शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

कारागृह परिसरातील बांधकाम अट शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरातील जिल्हा कारागृहाच्या परिसरातील बांधकामांना साडेसात मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यासाठीची अट शिथिल करून १५ मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून, तातडीने याबाबतचा आदेश जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाºयांना निर्गमित करा, अशी सूचना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी बैठकीस उपस्थित वरिष्ठ अधिकाºयांना केली, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरातील जिल्हा कारागृहाच्या परिसरातील बांधकामांना साडेसात मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यासाठीची अट शिथिल करून १५ मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून, तातडीने याबाबतचा आदेश जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाºयांना निर्गमित करा, अशी सूचना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी बैठकीस उपस्थित वरिष्ठ अधिकाºयांना केली, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.सातारा जिल्हा कारागृह पूर्णपणे नागरी वस्तीत असून, कारागृहाच्या आसपास हजारो लोक वास्तव्यास आहेत. या परिसरात बांधकाम करताना साडेसात मीटरची अट असल्याने शहराच्या विकासावर विपरीत परिणाम होत आहे. हे निर्बंध शिथिल व्हावेत आणि शहराच्या डेव्हलपिंग झोनमध्ये असलेले कारागृह शहराबाहेर हलवावे, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरू होता.आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरून जिल्हा कारागृहासंदर्भात मुंबई येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या दालनात गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस रामराजे नाईक-निंबाळकर, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्र राज्य पुणे-१ कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, टाऊन प्लॅनिंग विभागाचे अव्वर सचिव शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, मुख्याधिकारी शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्यासह संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.शहराची नागरी वस्ती वाढत असून, शहराच्या मध्यभागी, भरवस्तीत जिल्हा कारागृहाची इमारत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. याच ठिकाणी पाेिलस मुख्यालय, शहर पोलिस ठाणे, सातारा नगरपरिषद कार्यालय, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय यांसह अनेक शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, संस्था, शाळा आणि विविध व्यावसायिक दुकाने आहेत. परिसरात मोबाईल जॅमर बसविल्याने विपरीत परिणाम होत असतो.शहराबाहेर कारागृहासाठी जिल्हा प्रशासन जागा देण्यात तयार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे जिल्हा कारागृह शहराबाहेर हलविण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, असा आदेश ना. पाटील यांनी उपस्थित सर्व अधिकाºयांना दिला. तसेच बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यामुळे जिल्हा कारागृह परिसरात राहणाºया सातारकर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.संयुक्त कुटुंबांची अडचणकारागृह हे शहराच्या मुख्य बाजारपेठेत असल्याने त्याचे दुरोगामी परिणाम शहराच्या विकासावर होत आहेत. संयुक्त कुटुंबात राहणाºयांना या निर्णयाचा मोठा फटका बसत होता. कुटुंबातील लोकांची संख्या वाढल्याने संबंधित कुटुंबाला घराचा विस्तार करणे अनिवार्यअसते. मात्र, जिल्हा कारागृहामुळे अशा अनेक कुटुंबांना त्यांच्याच जागेत नवीन घराचे बांधकाम अथवा विस्तार करता येत नसल्याने जागा असूनही यातील काहींना भाडेतत्वावर बाहेर राहण्याची वेळ आल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत सांगितले.