शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

कोयनेत २४ तासांत ५ टीएमसी पाणी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:50 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पाटण तालुक्यातील गुजरवाडी घाटात दरड कोसळली आहे. तसेच ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पाटण तालुक्यातील गुजरवाडी घाटात दरड कोसळली आहे. तसेच अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. कºहाड तालुक्यातील गोटेवाडीत भराव वाहिला. कास, बामणोली परिसरात दरड कोसळल्याने रस्ता व शेतीचे नुकसान झाले. साताऱ्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. तर शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाने झोडपून काढले, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली. कोयना धरणात गेल्या २४ तासांत जवळपास ५ टीएमसी पाणीसाठा वाढला, तर सततच्या या पावसामुळे कास, बामणोली, तापोळा, पाटण, ठोसेघर या भागात ओढे, नाले खळाळू लागले आहेत, त्यामुळे नुकसानीच्या घटनाही घडू लागल्यात. कास परिसरात एका रस्त्यावर डोंगरावरील दरड कोसळली. तर सततच्या पावसामुळे पश्चिम भागात शेतीचे नुकसान होत आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीची कामेही खोळंबली आहेत.सातारा शहर व परिसरात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीतपणा आला आहे. प्रामुख्यानेसदर बझार व गोडोली या भागालापावसाचा मोठा फटका बसला असून, घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.पाटण तालुक्यातील विविध भागांत शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पाटण ते मोरगिरी जाणाºया रस्त्यावर कालव्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाटण-तारळे मार्गावरील गुजरवाडी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद झालीय.गोटेवाडी (ता. कºहाड) येथील बंधाºयावर रस्त्यासाठी टाकलेला भराव रविवारी दुपारी पावसाच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे बंधाºयात साठलेले पाणी आसपासच्या शेतात घुसून नुकसान झाले. कास तलावाकडून पुढे कास गाव व बामणोलीकडे जाणाºया रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे पंचवीस फूट रुंद व सत्तर फूट खोल खोदकाम झाले होते. याच ठिकाणी रस्ता खचल्याने बामणोली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर कोळघरजवळ दरड कोसळल्याने शेती व रस्त्याचे नुकसान झाले. कास पठार परिसरात सतत पाऊस कोसळत आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.