शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

इतिहासाचा अनुभव देणाऱ्या संमेलनाची सांगता

By admin | Updated: November 17, 2014 23:21 IST

नितीन बानुगडे-पाटील : दुर्ग संमेलने महाराष्ट्राचे वैभव ठरतील

सातारा : ‘साडेतीनशे वर्षांपूर्वीचा शिवकाळ काय होता, कोणत्या परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती झाली. याचा नैसर्गिक अनुभव दुसऱ्या दुर्ग संमेलनाने घेतला. तुफानी पावसात १५०० फूट उंचीवर संमेलन भरवण्याचा थाट केवळ अशक्य होता. श्रीकृष्णाने गोवर्धन उचलून केलेल्या रक्षणाची अनुभूती देणारे हे दुर्ग संमेलन महाराष्ट्राचे वैभव ठरेल,’ असे प्रतिपादन संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले. वर्धनगडावरील दुर्ग संमेलनाचा समारोपात रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्घाटक दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, प्र. के. घाणेकर, प्रा. के. एन. देसाई, निमंत्रक दीपक प्रभावळकर, मिलिंंद क्षीरसागर, आमदार शशिकांत शिंदे, पुरातत्त्व विभागाचे प्रा. सचिन जोशी, सरपंच अर्जुन मोहिते, अजय जाधवराव, गिरीशराव जाधव उपस्थित होते.प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘स्वराज्यनिर्मितीचा इतिहास केवळ अभ्यासला जातो किंवा चर्चिला जातो; मात्र या संमेलनाने तो प्रत्यक्षात अनुभवता आला. खडतर व नेटक्या संयोजनाने सजलेल्या या महोत्सवात येण्याचा मोह वरुणराजालाही आवरता आला नाही व त्याच्यावर मात करत तरुणांनी साकारलेला सोहळा इतिहासात अजरामर होईल.’प्रत्येक किल्ल्याच्या संवर्धनासाठी त्या-त्या ठिकाणी दुर्ग संवर्धक मंडळे, संस्था यांची स्थापना करण्याचा संकल्प महासंघाचे अध्यक्ष मिलिंद क्षीरसागर यांनी सोडला. समारोपात मावळ्यांकडून मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सुरू होती. त्याचवेळी शस्त्र संग्राहक गिरीशराव जाधव प्रत्येक मर्दानी डावपेचांसह शस्त्रांची इत्थंभूत माहिती सांगत होते. शाहीर शिवकालीन वातावरणाची निर्मिती करत होते. (प्रतिनिधी)संमेलनाचे ठराव१ महाराष्ट्रातील दुर्गांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी. २ महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात दुर्ग वास्तू संग्रहलाची निर्मिती करावी.३ शिवरायांच्या काही किल्ल्यांवर छायाचित्रे घेण्यास मनाई करणारी ‘फोटो बंदी’ उठवावी. ४विविध गॅझेटिअरमधील दुर्गांमधील माहिती संकलित करत शासनानेच ‘फोर्टस आॅफ महाराष्ट्र’ हे स्वतंत्र गॅझेटिअर तयार करावे.५ पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक दुर्ग, किल्ला, गडांवर संवर्धक मंडळे निर्माण करून संवर्धनाच्या कामाला सुरुवात करावी.