शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

कऱ्हाड तहसील कार्यालयावरील मोर्चाचा स्मृतिदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST

कऱ्हाड : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. त्या पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट १९४२ रोजी स्वातंत्र्यवीर ...

कऱ्हाड : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. त्या पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट १९४२ रोजी स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांनी कऱ्हाड तहसील कार्यालयावर तीन हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. तो मोर्चा अहिंसा मार्गाने शांततेत पार पाडून तहसील कार्यालयावर तिरंगा फडकवला होता. त्यावेळी दादा उंडाळकर यांना अटक झाली होती. त्या मोर्चाचा मंगळवारी ८० वा स्मृतिदिन उत्साहात पार पडला. तहसील कार्यालयातील स्मृतिस्तंभाला मान्यवरांनी अभिवादन केले.

शासकीय पातळीवर तहसील कार्यालयासमोरील विजय स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने ॲड. उदयसिंह पाटील, प्रा. गणपतराव कणसे, स्वातंत्र्यसैनिक आनंदराव जाधव, हिंदुराव जाधव, प्रा. धनाजी काटकर, रंगराव थोरात उपस्थित होते. उंडाळे ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. आनंदराव पाटील यांनी स्मृतिस्तंभास अभिवादन केले. यावेळी मोहनराव शिंदे, समिर मुल्ला, विवेक जाधव, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

चौकट

उंडाळेत क्रांतिज्योत पेटविली

दादा उंडाळकर यांनी काढलेल्या या मोर्चाची सुरुवात उंडाळे येथे मशाल पेटवून करण्यात आली होती. त्याचे स्मरण म्हणून उंडाळे येथील विद्यालयाच्या आवारात ॲड. आनंदराव पाटील यांच्याहस्ते क्रांतिज्योत मशाल पेटवण्यात आली. यावेळी सरपंच संगीता माळी, माजी सरपंच दादा पाटील, गणेश पाटील, प्राचार्य बी. आर. पाटील यांची उपस्थिती होती.

फोटो

कऱ्हाड येथील तहसील कार्यालयातील स्मृतिस्तंभास मंगळवारी ॲड. आनंदराव पाटील, मोहनराव शिंदे, नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांनी अभिवादन केले.