शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

कोरोना मोकाट...अन् बाहेरुन येणारेही सुसाट; ना कोणती तपासणी, ना नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 16:30 IST

रुग्णवाढीला परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांबरोबरच प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरु लागला आहे. बाहेरून येणाऱ्या एकाही प्रवाशाची ना तपासणी केली जात ना कोणत्या नोंदी ठेवल्या जात.

सातारा : जिल्ह्यात एकीकडे ओमायक्रॉन पाय पसरत असतानाच दुसरीकडे कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. या रुग्णवाढीला परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांबरोबरच प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरु लागला आहे. बाहेरून येणाऱ्या एकाही प्रवाशाची ना तपासणी केली जात ना कोणत्या नोंदी ठेवल्या जात. निर्बंध नसल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरली होती. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण दररोज आढळून येत होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, नवीन वर्ष उजाडल्यापासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या चारच दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल ४६८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासनही खडबडून जागे झाले आहे.

गतवर्षी लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जात होती. त्याला काही दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात होते. ती व्यक्ती कोरोना बाधित असल्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले जात होते.

प्रशासनाच्या नजरेतून सुटून जर कोणी घरी आलाच तर शेजारचे नागरिक याची कल्पना प्रशासनाला देत होते. यंदा अशी कोणतीही रुपरेषा प्रशासनाने आखलेली नाही. दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक साताऱ्यात येतात व बाहेर जातात. कोरोनाच्या दोन्ही लाटांमधून बोध घेऊन प्रशासनाने आतापासून कठोर पावले उचलायला हवीत.

यामुळे वाढतेय संक्रमण

- निर्बंध नसल्याने बाजारपेठेत नागरिक, वाहनधारकांची दिवसभर वर्दळ सुरू असते.

- व्यापारी, दुकानदार, विक्रेते व नागरिकांकडून कोरोना नियमावलीचे पालन केले जात नाही.

- गतवर्षी प्रशासनाकडून गृहभेटीद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

- कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यंदा अशी मोहीम राबविण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही.

- कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहीमही प्रभावीपणे राबविली जात नाही.

- परजिल्हा व राज्यातून येणाऱ्या नागरिकांची कोणतीही नोंद ठेवली जात नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या