शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे साटेलोटे

By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू; राष्ट्रवादीत वरिष्ठांचा निर्णय ठरणार अंतिम

दशरथ ननावरे- खंडाळा  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खंडाळा तालुक्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचे साटेलोटे होण्याची दाट शक्यता असल्याने राष्ट्रवादीला सरसरळ बाय मिळणार अशीच चर्चा असली तरी राष्ट्रवादीअंतर्गत उमेदवारांना मोठी रस्सीखेच आहे. याशिवाय काँग्रेसने नमती भूमिका घेतल्यास अंतर्गत बंडाळीची मोठी शक्यता आहे.खंडाळ तालुक्यातील ५१ विकास सेवा सोसायट्यांमधून जिल्हा बँकेतील एक संचालक निवडला जाणार आहे. यासाठी सर्व सोसायट्यांच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही सोसाट्यांच्या नव्याने निवडी झाल्याने ठरावात सूचनेनुसार बदलही झाले आहेत. असे असले तरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतच उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. बँकेचे विद्यमान संचालक दत्तानाना ढमाळ यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील हे यावेळी इच्छुक आहेत.गतवेळी जिल्हा बँकेसाठी मोठा संघर्ष झाला होता, मात्र खंडाळ््यात सहकारी साखर कारखान्याचा उमेदवार दिला जाणार नसल्याचा अलिखित करार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसची रणांगणातून सपशेल माघार राहिली तर राष्ट्रवादीला बिनविरोध निवडून जाण्याची संधी आहे. मात्र कारखाना निवडणुकीत काँग्रेसचा एक गट नाराज आहे. त्यामुळे बँकेला अपक्ष उमेदवार देऊन चुरस निमाण होण्याचीही शक्यता आहे.राष्ट्रवादीअंतर्गत मोठी चुरस असली तरी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. विद्यमान संचालक दत्तानाना ढमाळ यांचे पाच वर्षांतील कामगिरी चांगली राहिली आहे, तसेच बँकेचे उपाध्यक्ष असताना अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. शिवाय तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणूनही उत्तम काम करून पक्ष बळकट केला आहे. त्यामुळे या पदावर दत्तानाना ढमाळ यांचा प्रभावीपणे दावा आहे, तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांच्याकडे क्षमता असतानाही पक्षाने आजवर तशी संधी दिली नाही. त्यामुळे त्यांनाही यावेळी मोठ्या अपेक्षा आहेत. जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मोठी फिल्डिंग होती; मात्र वर्णी लागली नसल्याने बँकेच्या उमेदवारीसाठी त्यांची प्रबळ दावेदारी आहे. त्यामुळे योग्य उमेदवार देण्याची मोठी जबाबदारी पक्षावर येऊन ठेपली आहे. याशिवाय जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव पाटील यांच्या सोसायटी मतदार संघावर मोठा पगडा आहे. त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक समजली जाते.