शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

कवितांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाय राबविले जात असतानाच साताऱ्यातील संजय पातुरकर यांनी कवितांच्या माध्यमातून ...

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाय राबविले जात असतानाच साताऱ्यातील संजय पातुरकर यांनी कवितांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांनी अनेक कविता रचल्या असून, सोशल मीडियाद्वारे त्यांची गेल्या वर्षभरापासून जनजागृती मोहीम सुरू आहे.

संजय पातुरकर यांचे मूळ गाव औरंगाबाद. एका संस्थेकडून साताऱ्यातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पातुरकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे २०१७ पासून ते साताऱ्यात वास्तव्य करीत आहेत. आपल्या दैनंदिन कामाबरोबरच पातुरकर यांनी कविता करण्याचा छंदही लीलया जोपासला आहे. त्यांचा ‘शब्दबंध’ कवितासंग्रह देखील प्रकाशित झाला आहे.

कोरोनाचा काळ हा सर्वांसाठी कसोटीचा होता. अशा काळात संजय पातुरकर यांच्या कवितांंनी जनतेला मानसिक आधार दिला. आपण कुठे चुकतोय, आपल्याला काय करायला हवं आणि काय नको याची जाणीवही करून दिली.

‘कोरोनाचा उद्रेक आता पुन्हा पाहवत नाही. अनुभवातून आम्ही शहाणे होत नाही, पुढच्याला ठेच मागचा शहाणा.. ही म्हणही आम्ही पचवत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी नागरिकांच्या निष्काळजीपणावरही बोट ठेवले आहे. ‘बेसावध राहणे हे भूषण नाही.. बेफिकीर आम्ही सदैव तमा बाळगत नाही.. मास्क, सॅनिटायझर आम्ही सदैव बाळगत नाही.. कोरोना संपविण्याचा आम्ही विचारच करीत नाही,’ असे सांगत पातुरकर यांनी कोरोनो हद्दपार करण्यासाठी आता निष्काळजीपणा सोडा, असे आवाहनही केले आहे.

(कोट)

आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब शब्दरूपात मांडण्याचा प्रयत्न मी पूर्वीपासूनच करीत आहे. कोरोनाकाळात नागरिक निष्काळजीपणे वागत होते. अशा नागरिकांना आपण कुठे चुकतोय व आपण काय करायला हवं, हे कवितांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला.

- संजय पातुरकर, सातारा

फोटो : ०१ संजय पातुरकर