शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

लोकांची शिधापुरवठा बंद केल्याची तर दुकानदाराची मारहाण केल्याची तक्रार, कराड तालुक्यातील साळशिरंबे येथील प्रकार

By प्रमोद सुकरे | Updated: December 13, 2022 11:57 IST

प्रमोद सुकरे कराड : अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा अशी योजना काही महिन्यापूर्वी शासनाने सुरू केली होती. त्यात सदन असणाऱ्या ...

प्रमोद सुकरेकराड : अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा अशी योजना काही महिन्यापूर्वी शासनाने सुरू केली होती. त्यात सदन असणाऱ्या तालुक्यातील सुमारे १ हजार १०० वर लोकांनी याचा लाभ सोडला आहे. पण साळशिरंबे येथील काही लोकांनी मात्र आम्हाला फसवून आमच्या अर्जावर सह्या घेतल्या आहेत. त्यामुळे आमचा शिधा बंद झाला असून हा आमच्यावर अन्याय  आहे. तरी संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी तहसीलदार कार्यालयाकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली. तर शिधा का देत नाही म्हणून काहींनी मारहाण केल्याची तक्रार दुकानदाराने दिली आहे. त्यामुळे या प्रकाराची नेमकी सत्यता तपासण्याची गरज आहे.काही लोकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या गावात विकास सेवा सोसायटी व अन्य १ दुकानातून स्वस्त धान्य दुकानमार्फत कार्डधारकांना दर महिन्याला अन्नधान्य पुरवले जाते. मात्र या दुकानदारांनी 'अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडा' या योजनेच्या अर्जावर आम्ही राजकीय विरोधक असल्याने आमच्या फसवून सह्या घेतल्या आहेत .त्यामुळे आमचा शिधा बंद झाला आहे.आम्ही गरीब व गरजू कुटुंबातील आहोत. त्यामुळे आमच्यावर हा अन्याय होत आहे. म्हणून आम्ही तालुका पुरवठा विभागाशी  संपर्क साधला मात्र तेथेही उडवा-उडुची उत्तरे मिळाली. म्हणून आज एकत्रित येऊन हे निवेदन देत आहोत. तरी दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदनावर निवास यादव,शांताबाई पाटील, कमल यादव यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

मारहाण केल्याचा दुकानदाराचा तक्रार अर्जदरम्यान रेशनिंग न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचा तक्रार अर्ज विकास सेवा सोसायटीच्या दुकानदाराने कराड पोलीसांत दिला आहे. त्याची प्रत तहसीलदार कराड यांच्याकडेही दिली आहे. तक्रार अर्जात म्हटले आहे की, अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या योजनेची माहिती ग्रामसभेत देण्यात आली होती. ग्रामसभेत ठरले प्रमाणे लोकांना पूर्ण माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेतले आहेत. मात्र तरीदेखील अनिकेत बाबासो यादव व बाबासो शंकर यादव यांनी २८ नोव्हेंबर रोजी  सोसायटीमध्ये येवून मला रेशनिंग का देत नाही असे म्हणून मला दमदाटी देत मारहाण केली. तसेच सध्या ते माझी समाजमाध्यमातून   बदनामी  करीत आहेत. त्यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे असेही तक्रारीत म्हटले आहे.

सदन लोकांनी धान्याचा लाभ सोडावा म्हणजे गरजूंना त्याचा लाभ मिळेल असा योजनेचा हेतू आहे. तसेच लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून माहिती देवूनच त्यांचे अर्ज भरुन घेतले आहेत. त्या अर्जावर अर्जदाराची सही असते. त्यामुळे कोणावर जाणिवपूर्वक अन्याय करण्याचा प्रश्नच नाही. तरीही चुकुन कोणावर अन्याय झाला असेल तर ते तपासून पाहू - महादेव आष्टेकर, पुरवठा निरिक्षक, कराड

टॅग्स :Satara areaसातारा परिसर