शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

लोकांची शिधापुरवठा बंद केल्याची तर दुकानदाराची मारहाण केल्याची तक्रार, कराड तालुक्यातील साळशिरंबे येथील प्रकार

By प्रमोद सुकरे | Updated: December 13, 2022 11:57 IST

प्रमोद सुकरे कराड : अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा अशी योजना काही महिन्यापूर्वी शासनाने सुरू केली होती. त्यात सदन असणाऱ्या ...

प्रमोद सुकरेकराड : अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा अशी योजना काही महिन्यापूर्वी शासनाने सुरू केली होती. त्यात सदन असणाऱ्या तालुक्यातील सुमारे १ हजार १०० वर लोकांनी याचा लाभ सोडला आहे. पण साळशिरंबे येथील काही लोकांनी मात्र आम्हाला फसवून आमच्या अर्जावर सह्या घेतल्या आहेत. त्यामुळे आमचा शिधा बंद झाला असून हा आमच्यावर अन्याय  आहे. तरी संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी तहसीलदार कार्यालयाकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली. तर शिधा का देत नाही म्हणून काहींनी मारहाण केल्याची तक्रार दुकानदाराने दिली आहे. त्यामुळे या प्रकाराची नेमकी सत्यता तपासण्याची गरज आहे.काही लोकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या गावात विकास सेवा सोसायटी व अन्य १ दुकानातून स्वस्त धान्य दुकानमार्फत कार्डधारकांना दर महिन्याला अन्नधान्य पुरवले जाते. मात्र या दुकानदारांनी 'अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडा' या योजनेच्या अर्जावर आम्ही राजकीय विरोधक असल्याने आमच्या फसवून सह्या घेतल्या आहेत .त्यामुळे आमचा शिधा बंद झाला आहे.आम्ही गरीब व गरजू कुटुंबातील आहोत. त्यामुळे आमच्यावर हा अन्याय होत आहे. म्हणून आम्ही तालुका पुरवठा विभागाशी  संपर्क साधला मात्र तेथेही उडवा-उडुची उत्तरे मिळाली. म्हणून आज एकत्रित येऊन हे निवेदन देत आहोत. तरी दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदनावर निवास यादव,शांताबाई पाटील, कमल यादव यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

मारहाण केल्याचा दुकानदाराचा तक्रार अर्जदरम्यान रेशनिंग न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचा तक्रार अर्ज विकास सेवा सोसायटीच्या दुकानदाराने कराड पोलीसांत दिला आहे. त्याची प्रत तहसीलदार कराड यांच्याकडेही दिली आहे. तक्रार अर्जात म्हटले आहे की, अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या योजनेची माहिती ग्रामसभेत देण्यात आली होती. ग्रामसभेत ठरले प्रमाणे लोकांना पूर्ण माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेतले आहेत. मात्र तरीदेखील अनिकेत बाबासो यादव व बाबासो शंकर यादव यांनी २८ नोव्हेंबर रोजी  सोसायटीमध्ये येवून मला रेशनिंग का देत नाही असे म्हणून मला दमदाटी देत मारहाण केली. तसेच सध्या ते माझी समाजमाध्यमातून   बदनामी  करीत आहेत. त्यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे असेही तक्रारीत म्हटले आहे.

सदन लोकांनी धान्याचा लाभ सोडावा म्हणजे गरजूंना त्याचा लाभ मिळेल असा योजनेचा हेतू आहे. तसेच लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून माहिती देवूनच त्यांचे अर्ज भरुन घेतले आहेत. त्या अर्जावर अर्जदाराची सही असते. त्यामुळे कोणावर जाणिवपूर्वक अन्याय करण्याचा प्रश्नच नाही. तरीही चुकुन कोणावर अन्याय झाला असेल तर ते तपासून पाहू - महादेव आष्टेकर, पुरवठा निरिक्षक, कराड

टॅग्स :Satara areaसातारा परिसर