शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मानवता धर्मामुळेच समाजात एकोपा:पुनियानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:39 IST

सातारा : ‘भारत विविधतेने नटलेला देश असून, धर्मनिरपेक्ष असल्यानेच मजबूत आहे; पण आज राजकारणासाठी दंगली घडविण्यात येतात, द्वेष पसरविला ...

सातारा : ‘भारत विविधतेने नटलेला देश असून, धर्मनिरपेक्ष असल्यानेच मजबूत आहे; पण आज राजकारणासाठी दंगली घडविण्यात येतात, द्वेष पसरविला जातो. अशावेळी संत, महामानवांचा मानवता धर्मच सर्वांत एकोपा ठेवत आहे. त्यामुळे आपणा सर्वांना मानवता धर्मानेच पुढे जायचे आहे, हे लक्षात ठेवावे,’ असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी यांनी केले.येथील गांधी मैदानावर मुस्लीम जागृती अभियान आणि परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने सर्वधर्म भाईचारा सभा झाली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पुनियानी बोलत होते. या कार्यक्रमाला संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सुहास फडतरे, साताऱ्यातील शाही मस्जिदचे इमाम हाफिज खलील अहमद, टिळक मेमोरियल चर्चचे डॉ. डॅनियल गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे विद्याधर गायकवाड, लिंगायत समितीचे सागर कस्तुरे, महानुभव पंथाचे राजकुमार बीडकर आदी उपस्थित होते.डॉ. पुनियानी म्हणाले, ‘जगात इस्लाम धर्माला दहशतवादाशी जोडले जात आहे, हे चुकीचे आहे. संतांनी धर्माला प्रेमात पाहिले. धर्म हा जगाला प्रेम शिकवतो, द्वेष नाही. सर्वांनी प्रेमाने राहावे, हे मानवता धर्मच शिकवतो.’डॉ. फडतरे म्हणाले, ‘मुहम्मद पैगंबर यांनी आपण सर्वजण एकच आहोत, हे जगाला प्रथम सांगितले. मानवता धर्माची प्रेरणा मुहम्मद पैगंबर यांनीच सर्वांना दिली आहे. माणूस बनण्यासाठी संत आणि महामानवांची विचारधारा अंगीकार करणे आवश्यक आहे.’हाफिज खलील अहमद यांनी एका मानसाने दुसºयाचा आदर करावा. कोणताही धर्म खोटे बोला, चोरी करा, द्वेष करा, असे सांगत नाही तर प्रेम करा, असेच सांगतो, असे सांगितले.या कार्यक्रमाचे विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले. रफिक शेख यांनी आभार मानले.