा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाला देणार आहे.

ठळक मुद्देगोव्यात कामाला जाणाऱ्यांना दिलासा, ई पासची अट रद्द ग्रामपंचायत पत्र, कामावरील ओळखपत्र बंधनकारक, रूपेश राऊळ यांचा पुढाकार

सावंतवाडी :गोव्यात कामासाठी जाणार्‍या युवक-युवतींना ई-पासची गरज नाही.पुढील दोन ते तीन दिवसासाठी त्यांना सुट देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या कामावरील ओळखपत्र कींवा ग्रामपंचायत मधील ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना सुट देण्यात येणार आहे.  याबाबत लवकरच तहसिलदार राजाराम म्हात्रे बैठक घेऊन तशा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाला देणार आहे. याबाबत चा तोडगा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलून काढला तसेच पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी ही राऊळ यांच्या तोडग्याला मान्यता दिली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात युवक युवती गोव्यात रोजगार तसेच शिक्षणासाठी जातात मात्र गोव्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्याप्रमाणात मिळत आहेत.त्याचा प्रसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी ई पास ची अट घातली होती पण या अटी मुळे गोव्यातून येणाऱ्या ना मोठा फटका बसल्याने सर्वच राजकीय पक्ष आपल्या परीने तोडगा काढत आहेत.

त्याप्रमाणेच तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी गोव्यात जाणाऱ्यासाठी ई-पासची अट तात्पुरती रद्द केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसासाठी त्यामधून सुट देण्यात आली आहे.तसेच नंतर त्यांच्या कामावरील ओळखपत्र कींवा ग्रामपंचायत मधील ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना सुट देण्यात येणार आहे.यासाठी राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली तसेच त्यानंतर पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी ही पालकमंत्री सामंत यांच्या आदेशाला अनुकूलता दर्शविली असून तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी ही आपण आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांची बैठक घेऊन या युवक युवतीना ग्रामपंचायत च्या माध्यमातून पत्र तर कामावरील ओळखपत्र दाखवल्यानंतर सोडण्यात येणार आहे.यामुळे गोव्यात जाणाऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.पालकमंत्र्यासह खासदारांकडून पाठपुरावासावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी ई पासची अट रद्द व्हावी यासाठी प्रशासनाशी चर्चा करत असतनाच पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी यातून तोडगा काढला त्यामुळेच हे शक्य झाल्याचे राऊळ यांनी सांगितले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbanda-pcबांदाgoaगोवाsindhudurgसिंधुदुर्ग