शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

गृहविलगीकरणातील रुग्ण वाढवतायत चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST

सातारा : गृहविलगीकरण बंद करून जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण सुरू केले. परिणामी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली. तरीही १ ...

सातारा : गृहविलगीकरण बंद करून जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण सुरू केले. परिणामी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली. तरीही १ हजार २०८ रुग्ण अद्यापही गृहविलगीकरणात असून, हे रुग्ण प्रशासनाची चिंता वाढवू लागले आहेत. कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी या रुग्णांनाही संस्थात्मक विलगीकरणात हलविणे गरजेचे आहे.

सातारा जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा अक्षरश: विस्फोट झाला. कोरोनाबाधित व मृतांच्या संख्येने सर्व उच्चांक मोडीत काढले. प्रयत्न करूनही बाधितांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाला संचारबंदी लागू करावी लागली. तरीही कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढतच गेला. कारण रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याने १८ हजारांहून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत होते. या रुग्णांवर कोणोचेही निर्बंध नव्हते.

ही चूक लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने गृहविलगीकरण बंद करून ठिकठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था उभी केली. कोरोनाबाधितांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले. परिणामी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची दैनंदिन संख्या अडीच हजारांहून हजारावर आली. असे असले तरी आजही १ हजार २०८ रुग्ण अद्यापही घरातूनच उपचार घेत आहे. या रुग्णांवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे हे रुग्ण पुन्हा एकदा कोरोनाचे वाहक ठरू शकतात. संक्रमण वाढण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तातडीने संस्थात्मक विलगीकरणात दाखल करणे गरजेचे बनले आहे.

(चौकट)

बाधितांचा लेखाजोखा

एकूण पुरुष महिला

गृहविलगीकरण १२०८ ६५७ ५५१

संस्थात्मक विलगीकरण ३९५६ २२०८ १७४७

(चौकट)

गर्दीवर नियंत्रण हवे

संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्याने जिल्ह्याची बाजारपेठेत सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत गजबजून जात आहे. कोरोना संपला या आविर्भावात जो-तो खरेदीसाठी घराबाहेर पडत आहे. बाजारपेठेतील या गर्दीवर कोणाचेही कसलेच निर्बंध आता राहिलेले नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर कोरोना परिस्थिती पुन्हा गंभीर बनू शकते.