शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

उत्तरेत काँग्रेस एकवटल्या पण भाजपची लक्षवेधी कामगिरी; शशिकांत शिंदेंना अल्प मताधिक्य

By प्रमोद सुकरे | Updated: June 5, 2024 22:46 IST

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटलांवर आत्मचिंतनाची वेळ

कराड - सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विजय झाले. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारापेक्षा राष्ट्रवादीच्या उमेदवाराने १ हजार ७२४ मते जादा घेतली असली तरी दोन्ही काँग्रेस एकवटूनही त्यांना मिळालेले अत्यल्प मताधिक्य विद्यमान आमदारांसाठी धोक्याची घंटा असून त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल.

कराड तालुका हा सातारा जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे पहिल्यापासूनच कराड दक्षिण व उत्तर असे विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कराड, सातारा ,कोरेगाव व खटाव या चार तालुक्यातील मतदारांचा समावेश असल्याने हा मतदारसंघ किचकट म्हणून पाहिला जातो.

कराड उत्तर मतदार संघातून आजवर काँग्रेस विचाराच्या उमेदवारानेच नेतृत्व केले आहे. तर विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील सलग  ५  वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. सध्या मात्र भाजप कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मतदारसंघात बरेच हातपाय पसरल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे. मनोज घोरपडे यांनी मतदारांशी ठेवलेला सततचा संपर्क, तळागाळापर्यंतच्या लोकांना शासनाच्या योजना पोहोचवण्याचे केलेले काम या साऱ्याचे फळ या निकालात दिसत आहे.

कराड उत्तर मतदार संघात उदयनराजे भोसले यांच्या सातारा तालुक्यातील वर्णे व नागठाणे या २ जिल्हा परिषद गटांचा समावेश होतो. तसेच आमदार शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली जिल्हा परिषद गट व रहिमतपुर नगर परिषदेचा समावेश याच मतदारसंघात होतो. त्यामुळे हा मतदारसंघ दोघांचेही बलस्थान म्हणून पाहिला जात होता.येथे दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी २ लाख ९६ हजार ९४५ मतदार होते. पैकी १लाख ९४ हजार २९ म्हणजे ६५.३४ % मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पैकी खासदार उदयनराजे भोसले यांना ८८ हजार ९३० तर आमदार शशिकांत शिंदे यांना ९० हजार ६५४ मते मिळाली. याशिवाय इतर उमेदवारांनी घेतलेली मते वेगळीच .पण शशिकांत शिंदे यांनी १ हजार ७२४ मतांची आघाडी येथे घेतली आहे.

विरोधकांना आला ताकदीचा अंदाज

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात बऱ्याचदा तिरंगी लढती होत आल्या आहेत. त्यामुळे मत विभाजनाचा फायदा होऊन आमदार बाळासाहेब पाटील यांनी नेहमीच विधानसभेला बाजी मारली आहे. मात्र या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील विरोधक एकवटले होते. भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन केलेल्या प्रयत्नामुळे गत लोकसभा निवडणुकीला सुमारे ५० हजाराचे मताधिक्य राष्ट्रवादी उमेदवाराला घेणाऱ्या बाळासाहेब पाटलांना यावेळी फक्त १ हजार ७२४ मताधिक्यावर येऊन थांबावे लागले आहे. बाळासाहेबांसाठी ही धोक्याची घंटा तर आहेच. पण विरोधकांना आपल्या सामुदायिक ताकदीचा अंदाज या निमित्ताने आला आहे असे म्हटले जात आहे.

टॅग्स :satara-pcसातारा