शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:36 IST

सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण अजूनही कोरोनाची चाचणी करीत नसल्याचे समोर येत आहे. लक्षणे ...

सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण अजूनही कोरोनाची चाचणी करीत नसल्याचे समोर येत आहे. लक्षणे असूनदेखील कोरोना चाचणी न करणे हे चुकीचे आहे. नागरिकांनी लक्षणे अंगावर न काढता तत्काळ चाचणी करून डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, आपल्या जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात १०९१ इतके कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. मागच्या वर्षीचा उच्चांक १११७ उच्चांक १५ सप्टेंबरला होता. आपण त्याचे जवळपास पोहोचतो आहोत. कोरोनाशी लढा देण्यासाठी कोरोनाचे लवकर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. आपण लवकरात लवकर रुग्णाला तपासून त्याची चाचणी करून घेतली आणि उपचार लवकर सुरू झाले तर पेशंटला वाचवून घेण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. अनेकदा पेशंट असूनसुद्धा अंगावर काढत आहेत. लवकर निदान करून घेतले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. खोकला आहे, घसा दुखतोय, ताप आहे किंवा वास येत येत नाही तर जवळच्या डॉक्टरना दाखवा. काही लोकांना डायरियाचा प्रॉब्लेम असायचा आणि त्यानंतर कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येत होती. तुमच्या फॅमिली डॉक्टरना दाखवून तुम्ही निर्णय घ्या की तुम्हाला कोरोना चाचणीची गरज आहे किंवा नाही. चाचणी न करता घरामध्ये बसून राहू नका. थकवा जाणवत असेल तरी घरात बसून राहू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.

आयुष मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईननुसार आयुर्वेदिक उपचार पद्धतीसुद्धा लोक घरच्या घरी घेऊ शकतात. काढा, पाणी हळदी आणि मीठ टाकून गुळण्या करा. आपल्या घरामध्ये पूर्वीपासून ज्या पारंपरिक उपचार पद्धती केल्या जात होत्या, त्यांचा आधारदेखील लोकांनी घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.