शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस कार्यकर्ते भेटले नांदेडच्या चव्हाणांना!

By admin | Updated: July 14, 2017 23:01 IST

कॉँग्रेस कार्यकर्ते भेटले नांदेडच्या चव्हाणांना!

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील काँग्रेसअंतर्गत वाद आता चांगलाच चिघळू लागला आहे. जिल्हाध्यक्ष बदल, हेच त्यामागील मुख्य कारण सांगितलं जातंय. या संदर्भातच जिल्ह्यातील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले गाऱ्हाणे माजी मुख्यमंत्री चव्हाणांना भेटून मांडले; पण हा ‘दरबार’ कऱ्हाडच्या नव्हे तर नांदेडच्या चव्हाणांचा होता, एवढंच. गेल्या दोन दिवसांपासून याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात उलटसुलट चर्चा तर होणारच. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी सातारा जिल्ह्याची ओळख होती. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर येथील बुरुज ढासळले. ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करताना काँग्रेसची पुरती दमछाक होताना दिसतेय. गत पंचवार्षिकमध्ये दिल्लीच्या राजकारणात रममाण असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना अनपेक्षितपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. स्वच्छ प्रतिमेच्या पृथ्वीबाबांनी आपल्या कामाची चुणूकही दाखवून दिली. त्यामुळे सातारा जिल्ह्यात काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’नेच जिल्ह्यात बाजी मारली. त्यावेळपासून जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करायचे असेल तर विशेष प्रयत्न करण्याची गरज अनेकांनी बोलून दाखविली आणि त्याचाच एक भाग म्हणून सत्तेत नसणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष हा आक्रमक असला पाहिजे, असा सूर काहींनी आळवला.कऱ्हाडचे आनंदराव पाटील गत पंधरा वर्षे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळत आहेत. राष्ट्रवादीची मोठी ताकद जिल्ह्यात असताना आनंदराव पाटील यांनी काँग्रसचे विचार रुजविण्यसाठी प्रयत्न तर केले आहेतच. त्याचीच पोहोचपावती म्हणून नानांना विधानसभेची आमदारकी मिळाली आहे. साहजिकच जिल्ह्याच्या राजकारणात नानांना मानणारा मोठा वर्ग आहे. अलीकडच्या काही वर्षांत मात्र आनंदरावनानांच्या जिल्हाध्यक्ष पदाला पक्षातीलच काही मंडळींनी विरोध चालविलाय. त्यांना आक्रमक नेतृत्व असणाऱ्या जयाभाऊंचा ‘भाव’ जिल्हाध्यक्ष पद देऊन आणखी वाढवायचा आहे. गोरेंना जिल्हाध्यक्ष पद दिल्यास काँग्रेसला बरे दिवस येतील, अशी धारणा असणाऱ्या अनेकांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोरही ही बाब अनेकदा ठेवल्याचे बोलले जाते. मात्र, पृथ्वीबाबांनी याबाबतची आपली भूमिका अद्याप तरी कोठेच स्पष्ट केल्याचे दिसत नाही. सध्या राज्यभर काँगेसच्या पदाधिकारी निवडीचा पक्षांतर्गत कार्यक्रम राबविला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सभासद नोंदणी अभियानही नुकतेच पार पडले आहे. आॅगस्ट महिन्यात या निवडणुका होतील, असे बोलले जाते. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत दोन्ही गट सक्रिय झाले असून, जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार जयकुमार गोरे, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम, जिल्हा परिषद सदस्य भीमरावकाका पाटील यांच्यासह एका शिष्टमंडळाने नुकतीच मुंबईत प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्याचे फोटो गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.जिल्हाध्यक्ष निवडीची प्रतीक्षासातारा जिल्हा हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जिल्हा आहे. येथील काँगे्रसअंतर्गत प्रश्न त्यांनीच पुढाकार घेऊन सोडविणे अपेक्षित आहे. मात्र, गत महिन्यात सातारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात सांगली जिल्हा काँग्रेसचे नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांनी सातारा जिल्ह्यात काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदलण्याची गरज व्यक्त करीत, मी जयकुमारला जिल्हाध्यक्ष करण्यासाठी आग्रही असल्याचा ‘बॉम्ब’ टाकला होता. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने भरच पडली आहे. जिल्हाध्यक्ष निवड होईपर्यंत आणखी काय काय घडणार, हे येणारा काळच ठरवेल.