शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने, रुग्ण वाढीचा दर १५ टक्क्यांच्या पुढे, ३७८ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 14:36 IST

जिल्ह्याची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने असल्याचे पाहायला मिळते.

सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच रुग्ण वाढीचा दर पंधरा टक्क्यांच्यावर पोहोचला. सोमवारी घेण्यात आलेल्या तपासण्यांमधून ३७८ लोक कोरोना बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने असल्याचे पाहायला मिळते.सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३७८ लोक कोरोना बाधित आढळले. रुग्ण वाढीचा दर झपाट्याने वाढून १५.४ टक्क्यांवर पोहोचलेला आहे. चाचण्यांची संख्या कमी झाली असली तरी त्यातुलनेत रूग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. २ हजार ५१३ कोरोना चाचण्यांमधून ३७८ लोक बाधित आढळले. प्रशासनाने कोरोना चाचण्यांवर आणखी भर दिला तर रुग्ण संख्येतील वाढ जास्त प्रमाणात दिसून येऊ शकते.रुग्णवाढीचा दर १५ टक्क्यांवर पोहोचला असल्यामुळे सातारा जिल्ह्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शाळा तर पूर्णपणे बंद केले आहेत. इतर आस्थापनांवर देखील निर्बंध लादले जाऊ शकतात. मागील वर्षी राज्य शासनाने जिल्ह्यांचे वर्गीकरण केले होते, त्यानुसार आत्ताची रुग्ण वाढ ही जिल्ह्याला रेड झोन मध्ये नेणारी ठरली आहे.रूग्णांसाठी तारणहार ठरलेले जम्बो कोवीड अजूनही बंद स्थितीमध्ये आहे. जिल्ह्यातील इतर कोविड सेंटर्स सुरू करण्याच्या अनुषंगाने प्राथमिक तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. रुग्णवाढ अशीच सुरू राहिली तर जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करू करावे लागणार आहे.विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान..जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. रुग्ण वाढीच्या प्रभावामुळे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. दहावी बारावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा स्तरावरील परीक्षा सुरू होत्या. त्या रद्द कराव्या लागल्या. लोकसेवा, राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा रुग्ण वाढीमुळे वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. या परिस्थितीमध्ये शालेय विद्यार्थी तसेच नोकरीच्या शोधात असलेले विद्यार्थी यांचे देखील मोठे नुकसान होताना दिसत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या