शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे कास पर्यटन कासावीस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:30 IST

पेट्री : कोरोनाच्या जागतिक महामारीने कास, बामणोली, पर्यटनावर कोट्यवधी रुपयांची तोट्याची तलवार चालली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दहा-पंधरा लाख ...

पेट्री : कोरोनाच्या जागतिक महामारीने कास, बामणोली, पर्यटनावर कोट्यवधी रुपयांची तोट्याची तलवार चालली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दहा-पंधरा लाख पर्यटकांनी कासकडे पाठ फिरवल्याने वनव्यवस्थापन समिती, कास पुष्प पठार व्यावसायिक संघटना, हॉटेल चालक-मालक, उपव्यावसायिक, वाहतूक संघ, सातारा हॉटेल व्यावसायिक, कास-बामणोली पर्यटन आणि यांच्यावर आधारित कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आली आहे.

दरवर्षी पावसाळ्यानंतर कास परिसरातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. ऐन पावसाळ्यातदेखील वजराई धबधबा, एकीव, घाटाई दर्शन, बामणोली आणि कास परिसरात पर्यटकांची मांदियाळी असते. मागील काही वर्षांत पावसाळी पर्यटनाने हॉटेल व्यवसायाला अगदी सुगीचे दिवस आणले होते. जिल्हा, राज्य, परजिल्हा-राज्यासह विदेशी नागरिकांनासुद्धा कासची आस लागून रेलचेल केल्याचा इतिहास आहे. इथल्या पर्यटनाला अगदी नवीन महाबळेश्वरची चाहूल लागल्यामुळे येथील व्यवसायाला तेजीचे दिवस आले होते. परंतु, मार्च २०२० पासून कोरोनामुळे कास पर्यटन ओस पडले. बघता-बघता दोन वर्षे हातातून निसटून गेली. कास पुष्पपठाराला दरवर्षी दहा-बारा लाख पर्यटक भेट देतात. सातारा शहरात मुक्कामासाठी लॉज मिळणे अवघड होऊन जाते. ‘पुष्प बहार' येण्याअगोदरच सर्व हॉटेल्स ॲडव्हान्स बुकींगनी खचाखच होतात; परंतु आता केवळ हे स्वप्नात वाटणारी गोष्ट ठरते की काय, असे वाटू लागले आहे. परंतु मागील वर्षापासून या व्यावसायिकांची अवस्था पोटाला चिमटा घेऊन जगण्यासारखी झाली आहे.

वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे मोठे हाल झाल्याचे अध्यक्ष बजरंग कदम यांनी सांगितले.

(कोट)

कास रस्त्याशेजारील अनेक गावांना पर्यटनामुळे चार पैसे मिळण्याबरोबरच हाताला काम मिळत होते. मुंबई-पुण्याला पोटासाठी जाणारा लोकांचा लोंढा गावातच रोजगार मिळाल्याने चांगला स्थिरस्थावर झाला होता. परंतु कोरोनाच्या महामारीने बेरोजगारीबरोबरच उपासमारीची वेळ येऊन संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीमध्ये कास पर्यटनावर आधारित असणाऱ्या घटकांना शासनपातळीवर आर्थिक मदत होणे गरजेचे आहे.

-सोमनाथ जाधव, अध्यक्ष, पठार विभाग भूमिपुत्र संघटना

कोट

मार्चअखेरीस जिल्हा बँकेकडून कृषी पर्यटन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे नुसते व्याज तीन लाख भरले असून, वर्षभरात एवढा व्यवसायही झाला नाही. कर्जाची मुद्दल कधी जाणार व व्यवसाय सुरळीत कधी होणार याची चिंता सतत राहते. शासनाने व बँकांनी काहीतरी मदत करावी.

-अर्चना पवार, सह्यगिरी कृषी पर्यटन केंद्र, सह्याद्रीनगर

फोटो / कॅप्शन

२८कास

कास पुष्प पठाराची समितीचे कर्मचारी देखभाल करताना पाहायला मिळत आहेत.