शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जखीणवाडीत संघर्ष; पण सत्ता अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:37 IST

मलकापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत जखीणवाडीमध्ये पक्षीय पातळीवर, तर नांदलापूरसह चचेगावात भावकी आणि गावपातळीवरील राजकारणाची सरशी झाली. जखीणवाडीत चव्हाण-उंडाळकर गटाने ...

मलकापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत जखीणवाडीमध्ये पक्षीय पातळीवर, तर नांदलापूरसह चचेगावात भावकी आणि गावपातळीवरील राजकारणाची सरशी झाली. जखीणवाडीत चव्हाण-उंडाळकर गटाने सत्ता अबाधित ठेवली. नांदलापुरात दोन माजी सरपंचांच्या गटाला झुकते माप देत मतदारांनी पुन्हा संधी दिली, तर चचेगावात पूर्वीप्रमाणेच उंडाळकर-भोसले गटाला यश मिळवता आले.

कऱ्हाड तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या जखीणवाडीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधाला फाटा देत सर्व ११ जागांवर निवडणूक झाली. ऐनवेळी उदयसिंह पाटील व पृथ्वीराज चव्हाण गटात समेट होऊन उंडाळकर गटाच्या सर्व उमेदवारांनी आपली उमेदवारी काढून घेतली. त्यामुळे चव्हाण-उंडाळकर विरुद्ध भोसले गटातच मुख्य लढत झाली. या चुरशीच्या लढतीत रामचंद्र पाटील व अ‍ॅड. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ११ पैकी ७ जागा जिंकत अनेक वर्षांपासूनची सत्ता अबाधित ठेवली. विरोधी डॉ. अतुल भोसले गटाला ४ जागा मिळाल्या.

चचेगावात अकरा जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत पक्षीय पातळीला महत्त्व न देता गावपातळी व भावकीला प्राधान्य मिळाले. उंडाळकर व भोसले गटाने एकमेकांच्या हातात हात घालून निवडणूक लढवली. या निवडणुकीत उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाला ३, डॉ. अतुल भोसले गटाला ४, तर आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला ४ जागा जिंकता आल्या.

नांदलापूर ग्रामपंचायतीत ९ सदस्य संख्या असून, अशोकराव थोरात यांना मानणाऱ्या गोपाळ वस्तीमधील एक महिला अर्ज माघारीच्या मुदतीत बिनविरोध निवडून आली होती. उर्वरित ८ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत नांदलापुरात वरिष्ठ नेत्यांच्या पक्षीय राजकारणाला बगल देत भावकी व गावपातळीवरील राजकारणाला प्राधान्य दिले गेले. विलास शिर्के, मानसिंग लावंड व प्रदीप शिर्के या माजी सरपंचांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. या आठ जागांपैकी विलास शिर्के यांना ३, मानसिंग लावंड यांना ३ व प्रदीप शिर्के यांना २ जागांवर विजय संपादन करता आला.

- चौकट

नांदलापुरात सत्ता कुणाची?

नांदलापुरात मानसिंग लावंड व प्रदीप शिर्के हे उंडाळकर व चव्हाण यांना मानतात, तर विलास शिर्के यांच्यासह बिनविरोध निवडून आलेले डॉ. अतुल भोसले यांचे नेतृत्व मानतात. हे चित्र पाहता नांदलापुरात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मानणाऱ्या गटाची सत्ता येईल, असे चित्र आहे. मात्र, सरपंच आरक्षण सोडतीनंतर नेमकी सत्ता कोणाची, हे स्पष्ट होईल.