शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे कास पर्यटन कासावीस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:30 IST

पेट्री : कोरोनाच्या जागतिक महामारीने कास, बामणोली, पर्यटनावर कोट्यवधी रुपयांची तोट्याची तलवार चालली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दहा-पंधरा लाख ...

पेट्री : कोरोनाच्या जागतिक महामारीने कास, बामणोली, पर्यटनावर कोट्यवधी रुपयांची तोट्याची तलवार चालली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दहा-पंधरा लाख पर्यटकांनी कासकडे पाठ फिरवल्याने वनव्यवस्थापन समिती, कास पुष्प पठार व्यावसायिक संघटना, हॉटेल चालक-मालक, उपव्यावसायिक, वाहतूक संघ, सातारा हॉटेल व्यावसायिक, कास-बामणोली पर्यटन आणि यांच्यावर आधारित कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आली आहे.

दरवर्षी पावसाळ्यानंतर कास परिसरातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. ऐन पावसाळ्यातदेखील वजराई धबधबा, एकीव, घाटाई दर्शन, बामणोली आणि कास परिसरात पर्यटकांची मांदियाळी असते. मागील काही वर्षांत पावसाळी पर्यटनाने हॉटेल व्यवसायाला अगदी सुगीचे दिवस आणले होते. जिल्हा, राज्य, परजिल्हा-राज्यासह विदेशी नागरिकांनासुद्धा कासची आस लागून रेलचेल केल्याचा इतिहास आहे. इथल्या पर्यटनाला अगदी नवीन महाबळेश्वरची चाहूल लागल्यामुळे येथील व्यवसायाला तेजीचे दिवस आले होते. परंतु, मार्च २०२० पासून कोरोनामुळे कास पर्यटन ओस पडले. बघता-बघता दोन वर्षे हातातून निसटून गेली. कास पुष्पपठाराला दरवर्षी दहा-बारा लाख पर्यटक भेट देतात. सातारा शहरात मुक्कामासाठी लॉज मिळणे अवघड होऊन जाते. ‘पुष्प बहार' येण्याअगोदरच सर्व हॉटेल्स ॲडव्हान्स बुकींगनी खचाखच होतात; परंतु आता केवळ हे स्वप्नात वाटणारी गोष्ट ठरते की काय, असे वाटू लागले आहे. परंतु मागील वर्षापासून या व्यावसायिकांची अवस्था पोटाला चिमटा घेऊन जगण्यासारखी झाली आहे.

वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे मोठे हाल झाल्याचे अध्यक्ष बजरंग कदम यांनी सांगितले.

(कोट)

कास रस्त्याशेजारील अनेक गावांना पर्यटनामुळे चार पैसे मिळण्याबरोबरच हाताला काम मिळत होते. मुंबई-पुण्याला पोटासाठी जाणारा लोकांचा लोंढा गावातच रोजगार मिळाल्याने चांगला स्थिरस्थावर झाला होता. परंतु कोरोनाच्या महामारीने बेरोजगारीबरोबरच उपासमारीची वेळ येऊन संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीमध्ये कास पर्यटनावर आधारित असणाऱ्या घटकांना शासनपातळीवर आर्थिक मदत होणे गरजेचे आहे.

-सोमनाथ जाधव, अध्यक्ष, पठार विभाग भूमिपुत्र संघटना

कोट

मार्चअखेरीस जिल्हा बँकेकडून कृषी पर्यटन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे नुसते व्याज तीन लाख भरले असून, वर्षभरात एवढा व्यवसायही झाला नाही. कर्जाची मुद्दल कधी जाणार व व्यवसाय सुरळीत कधी होणार याची चिंता सतत राहते. शासनाने व बँकांनी काहीतरी मदत करावी.

-अर्चना पवार, सह्यगिरी कृषी पर्यटन केंद्र, सह्याद्रीनगर

फोटो / कॅप्शन

२८कास

कास पुष्प पठाराची समितीचे कर्मचारी देखभाल करताना पाहायला मिळत आहेत.