शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कारागृह परिसरातील बांधकाम अट शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरातील जिल्हा कारागृहाच्या परिसरातील बांधकामांना साडेसात मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यासाठीची अट शिथिल करून १५ मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून, तातडीने याबाबतचा आदेश जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाºयांना निर्गमित करा, अशी सूचना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी बैठकीस उपस्थित वरिष्ठ अधिकाºयांना केली, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरातील जिल्हा कारागृहाच्या परिसरातील बांधकामांना साडेसात मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यासाठीची अट शिथिल करून १५ मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून, तातडीने याबाबतचा आदेश जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाºयांना निर्गमित करा, अशी सूचना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी बैठकीस उपस्थित वरिष्ठ अधिकाºयांना केली, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.सातारा जिल्हा कारागृह पूर्णपणे नागरी वस्तीत असून, कारागृहाच्या आसपास हजारो लोक वास्तव्यास आहेत. या परिसरात बांधकाम करताना साडेसात मीटरची अट असल्याने शहराच्या विकासावर विपरीत परिणाम होत आहे. हे निर्बंध शिथिल व्हावेत आणि शहराच्या डेव्हलपिंग झोनमध्ये असलेले कारागृह शहराबाहेर हलवावे, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरू होता.आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरून जिल्हा कारागृहासंदर्भात मुंबई येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या दालनात गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस रामराजे नाईक-निंबाळकर, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्र राज्य पुणे-१ कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, टाऊन प्लॅनिंग विभागाचे अव्वर सचिव शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, मुख्याधिकारी शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्यासह संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.शहराची नागरी वस्ती वाढत असून, शहराच्या मध्यभागी, भरवस्तीत जिल्हा कारागृहाची इमारत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. याच ठिकाणी पाेिलस मुख्यालय, शहर पोलिस ठाणे, सातारा नगरपरिषद कार्यालय, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय यांसह अनेक शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, संस्था, शाळा आणि विविध व्यावसायिक दुकाने आहेत. परिसरात मोबाईल जॅमर बसविल्याने विपरीत परिणाम होत असतो.शहराबाहेर कारागृहासाठी जिल्हा प्रशासन जागा देण्यात तयार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे जिल्हा कारागृह शहराबाहेर हलविण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, असा आदेश ना. पाटील यांनी उपस्थित सर्व अधिकाºयांना दिला. तसेच बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यामुळे जिल्हा कारागृह परिसरात राहणाºया सातारकर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.संयुक्त कुटुंबांची अडचणकारागृह हे शहराच्या मुख्य बाजारपेठेत असल्याने त्याचे दुरोगामी परिणाम शहराच्या विकासावर होत आहेत. संयुक्त कुटुंबात राहणाºयांना या निर्णयाचा मोठा फटका बसत होता. कुटुंबातील लोकांची संख्या वाढल्याने संबंधित कुटुंबाला घराचा विस्तार करणे अनिवार्यअसते. मात्र, जिल्हा कारागृहामुळे अशा अनेक कुटुंबांना त्यांच्याच जागेत नवीन घराचे बांधकाम अथवा विस्तार करता येत नसल्याने जागा असूनही यातील काहींना भाडेतत्वावर बाहेर राहण्याची वेळ आल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत सांगितले.