शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

नवीन कवठे येथे जलशद्धिकरण केंद्राचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

मसूर : पाणी हेच सर्व आजारांचे मूळ कारण असल्याचे ओळखून ग्रामपंचायतीने उभारलेल्या जलशुद्धिकरण केंद्रामुळे ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यास ...

मसूर : पाणी हेच सर्व आजारांचे मूळ कारण असल्याचे ओळखून ग्रामपंचायतीने उभारलेल्या जलशुद्धिकरण केंद्रामुळे ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. ग्रामस्थांनी पावसाळ्यात व नेहमीच पिण्यासाठी या केंद्रातील पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

नवीन कवठे, ता. कऱ्हाड येथे ग्रामपंचायतीच्या वतीने १५ वा वित्त आयोग (पंचायत समिती स्तर) व ग्रामपंचायत फंडातून उभारलेल्या जलशुद्धिकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सचिव संगीता साळुंखे, सारंग पाटील, कऱ्हाड पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, प्रांत उत्तम दिघे, कवठेचे सरपंच लालासाहेब पाटील, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, शुद्ध पाण्यामुळे ग्रामस्थांना पोटाचे विकार, मूतखडा असे आजार होणार नाहीत. शेतामध्ये वेगवेगळ्या औषध फवारणीमुळे पिण्याचे पाणी दूषित होत असते. त्यामुळे सर्वांनी याठिकाणी असणाऱ्या जलशुद्धिकरण केंद्राचा उपभोग घ्यावा व पाण्यापासून होणाऱ्या रोगापासून घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राखावे. येथे एक रुपयात शुद्ध पिण्याचे पाच लिटर पाणी मिळत आहे.

यावेळी मानसिंगराव जगदाळे, रमेश चव्हाण, लालासाहेब पाटील, आदींनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास नवीन कवठेच्या सरपंच तेजस्विनी माने, उपसरपंच गणेश घार्गे, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी साळुंखे, रेश्मा यादव, सावित्री पाटोळे, सुजाता वायदंडे, विश्वासराव माने, दादासाहेब साळुंखे, एम. के. साळुंखे, विश्वास गणेशकर, धनाजी घार्गे, प्रताप साळुंखे, आत्माराम साळुंखे, विजयकुमार पाटणकर, ज्ञानेश्वर साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

उपसरपंच गणेश घार्गे यांनी स्वागत केले. दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी पाटोळे यांनी आभार मानले.

फोटो ओळ : कवठे, ता. कऱ्हाड येथे जलशुद्धिकरण केंद्राचा प्रारंभ करताना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, संगीता साळुंखे उपस्थित होते.