शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

कऱ्हाड तहसील कार्यालयावरील मोर्चाचा स्मृतिदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST

कऱ्हाड : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. त्या पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट १९४२ रोजी स्वातंत्र्यवीर ...

कऱ्हाड : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. त्या पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट १९४२ रोजी स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांनी कऱ्हाड तहसील कार्यालयावर तीन हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. तो मोर्चा अहिंसा मार्गाने शांततेत पार पाडून तहसील कार्यालयावर तिरंगा फडकवला होता. त्यावेळी दादा उंडाळकर यांना अटक झाली होती. त्या मोर्चाचा मंगळवारी ८० वा स्मृतिदिन उत्साहात पार पडला. तहसील कार्यालयातील स्मृतिस्तंभाला मान्यवरांनी अभिवादन केले.

शासकीय पातळीवर तहसील कार्यालयासमोरील विजय स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने ॲड. उदयसिंह पाटील, प्रा. गणपतराव कणसे, स्वातंत्र्यसैनिक आनंदराव जाधव, हिंदुराव जाधव, प्रा. धनाजी काटकर, रंगराव थोरात उपस्थित होते. उंडाळे ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. आनंदराव पाटील यांनी स्मृतिस्तंभास अभिवादन केले. यावेळी मोहनराव शिंदे, समिर मुल्ला, विवेक जाधव, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

चौकट

उंडाळेत क्रांतिज्योत पेटविली

दादा उंडाळकर यांनी काढलेल्या या मोर्चाची सुरुवात उंडाळे येथे मशाल पेटवून करण्यात आली होती. त्याचे स्मरण म्हणून उंडाळे येथील विद्यालयाच्या आवारात ॲड. आनंदराव पाटील यांच्याहस्ते क्रांतिज्योत मशाल पेटवण्यात आली. यावेळी सरपंच संगीता माळी, माजी सरपंच दादा पाटील, गणेश पाटील, प्राचार्य बी. आर. पाटील यांची उपस्थिती होती.

फोटो

कऱ्हाड येथील तहसील कार्यालयातील स्मृतिस्तंभास मंगळवारी ॲड. आनंदराव पाटील, मोहनराव शिंदे, नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांनी अभिवादन केले.