शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

काँग्रेस, रासप जोमात; राष्ट्रवादी मात्र कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 00:02 IST

माण-खटाव मतदारसंघ : दमदार नेतृत्वाची गरज--कारण राजकारण

नवनाथ जगदाळे-- दहिवडी --एकेकाळी माण तालुक्यातील सर्वच सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. आमदार जयकुमार गोरे यांनी तालुक्यात लक्ष घातले तरीही अनेक सहकारी संस्था पंचायत समिती राष्ट्रवादीने ताब्यात ठेवण्यात यश मिळविले होते; परंतु माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची अत्यंत वाताहात झाली तर उलट तालुक्यात काँग्रेस, रासप जोमात असल्याचे स्पष्ट झाले आहे.माण तालुक्यात आजही काँग्रेसला टक्कर देणारी ताकद राष्ट्रवादीमध्ये असतानाही राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी फक्त पदापुरते उरले आहेत. गाव सोडून एकही नेता पक्षासाठी कार्य करावे, या मन:स्थितीत नाही. वर्षात आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लागणार आहेत. आरक्षण सोडत झाली की लगेच इच्छुक मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात करतील. तत्पूर्वी पक्ष म्हणून सामुदायिक जबाबदारी राष्ट्रवादीमध्ये कोणीही स्वीकारत नाही. भाजपाने कार्यकर्ता नोंदणीमध्ये एक पाऊल पुढे ठेवले आहे. शिवसेनेनेही दहिवडी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नितीन बानुगडे-पाटल यांनी त्यांना रणजित देशमुख यांच्यासह सर्वांनी एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला दिला. त्यांना पालकमंत्री विजय शिवतारे यांचे पाठबळ मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कोट्यवधींची कामे मंजूर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. तालुक्यात काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ‘रासप’चे शेखर गोरे यांनी प्रत्येक निवडणुकीत आव्हान उभे केल्याने येथून पुढे दोन गोरे बंधूंचा संघर्ष तालुक्याला पाहावयास मिळत आहे. पदाधिकाऱ्यांच्या किरकसाल, भांडवली या ठिकाणच्या सोसायट्या सोडल्या तर सर्वच ठिकाणी दोन गोरे बंधूंमध्ये लढत झाली आहे. सर्वच पक्षांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या-त्या पक्षाला याचा फायदा होणार आहे. (क्रमश:)वरिष्ठांचे प्रयत्न अपुरेवरिष्ठांनीही जेवढे हवे तेवढे प्रयत्न न केल्याने आज राष्ट्रवादीची ताकद असूनही वाताहात झाल्याचे चित्र आहे. या सर्व प्रक्रियेत काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीने मुसंडी मारली असून, हे दोन्ही पक्ष जोमात असताना राष्ट्रवादी मात्र कोमात गेल्याचे चित्र आहे. पोळ तात्यानंतर एकाही नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षासाठी चिंतन बैठक घेतली नाही. पदाधिकारी मात्र पद भोगण्याइतपत राहिले आहेत. प्रत्येक निवडणुकीला कोणाच्या तरी दावणीला जाण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न वरिष्ठांनी लक्ष न घातल्यास घातक ठरू शकतो. एकेकाळी डझनभर भरणा असलेल्या राष्ट्रवादीला मरगळ आली कशी, याचे चिंतन होणे गरजेचे आहे.