शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

महाराष्ट्रात शिंदे घराण्याचे योगदान मोलाचे

By admin | Updated: January 13, 2016 00:22 IST

हुमगावात स्मृतिदिन सोहळा : कर्तृत्ववान व्यक्तींचा शिंदेशाही पगडी देऊन गौरव

सातारा : ‘छत्रपती शिवराय तसेच शंभूराजे ते दत्ताजीराव शिंदेपर्यंत असलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासात शिंदे घराण्याचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी आपल्या पराक्रमाने अटकेपार झेंडे रोवले. मात्र, खोटारड्या इतिहासकारांनी हा इतिहास समाजापासून नेहमी दूर ठेवले आहे,’ असे मत इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.ते हुमगाव येथे रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे यांच्या २५५ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे, किसनशेठ शिंदे, पंचायत समिती सदस्य मोहनराव शिंदे, चंदन शिंदे, वैशाली शिंदे, भीमसिंह शिंदे, प्रमोद शिंदे, सुभाष शिंदे, सुदाम शिंदे मान्यवर उपस्थित होते.कोकाटे म्हणाले, ‘केंद्र शासनाच्या राज्य व लोकसेवा आयोगाच्या परीक्ष्ोत पेशव्यांचाच इतिहास का विचारला जातो? मराठ्यांचा का विचारला जात नाही? इतिहासात मराठ्यांचा इतिहास अजरामर करणारे रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे यांचा पराक्रम पेशव्यांपेक्षा किती तरी मोठा आहे. मराठ्यांनी इतिहास घडविला, तो कधीच लिहिला नाही आणि जो लिहिला तो दिशाभूल करणारा आहे.’ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘इतिहासात छत्रपती शिवरायांच्या घराण्याबरोबर निष्ठावंत व बरोबरीने सहकार्य करणारे शिंदे घराण्याने स्वराज्य निर्माण करण्यासाठी शौर्याने छत्रपतींना साथ दिली. छत्रपती शिवरायांनी शिंदे घराणे एकनिष्ठ होते.’ आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘छत्रपती शिवरायांच्या काळापासून शिंदे सरकार घराण्यांने स्वराज्यास साथ देऊन घराण्याचा नावलौकिक केला आहे.’प्रारंभी महामार्गावर शिंदे घराण्यातील युवकांनी मोठी रॅली काढली. या कार्यक्रमात शिंदे घराण्यातील विशेष कर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)