शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कवठे येथे जलशद्धिकरण केंद्राचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

मसूर : पाणी हेच सर्व आजारांचे मूळ कारण असल्याचे ओळखून ग्रामपंचायतीने उभारलेल्या जलशुद्धिकरण केंद्रामुळे ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यास ...

मसूर : पाणी हेच सर्व आजारांचे मूळ कारण असल्याचे ओळखून ग्रामपंचायतीने उभारलेल्या जलशुद्धिकरण केंद्रामुळे ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. ग्रामस्थांनी पावसाळ्यात व नेहमीच पिण्यासाठी या केंद्रातील पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

नवीन कवठे, ता. कऱ्हाड येथे ग्रामपंचायतीच्या वतीने १५ वा वित्त आयोग (पंचायत समिती स्तर) व ग्रामपंचायत फंडातून उभारलेल्या जलशुद्धिकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सचिव संगीता साळुंखे, सारंग पाटील, कऱ्हाड पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, प्रांत उत्तम दिघे, कवठेचे सरपंच लालासाहेब पाटील, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, शुद्ध पाण्यामुळे ग्रामस्थांना पोटाचे विकार, मूतखडा असे आजार होणार नाहीत. शेतामध्ये वेगवेगळ्या औषध फवारणीमुळे पिण्याचे पाणी दूषित होत असते. त्यामुळे सर्वांनी याठिकाणी असणाऱ्या जलशुद्धिकरण केंद्राचा उपभोग घ्यावा व पाण्यापासून होणाऱ्या रोगापासून घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राखावे. येथे एक रुपयात शुद्ध पिण्याचे पाच लिटर पाणी मिळत आहे.

यावेळी मानसिंगराव जगदाळे, रमेश चव्हाण, लालासाहेब पाटील, आदींनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास नवीन कवठेच्या सरपंच तेजस्विनी माने, उपसरपंच गणेश घार्गे, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी साळुंखे, रेश्मा यादव, सावित्री पाटोळे, सुजाता वायदंडे, विश्वासराव माने, दादासाहेब साळुंखे, एम. के. साळुंखे, विश्वास गणेशकर, धनाजी घार्गे, प्रताप साळुंखे, आत्माराम साळुंखे, विजयकुमार पाटणकर, ज्ञानेश्वर साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

उपसरपंच गणेश घार्गे यांनी स्वागत केले. दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी पाटोळे यांनी आभार मानले.

फोटो ओळ : कवठे, ता. कऱ्हाड येथे जलशुद्धिकरण केंद्राचा प्रारंभ करताना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, संगीता साळुंखे उपस्थित होते.