शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गेल्या दीड वर्षापासून कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सातारा पालिकेतील १९ आरोग्य कर्मचाऱ्यांचा पालिकेकडून उचित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गेल्या दीड वर्षापासून कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सातारा पालिकेतील १९ आरोग्य कर्मचाऱ्यांचा पालिकेकडून उचित सन्मान करण्यात आला. या कर्मचाऱ्यांना पालिकेकडून नुकताच प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात आल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांवर साताऱ्यातील संगम माहुली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. जिल्हा प्रशासनाकडून या कामाची जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. पालिकेने अंत्यसंस्कारासाठी एकूण १९ कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले असून, प्रत्येकाला कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून हे पथक कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम अविरतपणे करत आहेत. चार हजारांहून अधिक कोरोना मृतांवर या पथकाने आजवर अंत्यसंस्कार केले आहेत. तरीही एकाही कर्मचाऱ्याला अद्याप कोरोनाची लागण झाली नाही.

या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा ठराव पालिका प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. त्यानुसार, नुकतीच प्रोत्साहन भत्याची रक्कम वेतनासह कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. प्रभारी आरोग्य निरीक्षक प्रशांत गंजीवाले, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर, मुकादम संदीप पाठसुते, सफाई कर्मचारी कपिल मट्टू, तुकाराम खंडूझोडे, अमोल खंडूझोडे, लक्ष्मण कांबळे, यशवंत कांबळे, विश्वास लोखंडे, प्रमोद गाडे, शंकर भंडारे, शंकर कमाने, अमोल वाघमारे, प्रेमसिंग मोहिते, दत्तात्रय जाधव, सुरेश भिसे, हनुमंत फडतरे, अशोक चव्हाण व योगेश तारळेकर या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम अदा करण्यात आली. पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी संकट काळात जबाबदारीने व स्वत:ला झोकून देऊन काम केले आहे. प्रशासनाने उशिरा का होईना, परंतु कामाची दखल घेत त्यांना प्रोत्साहन भत्ता दिल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.