शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोरोना लसीकरण टाळेल सर्वांचे मरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 16:45 IST

सागर गुजर सातारा : कोरोनाचे वाढते संक्रमण लसीकरणामुळे रोखले गेल्याचे आता सिद्ध झाले आहे. तसेच जरी संसर्ग वाढला तरी ...

सागर गुजरसातारा : कोरोनाचे वाढते संक्रमण लसीकरणामुळे रोखले गेल्याचे आता सिद्ध झाले आहे. तसेच जरी संसर्ग वाढला तरी लसीकरणामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण टाळेल सर्वांचे मरण असेच म्हणावे लागेल.

लसीकरणाचे फायदे खूप आहेत, जे काही तोटे सांगितले जातात ते अंधश्रद्धेपोटी सांगितले जातात. प्रशासनाकडे लसींची उपलब्धी मोठी आहे. काही महिन्यांपूर्वी प्रत्येक लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी झुंबड उडत होती. रात्री-अपरात्री लोक केंद्रावर जावून थांबत होते. पहाटेपर्यंत आपला नंबर कधी येईल याची वाट लोक पाहात होते. परंतु सध्याच्या घडीला लसीकरण केंद्रांवर पाहायला मिळत नाही. दिवसभरात किरकोळ प्रमाणामध्ये लसीकरण होते, हे योग्य नाही. लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर या व्यतिरिक्त दुसरा पर्याय जगात नाही.

सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्हाभरात वीस-तीस पेशंट दिवसभरात सापडतात. म्हणून लोक गैरसमज करून बसले आहेत. अनेक जण तोंडाला मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. हॅन्डवॉश करीत नाहीत. त्यामुळे कोरोनासारखा विषाणू केव्हाही पसरू शकतो. एकाला झाला तर तो हजार लोकांपर्यंत सहज पसरतो, हे आता कळून चुकले आहे. अनेक जण जवळपास सहा हजारांच्या वर लोक कोरोनामुळे दगावले आहेत, तर अडीच लाखांच्या वर लोकांना कोरोनाने गाठले आहे. त्यातून काही लोक बरेदेखील झाले, परंतु हे संक्रमण रोखले नाही तर आरोग्य यंत्रणा तुटपुंजी पडते. तसेच आर्थिक तानालादेखील कुटुंबांना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन सरकार मार्फत जर मोफत लसीकरण मोहीम राबविली जात असेल तर त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांनी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे वेळ न दवडता जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लोकांनी लस घेणे क्रमप्राप्त आहे, तरच कोरोना महामारी आपण रोखू शकू.

आपल्या देशामध्ये कोरना रुग्णांचे आकडे कमी झाले असले तरी गाफील राहून चालणार नाही. इतर देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. संक्रमणामुळे मुळे होणारा आजार केव्हाही डोके वर काढू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. -डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

प्रशासनाने आता वॉर्डनिहाय लसीकरण मोहीम राबवायला हवी. यासाठी सामाजिक संघटना प्रशासनासोबत राहतील. जी काही गरज लागेल ती संघटना करेल. एकाच ठिकाणी लसीकरण असल्यामुळे लोक लसीकरणाला जाणे टाळत असल्याचे पुढे येत असल्यामुळे प्रशासनाने वॉर्डनिहाय लसीकरण करून घ्यायला हवे.- चिन्मय कुलकर्णी, अध्यक्ष- संकल्प इंजिनिअरिंग आणि सामाजिक संघटना

लस घेण्याचे हे आहेत फायदे..

- शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याने अनेक आजारांपासून बचाव

- कोरोनाचा धोका कमी होतो

- कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होते

- संसर्ग झाला तरी त्याची दाहकता वाढत नाही

- अंतिम टप्प्यात रुग्णालयात दाखल करावे लागते. त्याचे प्रमाण कमी होते

- आर्थिक नुकसान टळते

- कुटुंबीयांना होणारा आर्थिक आणि मानसिक त्रास कमी होतो

- देश, विदेशातील पर्यटनाला लसीकरण गरजेचे आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस