शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

ग्रामीण आरोग्य केंद्रे मंदिरे व्हावीत

By admin | Updated: December 17, 2014 23:01 IST

जावळी आढावा बैठक : जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडून अधिकारी फैलावर

कुडाळ : ‘ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये सर्वसामान्य जनतेला चांगल्या सुविधा दिल्या जाव्यात. आरोग्य केंद्रातील परिसराची स्वच्छता राखताना कर्मचाऱ्यांनी लाज बाळगू नये, ग्रामीण आरोग्य केंद्रेही आरोग्य मंदिरे व्हावीत, त्यादृष्टीने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम करावे. तसेच आरोग्य सेवकाने यापुढे आरोग्य केंद्रातच राहणे बंधनकारक राहील, जो आरोग्यसेवक राहणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,’ अशा कडक शब्दांत उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा विभागांचा आढावा घेतला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्या उपस्थितीत बांधकाम, आरोग्य विभागाचंी आढावा बैठक पार पडली. यावेळी शिक्षण समिती सभापती अमित कदम, उपसभापती निर्मला कासुर्डे, मोहनराव शिंदे, रूपाली वारागडे, सारिका सपकाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, कार्यकारी अभियंता डी. एच. पालवे, आरोग्य अधिकारी, बांधकाम अभियंता निकम, शाखा अभियंता उपस्थित होते. यावेळी आरोग्य सेवकांना आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रातच राहण्याच्या सूचना कराव्यात, मी स्वत: आरोग्यकेंद्रांना भेटी देणार आहे. यावेळी जर तेथे आरोग्य कर्मचारी राहत नाही, हे निर्दशनास आले तर वैद्यकीय अधिकाऱ्यावरदेखील कारवाई केली जाईल.ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधांअभावी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागू नये, रुग्णांना सुविधा पुरविल्या जाव्यात, यापुढेही सातारा जिल्हा आरोग्य, स्वच्छतेच्या बाबतीत नंबर वन राहावा, यासाठी प्रत्येकाने काम करावे.बांधकाम विभागाचा आढावा घेताना अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून न राहता ठेकेदार करीत असलेल्या कामाची गुणवत्ता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन बघावी. ठेकेदाराला मंजूर कामे वेळेत करण्याच्या सूचना देऊन अधिकारी ती करून घ्यावीत. यावेळी उपअभियंता यांनी तालुक्यात एकूण विविध विकासनिधीतून २३८ कामे मंजूर आहेत. त्यापैकी ५३ पूर्ण, तर १०३ प्रगतिपथावर असल्याची माहिती दिली. सदस्य मोहनराव शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)ग्रामीण आरोग्य केंद्रे मंदिरे व्हावीतजावळी आढावा बैठक : जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडून अधिकारी फैलावरकुडाळ : ‘ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये सर्वसामान्य जनतेला चांगल्या सुविधा दिल्या जाव्यात. आरोग्य केंद्रातील परिसराची स्वच्छता राखताना कर्मचाऱ्यांनी लाज बाळगू नये, ग्रामीण आरोग्य केंद्रेही आरोग्य मंदिरे व्हावीत, त्यादृष्टीने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम करावे. तसेच आरोग्य सेवकाने यापुढे आरोग्य केंद्रातच राहणे बंधनकारक राहील, जो आरोग्यसेवक राहणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,’ अशा कडक शब्दांत उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा विभागांचा आढावा घेतला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्या उपस्थितीत बांधकाम, आरोग्य विभागाचंी आढावा बैठक पार पडली. यावेळी शिक्षण समिती सभापती अमित कदम, उपसभापती निर्मला कासुर्डे, मोहनराव शिंदे, रूपाली वारागडे, सारिका सपकाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, कार्यकारी अभियंता डी. एच. पालवे, आरोग्य अधिकारी, बांधकाम अभियंता निकम, शाखा अभियंता उपस्थित होते. यावेळी आरोग्य सेवकांना आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रातच राहण्याच्या सूचना कराव्यात, मी स्वत: आरोग्यकेंद्रांना भेटी देणार आहे. यावेळी जर तेथे आरोग्य कर्मचारी राहत नाही, हे निर्दशनास आले तर वैद्यकीय अधिकाऱ्यावरदेखील कारवाई केली जाईल.ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधांअभावी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागू नये, रुग्णांना सुविधा पुरविल्या जाव्यात, यापुढेही सातारा जिल्हा आरोग्य, स्वच्छतेच्या बाबतीत नंबर वन राहावा, यासाठी प्रत्येकाने काम करावे.बांधकाम विभागाचा आढावा घेताना अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून न राहता ठेकेदार करीत असलेल्या कामाची गुणवत्ता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन बघावी. ठेकेदाराला मंजूर कामे वेळेत करण्याच्या सूचना देऊन अधिकारी ती करून घ्यावीत. यावेळी उपअभियंता यांनी तालुक्यात एकूण विविध विकासनिधीतून २३८ कामे मंजूर आहेत. त्यापैकी ५३ पूर्ण, तर १०३ प्रगतिपथावर असल्याची माहिती दिली. सदस्य मोहनराव शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)तालुका पंचायत समिती इमारतीच्या कामावर अधिकारी, पदाधिकारी यांचे लक्ष नाही. ठेकेदार एक-एक महिना काम बंद ठेवत असल्याची बाब दत्ता मेढेकर यांनी निदर्शनास आणून दिली. यावेळी उपाध्यक्ष साळुंखे यांनी इमारतीचे काम ठेकेदाराकडून मार्चपूर्वी करून घ्या. इमारतीच्या अधर्वट कामाला मुदतवाढ देऊ नका, ठेकेदाराकडून वेळेत काम पूर्ण करून घ्या, मुदतवाढ, वाढीव निधीचा प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही, वेळेत काम करून घ्या, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.