शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

कऱ्हाड तहसील कार्यालयावरील मोर्चाचा स्मृतिदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST

कऱ्हाड : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. त्या पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट १९४२ रोजी स्वातंत्र्यवीर ...

कऱ्हाड : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. त्या पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट १९४२ रोजी स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांनी कऱ्हाड तहसील कार्यालयावर तीन हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. तो मोर्चा अहिंसा मार्गाने शांततेत पार पाडून तहसील कार्यालयावर तिरंगा फडकवला होता. त्यावेळी दादा उंडाळकर यांना अटक झाली होती. त्या मोर्चाचा मंगळवारी ८० वा स्मृतिदिन उत्साहात पार पडला. तहसील कार्यालयातील स्मृतिस्तंभाला मान्यवरांनी अभिवादन केले.

शासकीय पातळीवर तहसील कार्यालयासमोरील विजय स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने ॲड. उदयसिंह पाटील, प्रा. गणपतराव कणसे, स्वातंत्र्यसैनिक आनंदराव जाधव, हिंदुराव जाधव, प्रा. धनाजी काटकर, रंगराव थोरात उपस्थित होते. उंडाळे ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. आनंदराव पाटील यांनी स्मृतिस्तंभास अभिवादन केले. यावेळी मोहनराव शिंदे, समिर मुल्ला, विवेक जाधव, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

चौकट

उंडाळेत क्रांतिज्योत पेटविली

दादा उंडाळकर यांनी काढलेल्या या मोर्चाची सुरुवात उंडाळे येथे मशाल पेटवून करण्यात आली होती. त्याचे स्मरण म्हणून उंडाळे येथील विद्यालयाच्या आवारात ॲड. आनंदराव पाटील यांच्याहस्ते क्रांतिज्योत मशाल पेटवण्यात आली. यावेळी सरपंच संगीता माळी, माजी सरपंच दादा पाटील, गणेश पाटील, प्राचार्य बी. आर. पाटील यांची उपस्थिती होती.

फोटो

कऱ्हाड येथील तहसील कार्यालयातील स्मृतिस्तंभास मंगळवारी ॲड. आनंदराव पाटील, मोहनराव शिंदे, नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांनी अभिवादन केले.