शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जखीणवाडीत संघर्ष; पण सत्ता अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:37 IST

मलकापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत जखीणवाडीमध्ये पक्षीय पातळीवर, तर नांदलापूरसह चचेगावात भावकी आणि गावपातळीवरील राजकारणाची सरशी झाली. जखीणवाडीत चव्हाण-उंडाळकर गटाने ...

मलकापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत जखीणवाडीमध्ये पक्षीय पातळीवर, तर नांदलापूरसह चचेगावात भावकी आणि गावपातळीवरील राजकारणाची सरशी झाली. जखीणवाडीत चव्हाण-उंडाळकर गटाने सत्ता अबाधित ठेवली. नांदलापुरात दोन माजी सरपंचांच्या गटाला झुकते माप देत मतदारांनी पुन्हा संधी दिली, तर चचेगावात पूर्वीप्रमाणेच उंडाळकर-भोसले गटाला यश मिळवता आले.

कऱ्हाड तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या जखीणवाडीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधाला फाटा देत सर्व ११ जागांवर निवडणूक झाली. ऐनवेळी उदयसिंह पाटील व पृथ्वीराज चव्हाण गटात समेट होऊन उंडाळकर गटाच्या सर्व उमेदवारांनी आपली उमेदवारी काढून घेतली. त्यामुळे चव्हाण-उंडाळकर विरुद्ध भोसले गटातच मुख्य लढत झाली. या चुरशीच्या लढतीत रामचंद्र पाटील व अ‍ॅड. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ११ पैकी ७ जागा जिंकत अनेक वर्षांपासूनची सत्ता अबाधित ठेवली. विरोधी डॉ. अतुल भोसले गटाला ४ जागा मिळाल्या.

चचेगावात अकरा जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत पक्षीय पातळीला महत्त्व न देता गावपातळी व भावकीला प्राधान्य मिळाले. उंडाळकर व भोसले गटाने एकमेकांच्या हातात हात घालून निवडणूक लढवली. या निवडणुकीत उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाला ३, डॉ. अतुल भोसले गटाला ४, तर आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला ४ जागा जिंकता आल्या.

नांदलापूर ग्रामपंचायतीत ९ सदस्य संख्या असून, अशोकराव थोरात यांना मानणाऱ्या गोपाळ वस्तीमधील एक महिला अर्ज माघारीच्या मुदतीत बिनविरोध निवडून आली होती. उर्वरित ८ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत नांदलापुरात वरिष्ठ नेत्यांच्या पक्षीय राजकारणाला बगल देत भावकी व गावपातळीवरील राजकारणाला प्राधान्य दिले गेले. विलास शिर्के, मानसिंग लावंड व प्रदीप शिर्के या माजी सरपंचांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. या आठ जागांपैकी विलास शिर्के यांना ३, मानसिंग लावंड यांना ३ व प्रदीप शिर्के यांना २ जागांवर विजय संपादन करता आला.

- चौकट

नांदलापुरात सत्ता कुणाची?

नांदलापुरात मानसिंग लावंड व प्रदीप शिर्के हे उंडाळकर व चव्हाण यांना मानतात, तर विलास शिर्के यांच्यासह बिनविरोध निवडून आलेले डॉ. अतुल भोसले यांचे नेतृत्व मानतात. हे चित्र पाहता नांदलापुरात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मानणाऱ्या गटाची सत्ता येईल, असे चित्र आहे. मात्र, सरपंच आरक्षण सोडतीनंतर नेमकी सत्ता कोणाची, हे स्पष्ट होईल.