शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

प्रतापगडाच्या कोसळलेल्या तटबंदीचे सह्याद्री प्रतिष्ठानकडून संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:43 IST

सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडाच्या तटबंदी बुरुजाखालील भाग गतवर्षी पावसाळ्य़ात कोसळला होता. यामुळे भविष्यात तटबंदी आणि गडाला ...

सातारा :

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडाच्या तटबंदी बुरुजाखालील भाग गतवर्षी पावसाळ्य़ात कोसळला होता. यामुळे भविष्यात तटबंदी आणि गडाला धोका पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास धूरस होण्याची भीती होती. यामुळे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सर्व परवानग्या, खासदार उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सहकार्य आणि सहमती घेऊन केवळ ९४ दिवसांत अत्यंत जोखमीचे संवर्धनाचे काम पूर्ण केले. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी होत असलेली किल्ल्यांची पडझड आणि रखडलेल्या दुरुस्तीच्या कामांसाठी हे एक चांगले उदाहरण ठरले आहे.

गतवर्षी पावसाळ्य़ात जून महिन्याच्या सुरुवातीला प्रतापगडाच्या तटबंदीच्या पायाखालील भागाचे भूस्खल्लन झाल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्य़ांना मिळाली. अन् मावळ्यांच्या डोळ्य़ांत अश्रू तरळले. सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमंगुंडे हे शिवभक्तांसह गडावर पोहोचले अन् त्यांनी तेथेच प्रण केला. अन् कार्याला सुरुवात झाली.

सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळ्यांनी हाती घेतले संवर्धनाचे कार्य.

जून २०२० मध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या बैठका पूर्ण झाल्यानंतर साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि राजमाता कल्पनाराजे तसेच आमदार शिवेंद्रराजे यांचे सहकार्य घेऊन मोहिमेची पुढची घोडदौड कायम ठेवली. पुरातत्व विभागाची परवानगी महत्त्वाची असल्याने पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास व्हाळे आणि डॉ. तेजस गर्दे यांनी परवानगी दिली. त्यानंतर वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी परवानगी दिली आणि कामाला सुरुवात झाली. गडावर साहित्य घेऊन जाणे आणि तेथून दरीत उतरविणे धोकादायक होते. या परिस्थितीतही पायाड बांधून साहित्य दरीत उतरविण्यात आले आणि कितीही अडचणी आल्या तरी दर्जेदार आणि मजबूत काम करण्यात आले.

गडाच्या या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, सातारा जिल्हा अध्यक्ष सागर माने, मार्गदर्शक अभयराज शिरोळे, दीपक प्रभावळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

चौकट

असे झाले बांधकाम

बांधकाम करणार कोण, असाही प्रश्न सह्याद्री प्रतिष्ठान पुढे होता. त्यासाठी चंदनकर इंजिनिअरिंग रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत चर्चा झाली. तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांशी चर्चा करून डिझाइन तयार केले. स्थानिकांना विश्वासात घेऊन २७ जानेवारी २०२१ ला भूमिपूजन करण्यात आले. गडावर मशिनरीचे सुट्टे पार्ट नेऊन जोडले अन् अत्याधुनिक यंत्रणा वापरून काम करण्यात आले. त्यामध्ये शॉटक्रिट फवारणी तंत्रज्ञान, ड्रिलिंग, बोलटिंग-ग्राऊटिंग, तटबंदीच्या पायावर वजन न वाढवता, जिओ फोम, जिओ नेट, वायर रोप, बेअरिंग प्लेटचा वापर करण्यात आला. बांद्रा सिलिंकला जी वायर रोप लागली ती येथे वापरण्यात आली. लोखंडी ताराची जाळी, तराई काम करण्यात आले. अन् अखेर १ मे २०२१ ला काम पूर्ण झाले.

चौकट

बावीस दिवसांत २१ लाखांचा निधी

संवर्धनाचे कार्य हाती घेतले अन् त्यासाठी आर्थिक बाब महत्त्वाची होती. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्य़ांनी आवाहन करताच अभिजित पानसे यांनी फोन करून मदत केली. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला. अनेक संस्था, शिवभक्त सह्याद्री प्रतिष्ठानच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. अवघ्या २२ दिवसांत २१ लाखांचा निधी उभा राहिला.

फोटो ओळ

खासदार उदयनराजे यांनी काम पूर्ण झाल्याचे घोषित करतेवेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, दीपक प्रभावळकर, अभयराजे शिरोळे, अमितराजे राजेशिर्के, रणजितसिंह गरुड, इंद्रजितसिंह घोरपडे, गजेंद्र गडकर व इतर.

फोटो २ गडाच्या तटबंदीचे पायाड बांधून काम करतानाचे छायाचित्र.