शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वाईत लसीकरणाची गर्दी देतेय कोरोनाला निमंत्रण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:25 IST

वाई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या गतीने संसर्ग झाला. या लाटेमध्ये मृत्यूंचे प्रमाणही अधिक होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत ...

वाई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या गतीने संसर्ग झाला. या लाटेमध्ये मृत्यूंचे प्रमाणही अधिक होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हा एकमेव पर्याय तज्ज्ञांनी अधोरेखित केला. यामुळे लसीकरण मोहिमेवर भर दिला जाऊ लागला. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व व फायदे सिद्ध झाल्यानंतर नागरिक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे ही गर्दी धोक्याची ठरू शकते.

अनेकदा लस उपलब्ध नसली तरी उपलब्ध लसीच्या कितीतरी पट नागरिक पहाटेपासून लसीकरण केंद्रावर गर्दी करत असल्यामुळे एकप्रकारे कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी निमंत्रण दिल्यासारखेच आहे. येथे शहराच्या विविध भागातून तसेच ग्रामीण भागातून नागरिक गर्दी करत असल्याने हे धोकादायक आहे. जिल्ह्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन असल्यामुळे वैद्यकीय सुविधा वगळता अत्यावश्यक सेवांसह सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत. परंतु, लसीकरणासाठी होणारी गर्दीच कोरोना पसरविण्याचे ठिकाण ठरतेय का? अशी स्थिती आहे.

४५ वर्ष वयोगटातील प्रथम डोस व दुसरा डोस घेणारे नागरिक पहाटेपासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी करताना दिसत आहेत. कोणत्या गटाचे लसीकरण आज होणार नाही, ते सांगितले जाते. त्यामुळे शेकडो नागरिकांना परत जावे लागते. यामुळे तासनतास नागरिक एकमेकांच्या संपर्कात असतात, हे धोकादायक आहे. यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.

वाई तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या १५ दिवसांपासून २० ते ३०च्या आसपास येत असल्याने काहीशी समाधानकारक स्थिती आहे. आतापर्यंत वाई तालुक्यात १८ ते ४४ व ४५पेक्षा जास्त वयाच्या ५० हजारांवर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दि. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरु झाले; परंतु कोरोना युद्धात निर्णायक ठरणाऱ्या लसीकरण मोहिमेचे योग्य नियोजन न केल्यास कोरोनावाढीचा धोका संभवतो.

चौकट :

पहिला व दुसरा डोसचे वेगवेगळे ठिकाण असावे..

प्रथम डोस व दुसऱ्या डोसचे वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण केंद्र केल्यास गर्दीला आळा बसू शकतो. वाई येथील कन्याशाळेत सर्व प्रकारच्या वयोगटातील पहिल्या व दुसऱ्या डोससाठी नागरिक एका ठिकाणी येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण केल्यास होणारी गर्दी टाळून कोरोना संसर्गाचा धोका टाळू शकतो.

कोट..

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण गतीने होण्याची गरज आहे. लसीचा पुरवठा अखंडित केला पाहिजे. याचबरोबर लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेणे ही गरजेचे आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा.

- भवरलाल ओसवाल, व्यापारी, वाई

०३ वाई

वाई येथील कन्याशाळेत लसीकरण सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.