शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

मानवता धर्मामुळेच समाजात एकोपा:पुनियानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:39 IST

सातारा : ‘भारत विविधतेने नटलेला देश असून, धर्मनिरपेक्ष असल्यानेच मजबूत आहे; पण आज राजकारणासाठी दंगली घडविण्यात येतात, द्वेष पसरविला ...

सातारा : ‘भारत विविधतेने नटलेला देश असून, धर्मनिरपेक्ष असल्यानेच मजबूत आहे; पण आज राजकारणासाठी दंगली घडविण्यात येतात, द्वेष पसरविला जातो. अशावेळी संत, महामानवांचा मानवता धर्मच सर्वांत एकोपा ठेवत आहे. त्यामुळे आपणा सर्वांना मानवता धर्मानेच पुढे जायचे आहे, हे लक्षात ठेवावे,’ असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी यांनी केले.येथील गांधी मैदानावर मुस्लीम जागृती अभियान आणि परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने सर्वधर्म भाईचारा सभा झाली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पुनियानी बोलत होते. या कार्यक्रमाला संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सुहास फडतरे, साताऱ्यातील शाही मस्जिदचे इमाम हाफिज खलील अहमद, टिळक मेमोरियल चर्चचे डॉ. डॅनियल गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे विद्याधर गायकवाड, लिंगायत समितीचे सागर कस्तुरे, महानुभव पंथाचे राजकुमार बीडकर आदी उपस्थित होते.डॉ. पुनियानी म्हणाले, ‘जगात इस्लाम धर्माला दहशतवादाशी जोडले जात आहे, हे चुकीचे आहे. संतांनी धर्माला प्रेमात पाहिले. धर्म हा जगाला प्रेम शिकवतो, द्वेष नाही. सर्वांनी प्रेमाने राहावे, हे मानवता धर्मच शिकवतो.’डॉ. फडतरे म्हणाले, ‘मुहम्मद पैगंबर यांनी आपण सर्वजण एकच आहोत, हे जगाला प्रथम सांगितले. मानवता धर्माची प्रेरणा मुहम्मद पैगंबर यांनीच सर्वांना दिली आहे. माणूस बनण्यासाठी संत आणि महामानवांची विचारधारा अंगीकार करणे आवश्यक आहे.’हाफिज खलील अहमद यांनी एका मानसाने दुसºयाचा आदर करावा. कोणताही धर्म खोटे बोला, चोरी करा, द्वेष करा, असे सांगत नाही तर प्रेम करा, असेच सांगतो, असे सांगितले.या कार्यक्रमाचे विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले. रफिक शेख यांनी आभार मानले.