शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे कास पर्यटन कासावीस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:30 IST

पेट्री : कोरोनाच्या जागतिक महामारीने कास, बामणोली, पर्यटनावर कोट्यवधी रुपयांची तोट्याची तलवार चालली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दहा-पंधरा लाख ...

पेट्री : कोरोनाच्या जागतिक महामारीने कास, बामणोली, पर्यटनावर कोट्यवधी रुपयांची तोट्याची तलवार चालली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दहा-पंधरा लाख पर्यटकांनी कासकडे पाठ फिरवल्याने वनव्यवस्थापन समिती, कास पुष्प पठार व्यावसायिक संघटना, हॉटेल चालक-मालक, उपव्यावसायिक, वाहतूक संघ, सातारा हॉटेल व्यावसायिक, कास-बामणोली पर्यटन आणि यांच्यावर आधारित कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आली आहे.

दरवर्षी पावसाळ्यानंतर कास परिसरातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. ऐन पावसाळ्यातदेखील वजराई धबधबा, एकीव, घाटाई दर्शन, बामणोली आणि कास परिसरात पर्यटकांची मांदियाळी असते. मागील काही वर्षांत पावसाळी पर्यटनाने हॉटेल व्यवसायाला अगदी सुगीचे दिवस आणले होते. जिल्हा, राज्य, परजिल्हा-राज्यासह विदेशी नागरिकांनासुद्धा कासची आस लागून रेलचेल केल्याचा इतिहास आहे. इथल्या पर्यटनाला अगदी नवीन महाबळेश्वरची चाहूल लागल्यामुळे येथील व्यवसायाला तेजीचे दिवस आले होते. परंतु, मार्च २०२० पासून कोरोनामुळे कास पर्यटन ओस पडले. बघता-बघता दोन वर्षे हातातून निसटून गेली. कास पुष्पपठाराला दरवर्षी दहा-बारा लाख पर्यटक भेट देतात. सातारा शहरात मुक्कामासाठी लॉज मिळणे अवघड होऊन जाते. ‘पुष्प बहार' येण्याअगोदरच सर्व हॉटेल्स ॲडव्हान्स बुकींगनी खचाखच होतात; परंतु आता केवळ हे स्वप्नात वाटणारी गोष्ट ठरते की काय, असे वाटू लागले आहे. परंतु मागील वर्षापासून या व्यावसायिकांची अवस्था पोटाला चिमटा घेऊन जगण्यासारखी झाली आहे.

वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे मोठे हाल झाल्याचे अध्यक्ष बजरंग कदम यांनी सांगितले.

(कोट)

कास रस्त्याशेजारील अनेक गावांना पर्यटनामुळे चार पैसे मिळण्याबरोबरच हाताला काम मिळत होते. मुंबई-पुण्याला पोटासाठी जाणारा लोकांचा लोंढा गावातच रोजगार मिळाल्याने चांगला स्थिरस्थावर झाला होता. परंतु कोरोनाच्या महामारीने बेरोजगारीबरोबरच उपासमारीची वेळ येऊन संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीमध्ये कास पर्यटनावर आधारित असणाऱ्या घटकांना शासनपातळीवर आर्थिक मदत होणे गरजेचे आहे.

-सोमनाथ जाधव, अध्यक्ष, पठार विभाग भूमिपुत्र संघटना

कोट

मार्चअखेरीस जिल्हा बँकेकडून कृषी पर्यटन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे नुसते व्याज तीन लाख भरले असून, वर्षभरात एवढा व्यवसायही झाला नाही. कर्जाची मुद्दल कधी जाणार व व्यवसाय सुरळीत कधी होणार याची चिंता सतत राहते. शासनाने व बँकांनी काहीतरी मदत करावी.

-अर्चना पवार, सह्यगिरी कृषी पर्यटन केंद्र, सह्याद्रीनगर

फोटो / कॅप्शन

२८कास

कास पुष्प पठाराची समितीचे कर्मचारी देखभाल करताना पाहायला मिळत आहेत.