शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

प्रतापगडाच्या कोसळलेल्या तटबंदीचे सह्याद्री प्रतिष्ठानकडून संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:43 IST

सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडाच्या तटबंदी बुरुजाखालील भाग गतवर्षी पावसाळ्य़ात कोसळला होता. यामुळे भविष्यात तटबंदी आणि गडाला ...

सातारा :

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडाच्या तटबंदी बुरुजाखालील भाग गतवर्षी पावसाळ्य़ात कोसळला होता. यामुळे भविष्यात तटबंदी आणि गडाला धोका पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास धूरस होण्याची भीती होती. यामुळे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सर्व परवानग्या, खासदार उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सहकार्य आणि सहमती घेऊन केवळ ९४ दिवसांत अत्यंत जोखमीचे संवर्धनाचे काम पूर्ण केले. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी होत असलेली किल्ल्यांची पडझड आणि रखडलेल्या दुरुस्तीच्या कामांसाठी हे एक चांगले उदाहरण ठरले आहे.

गतवर्षी पावसाळ्य़ात जून महिन्याच्या सुरुवातीला प्रतापगडाच्या तटबंदीच्या पायाखालील भागाचे भूस्खल्लन झाल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्य़ांना मिळाली. अन् मावळ्यांच्या डोळ्य़ांत अश्रू तरळले. सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमंगुंडे हे शिवभक्तांसह गडावर पोहोचले अन् त्यांनी तेथेच प्रण केला. अन् कार्याला सुरुवात झाली.

सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळ्यांनी हाती घेतले संवर्धनाचे कार्य.

जून २०२० मध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या बैठका पूर्ण झाल्यानंतर साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि राजमाता कल्पनाराजे तसेच आमदार शिवेंद्रराजे यांचे सहकार्य घेऊन मोहिमेची पुढची घोडदौड कायम ठेवली. पुरातत्व विभागाची परवानगी महत्त्वाची असल्याने पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास व्हाळे आणि डॉ. तेजस गर्दे यांनी परवानगी दिली. त्यानंतर वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी परवानगी दिली आणि कामाला सुरुवात झाली. गडावर साहित्य घेऊन जाणे आणि तेथून दरीत उतरविणे धोकादायक होते. या परिस्थितीतही पायाड बांधून साहित्य दरीत उतरविण्यात आले आणि कितीही अडचणी आल्या तरी दर्जेदार आणि मजबूत काम करण्यात आले.

गडाच्या या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, सातारा जिल्हा अध्यक्ष सागर माने, मार्गदर्शक अभयराज शिरोळे, दीपक प्रभावळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

चौकट

असे झाले बांधकाम

बांधकाम करणार कोण, असाही प्रश्न सह्याद्री प्रतिष्ठान पुढे होता. त्यासाठी चंदनकर इंजिनिअरिंग रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत चर्चा झाली. तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांशी चर्चा करून डिझाइन तयार केले. स्थानिकांना विश्वासात घेऊन २७ जानेवारी २०२१ ला भूमिपूजन करण्यात आले. गडावर मशिनरीचे सुट्टे पार्ट नेऊन जोडले अन् अत्याधुनिक यंत्रणा वापरून काम करण्यात आले. त्यामध्ये शॉटक्रिट फवारणी तंत्रज्ञान, ड्रिलिंग, बोलटिंग-ग्राऊटिंग, तटबंदीच्या पायावर वजन न वाढवता, जिओ फोम, जिओ नेट, वायर रोप, बेअरिंग प्लेटचा वापर करण्यात आला. बांद्रा सिलिंकला जी वायर रोप लागली ती येथे वापरण्यात आली. लोखंडी ताराची जाळी, तराई काम करण्यात आले. अन् अखेर १ मे २०२१ ला काम पूर्ण झाले.

चौकट

बावीस दिवसांत २१ लाखांचा निधी

संवर्धनाचे कार्य हाती घेतले अन् त्यासाठी आर्थिक बाब महत्त्वाची होती. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्य़ांनी आवाहन करताच अभिजित पानसे यांनी फोन करून मदत केली. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला. अनेक संस्था, शिवभक्त सह्याद्री प्रतिष्ठानच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. अवघ्या २२ दिवसांत २१ लाखांचा निधी उभा राहिला.

फोटो ओळ

खासदार उदयनराजे यांनी काम पूर्ण झाल्याचे घोषित करतेवेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, दीपक प्रभावळकर, अभयराजे शिरोळे, अमितराजे राजेशिर्के, रणजितसिंह गरुड, इंद्रजितसिंह घोरपडे, गजेंद्र गडकर व इतर.

फोटो २ गडाच्या तटबंदीचे पायाड बांधून काम करतानाचे छायाचित्र.