शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

लोकांची शिधापुरवठा बंद केल्याची तर दुकानदाराची मारहाण केल्याची तक्रार, कराड तालुक्यातील साळशिरंबे येथील प्रकार

By प्रमोद सुकरे | Updated: December 13, 2022 11:57 IST

प्रमोद सुकरे कराड : अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा अशी योजना काही महिन्यापूर्वी शासनाने सुरू केली होती. त्यात सदन असणाऱ्या ...

प्रमोद सुकरेकराड : अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा अशी योजना काही महिन्यापूर्वी शासनाने सुरू केली होती. त्यात सदन असणाऱ्या तालुक्यातील सुमारे १ हजार १०० वर लोकांनी याचा लाभ सोडला आहे. पण साळशिरंबे येथील काही लोकांनी मात्र आम्हाला फसवून आमच्या अर्जावर सह्या घेतल्या आहेत. त्यामुळे आमचा शिधा बंद झाला असून हा आमच्यावर अन्याय  आहे. तरी संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी तहसीलदार कार्यालयाकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली. तर शिधा का देत नाही म्हणून काहींनी मारहाण केल्याची तक्रार दुकानदाराने दिली आहे. त्यामुळे या प्रकाराची नेमकी सत्यता तपासण्याची गरज आहे.काही लोकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या गावात विकास सेवा सोसायटी व अन्य १ दुकानातून स्वस्त धान्य दुकानमार्फत कार्डधारकांना दर महिन्याला अन्नधान्य पुरवले जाते. मात्र या दुकानदारांनी 'अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडा' या योजनेच्या अर्जावर आम्ही राजकीय विरोधक असल्याने आमच्या फसवून सह्या घेतल्या आहेत .त्यामुळे आमचा शिधा बंद झाला आहे.आम्ही गरीब व गरजू कुटुंबातील आहोत. त्यामुळे आमच्यावर हा अन्याय होत आहे. म्हणून आम्ही तालुका पुरवठा विभागाशी  संपर्क साधला मात्र तेथेही उडवा-उडुची उत्तरे मिळाली. म्हणून आज एकत्रित येऊन हे निवेदन देत आहोत. तरी दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदनावर निवास यादव,शांताबाई पाटील, कमल यादव यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

मारहाण केल्याचा दुकानदाराचा तक्रार अर्जदरम्यान रेशनिंग न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचा तक्रार अर्ज विकास सेवा सोसायटीच्या दुकानदाराने कराड पोलीसांत दिला आहे. त्याची प्रत तहसीलदार कराड यांच्याकडेही दिली आहे. तक्रार अर्जात म्हटले आहे की, अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या योजनेची माहिती ग्रामसभेत देण्यात आली होती. ग्रामसभेत ठरले प्रमाणे लोकांना पूर्ण माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेतले आहेत. मात्र तरीदेखील अनिकेत बाबासो यादव व बाबासो शंकर यादव यांनी २८ नोव्हेंबर रोजी  सोसायटीमध्ये येवून मला रेशनिंग का देत नाही असे म्हणून मला दमदाटी देत मारहाण केली. तसेच सध्या ते माझी समाजमाध्यमातून   बदनामी  करीत आहेत. त्यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे असेही तक्रारीत म्हटले आहे.

सदन लोकांनी धान्याचा लाभ सोडावा म्हणजे गरजूंना त्याचा लाभ मिळेल असा योजनेचा हेतू आहे. तसेच लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून माहिती देवूनच त्यांचे अर्ज भरुन घेतले आहेत. त्या अर्जावर अर्जदाराची सही असते. त्यामुळे कोणावर जाणिवपूर्वक अन्याय करण्याचा प्रश्नच नाही. तरीही चुकुन कोणावर अन्याय झाला असेल तर ते तपासून पाहू - महादेव आष्टेकर, पुरवठा निरिक्षक, कराड

टॅग्स :Satara areaसातारा परिसर