शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

कोरोनाने घेतला २ हजार ६ रुग्णांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : एकीकडे कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेईना आणि दुसरीकडे मृत्यूचे तांडवही थांबेना, अशी द्विधा परिस्थिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : एकीकडे कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेईना आणि दुसरीकडे मृत्यूचे तांडवही थांबेना, अशी द्विधा परिस्थिती सध्या सातारा जिल्ह्याची झाली आहे. कोरोनाग्रस्तांनी ७५ हजारांचा टप्पा ओलांडला असताना गेल्या वर्षभरात तब्बल २ हजार ६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. हा आकडा सर्वांचीच चिंता वाढवणारा आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, असे असले तरी गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक झाला आहे. दिनांक १ एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल साडेनऊ हजार नवे रुग्ण आढळले असून, जवळपास शंभर रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात बाधित रुग्ण सापडण्याचे व मृत्यूचे सत्र गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. डिसेंबरनंतर जिल्ह्यात रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी आले होते. मात्र, मार्च महिना सुरू झाल्यापासून परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. सातारा जिल्ह्यात वर्षभरात तब्बल सात ७६ हजार ३६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ६४ हजार ५६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर २ हजार ६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मृत्यूंचे प्रमाण वाढले असून, चिंतेचे ढग अधिकच गडद होऊ लागले आहेत.

(चौकट)

१५५० मृतांचे पालिकेने स्वीकारले पालकत्व

सातारा पालिकेने कोरोना प्रतिबंधासाठी रूपरेषा आखली असून, प्रत्येक कर्मचाऱ्यावर कामकाजाची जबाबदारी सोपवली आहे. स्वच्छतेपासून ते कोरोनामुळे दगावलेल्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत प्रशासनाने पथके तयार केली आहेत. पालिकेच्या पथकाने वर्षभरात तब्बल १,५५० मृतांवर अंत्यसंस्कार करून आपले दायित्व पूर्ण केले आहे. अंत्यसंस्काराचे काम अत्यंत जोखमीचे आहे, तरीही कर्मचाऱ्यांचा आरोग्यपूर्ण लढा अविरतपणे सुरूच आहे.

(चौकट)

पुणे, सोलापूरनंतर सातारा आघाडीवर

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर पाठोपाठ सातारा जिल्ह्याचा मृत्यूदर अधिक आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ५,८५६, सोलापूर २,१५८, सातारा २,००६, सांगली १,८६२ तर कोल्हापूर जिल्ह्यात १,८२८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

(चौकट)

सातारा @ ५१२

कोरोनाबाधित व मृतांमध्ये सातारा तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या १८,४१३ इतकी असून, आतापर्यंत तब्बल ५१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी २७ रुग्ण कोरोनाने दगावले असून, ही बाब या तालुक्यासाठी दिलासादायी आहे.

(चौकट)

तालुकानिहाय मृत्यू असे

जावळी ७३

कऱ्हाड ३५५

खंडाळा ७६

खटाव १७६

कोरेगाव १७७

माण १२६

महाबळेश्वर २७

फलटण १७६

पाटण १२३

सातारा ५१२

वाई १६०