शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

काँग्रेस नेत्यांकडून स्वतंत्र पॅनेल तयार...

By admin | Updated: April 27, 2015 00:17 IST

आज घोषणा : पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत व्यूहरचना; समदु:खी नेते, इच्छुक एकत्र

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दुखावलेल्या काँग्रेस नेत्यांनी विरोधी पॅनेल उभारण्याची तयारी केली आहे. मोहनराव कदम यांनी यासंदर्भातील चाचपणी करून १९ उमेदवारांचे पॅनेल तयार केले आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत सोमवारी, २७ एप्रिल रोजी याची घोषणा केली जाणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आ. जयंत पाटील यांनी मोठी राजकीय खेळी करीत काँग्रेसमध्ये फूट पाडली. भाजपचे खासदार संजय पाटील, जयंत पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांना आपल्याकडे खेचले. त्यामुळे काँग्रेस सध्या या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. शनिवारी सांगलीत काँग्रेसने जिल्ह्यातील नाराज नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर नाईक, दिगंबर जाधव आदी नेते उपस्थित होते. अजितराव घोरपडेही या पॅनेलच्या मदतीला धावणार असल्याचे सांगितले जात होते, मात्र त्यांनी या गोष्टीचा रविवारी इन्कार केला. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी केली. त्यानंतर त्यांनी शेतकरी सहकारी पॅनेलशिवाय उरलेल्या उमेदवारांमधून १९ उमेदवारांची निवड केली आहे. त्यामुळे १९ जणांचे स्वतंत्र पॅनेल करून काँग्रेस नेते मैदानात उतरणार आहेत. शेवटच्या टप्प्यात पतंगराव कदम यांनीही निवडणुकीत लक्ष घालण्याचे ठरविले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शुक्रवारी ३३१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शिराळा सोसायटी गटातून माजी आमदार मानसिंगराव नाईक व वाळवा सोसायटी गटातून दिलीप तात्या पाटील यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १९ जागांसाठी ५३ जण रिंगणात आहेत. त्यामुळे १९ जागांसाठी आता काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल मैदानात उतरणार आहे. या पॅनेलमध्ये अन्यपक्षीय नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)पॅनेलची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उमेदवारांची घोषणा उद्या केली जाईल. अभद्र युतीमुळे आम्हाला सर्वच तालुक्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी या अभद्र युतीच्या विरोधात मतदान होऊन आम्हाला फायदा होईल. - मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, काँग्रेसतासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाला अपेक्षेपेक्षा चांगल्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यांना न्याय मिळण्याचा प्रश्नच नाही. मी जिल्हा बँकेत लक्ष घातलेले नाही. त्यामुळे नाराजीचा प्रश्न उद्भवत नाही. विरोधी पॅनेलच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. - अजितराव घोरपडे, माजी मंत्रीअनेक उमेदवारांची मनधरणीपॅनेलची उभारणी करताना काही ठिकाणी काँग्रेस नेत्यांना उमेदवारांची मनधरणी करावी लागली. एकाच गटात दोन किंवा त्याहून अधिक उमेदवार असतील, त्याठिकाणी काँग्रेस नेत्यांनी उमेदवारांची समजूत काढली. जत, मिरज या सोसायटी गटाबरोबरच अन्य गटांतही अनेक ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार असल्याने उमेदवार निवडीवेळीही काँग्रेसची दमछाक झाली.